शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे सतीश वारजूकर राष्ट्रवादीच्या वाटेवर? शिवानी वडेट्टीवारांचा जनसंपर्क वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST

नागभीड (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क वाढविला आहे. ...

नागभीड (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क वाढविला आहे. यामुळे चिमूरचे काँग्रेस नेते डाॅ. सतीश वारजूकर कमालीचे विचलित झाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी डाॅ. वारजूकर यांना चर्चेसाठी ‘आमंत्रण’ दिले असल्याचीही माहिती आहे. या बाबीला डाॅ. वारजूकर यांनी दुजोरा दिला नसला तरी स्पष्ट शब्दात नकारही दिला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला आता २० वर्षांचा कालावधी होत असला तरी चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा या दोन्ही क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस बाल्यावस्थेतच आहे. याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. म्हणूनच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने या दोन्ही क्षेत्रात चाचपणी करण्यासाठी मागील महिन्यात पाठवले होते.

या चाचपणीचाच एक भाग म्हणून पाटील यांनी या दोन्ही विधानसभा क्षेत्राचा दौरा केला होता. जयंत पाटील यांनी मागील वेळेस चिमूर विधानसभा क्षेत्रातून फार थोड्या मताने पराभूत झालेल्या डाॅ. सतीश वारजूकर यांचीही भेट घेतली होती. ही भेट राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती.

दरम्यानच्या काळात शिवानी वडेट्टीवार यांनीही या क्षेत्रात जनसंपर्क वाढविला आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रात नवनवीन राजकीय समीकरणे उदयास येत असल्याने डाॅ. वारजूकर चांगलेच विचलित झाले असल्याचे समजते. याची माहिती राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आहे. पाटील नागभीड येथे आले असताना वारजूकर यांना स्वतःच्या गाडीत बसवून चंद्रपूरपर्यंत घेऊन गेले होते. एवढेच नाही, तर दुसऱ्या दिवशी रात्री शंकरपूर येथे वारजूकरांच्या घरी तासभर खलबतेही केली. जयंत पाटील यांनी हा संपूर्ण अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापुढे ठेवला. त्यानंतर पवार यांनी वारजूकर यांना चर्चेसाठी आमंत्रण दिले असल्याची माहिती आहे.

वारजूकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसमधील एक गट सुखावणार असला तरी काँग्रेसला मोठा धक्का बसेल असे बोलले जात आहे. गेल्या २० वर्षांपासून वारजूकर परिवार या क्षेत्राशी जुळला आहे. याबाबत डाॅ. सतीश वारजूकर यांनी मला यावर सध्या काहीही बोलायचे नाही. काय हालचाली होतात ते येणारा काळच सांगेल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.