शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

आर्थिक कोंडीत शेतकऱ्यांना मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

चंद्रपूर : मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रत्येक जण संकटात आहे. असे असतानाच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीकामासाठी निंदणी तसेच ...

चंद्रपूर : मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रत्येक जण संकटात आहे. असे असतानाच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीकामासाठी निंदणी तसेच खत देण्यासाठी मजुरांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक कोंडीत सध्या शेतकरी सापडले असून नुकसान करण्यापेक्षा अतिरिक्त मजुरी देऊन शेतकरी मोकळे होत आहेत. यासाठी पैशाची जुळवाजुळव करीत आहेत.

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे सध्या शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मागील काही दिवसात मजुरांची मजुरी वाढल्यामुळे शेतकरी शेती सोडून अन्य कामाकडे वळत आहेत.

बियाणे, खते, कीटकनाशकाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढीव भावाने बियाणे व खते शेतकरी खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांना निर्धारित वेळेतच पिकांची मशागत करावी लागते. अन्यथा त्याचा काहीही उपयोग होत नाही. परिणामी पीक अत्यल्प येते. याकरिता शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त्यांना मजुरांची नितांत गरज पडते; मात्र मजुरी जास्त असल्यामुळे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

बहुतांश गावात पुरुष व स्त्री मजूर गावात मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शहरातील मजूर नेण्याकडे त्यांचा कल आहे. मात्र यासाठी वाहनाचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पीक वाया जाण्यापेक्षा खर्च केलेला बरा म्हणून शेतकरी अतिरिक्त खर्च करीत आहेत. त्यामुळे शासनाने बी-बियाणे, खतांचे भाव कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बाॅक्स

कपाशीचा खर्च परवडेना

धान उत्पादक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे; मात्र जिल्ह्यात कापूस, सोयाबीन हे पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती या तालुक्यात कापूस उत्पादन घेतले जाते; मात्र कापूस उत्पादनासाठी खूप खर्च येतो. त्यातच मजुरी परवडत नसल्याने काय करावे, या विवंचनेत शेतकरी पडले आहे.