शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

शोक संवेदना

By admin | Updated: July 26, 2015 01:32 IST

आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ज्येष्ठ राजकीय नेते व राजकारणातील अजातशत्रू रा.सू. गवई यांच्या निधनाने देशातील आंबेडकरी चळवळीचे तसेच महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे.

देशाची हानी चंद्रपूर : आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ज्येष्ठ राजकीय नेते व राजकारणातील अजातशत्रू रा.सू. गवई यांच्या निधनाने देशातील आंबेडकरी चळवळीचे तसेच महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. लोकसभेचे खासदार, विधान परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच केरळ, बिहार व सिक्कीम राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी सांभाळलेली जबाबदारी नेहमीच स्मरणात राहील. महाराष्ट्राच्या राजकारणातील जुन्या पिढीतील एक प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा सदैव उल्लेख होत राहील.- ना. हंसराज अहीरधर्मनिरपेक्ष नेत्याला देश मुकला महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष, लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहातील खासदार आणि राज्यपाल अशा महत्त्वपूर्ण भूमिकांमधून वावरणारे ज्येष्ठ नेते रा.सू. गवई यांच्या निधनाने महाराष्ट्रासह विदर्भाचीही मोठी हानी झाली आहे. आंबेडकरी विचाराने चालणाऱ्या या दलित नेत्याने समाजाच्या प्रश्नासाठी भूमिका घेत धर्मनिरपेक्षपणाला नेहमी साथ दिली. प्रगल्भ आणि संयमी नेतृत्व असलेल्या रा.सु. गवई यांनी ज्या धर्मनिरपेक्षपणे कार्य केले, ते महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.- नरेश पुगलिया, माजी खासदारगवई हे राजकीय समज असलेले नेते रा.सू . गवई हे प्रचंड राजकीय समज असलेले मोठे नेते होते. म्हणूनच जनता विश्वासाने त्यांच्या पाठीशी असायची. त्यांच्या निधनाने राज्यातील राजकारणातील वैचारिकतेची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांनी दिली आहे. रा.सू. गवई यांचा चंद्रपूर जिल्ह्याशी जवळचा संबंध होता. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे असताना त्यांच्या नेतृत्वात त्यांनी बरेच कार्य केले. रिपब्लिकन चळवळीतही गवई साहेब नेहमी आघाडीवर असत. नागपूर व चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी त्यांनी केलेले कार्य मोठे आहे. काँग्रेस व रिपब्लिकन युतीच्या काळात गवई हे दादासाहेबांसोबत होते. दलित भूमिहिनांना शेतजमिनी मिळवून देण्याच्या आंदोलनातही ते सक्रिय होते.- शांताराम पोटदुखे, माजी मंत्रीगवर्इंच्या निधनाने आंबेडकर चळवळीतील झंझावात थांबलारिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, केरळ, सिक्कीम व बिहार राज्याचे माजी राज्यपाल रा.सू. गवई यांच्या निधनाने फुले-आंबेडकरी चळवळीतील विचारांचा झंझावत थांबला आहे, अशा शब्दात विधिमंडळाचे उपगट नेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. विद्यार्थिदशेपासून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग, ज्यांनी ३० वर्ष अखंडपणे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यपद भूषविले, तसेच सभापती, उपसभापती, विरोधीपक्ष नेते अशी विविध पदे भूषविणारे, ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली अशा दीक्षाभूमीवर ऐतिहासिक बौद्ध स्तुप साकारण्यात सिंहाचा वाटा उचलणारे, तसेच अस्पृशता निर्मूलन, कुष्ठरोग या क्षेत्रात भरीव काम करणारे रा.सु.गवई यांचा राज्याच्या आणि देशाच्या राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग होता. उपेक्षित, दलित, आदिवासी आणि बहुजनांच्या प्रश्नावर सातत्याने लढा देणारा रा.सू. गवई या नेत्याला महाराष्ट्र कायमचा अंतरला आहे.- आ. विजय वडेट्टीवार