शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

आर्थिक कोंडीत शेतकऱ्यांना मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

चंद्रपूर : मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रत्येक जण संकटात आहे. असे असतानाच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीकामासाठी निंदणी तसेच ...

चंद्रपूर : मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रत्येक जण संकटात आहे. असे असतानाच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीकामासाठी निंदणी तसेच खत देण्यासाठी मजुरांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक कोंडीत सध्या शेतकरी सापडले असून नुकसान करण्यापेक्षा अतिरिक्त मजुरी देऊन शेतकरी मोकळे होत आहेत. यासाठी पैशाची जुळवाजुळव करीत आहेत.

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे सध्या शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मागील काही दिवसात मजुरांची मजुरी वाढल्यामुळे शेतकरी शेती सोडून अन्य कामाकडे वळत आहेत.

बियाणे, खते, कीटकनाशकाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढीव भावाने बियाणे व खते शेतकरी खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांना निर्धारित वेळेतच पिकांची मशागत करावी लागते. अन्यथा त्याचा काहीही उपयोग होत नाही. परिणामी पीक अत्यल्प येते. याकरिता शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त्यांना मजुरांची नितांत गरज पडते; मात्र मजुरी जास्त असल्यामुळे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

बहुतांश गावात पुरुष व स्त्री मजूर गावात मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शहरातील मजूर नेण्याकडे त्यांचा कल आहे. मात्र यासाठी वाहनाचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पीक वाया जाण्यापेक्षा खर्च केलेला बरा म्हणून शेतकरी अतिरिक्त खर्च करीत आहेत. त्यामुळे शासनाने बी-बियाणे, खतांचे भाव कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बाॅक्स

कपाशीचा खर्च परवडेना

धान उत्पादक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे; मात्र जिल्ह्यात कापूस, सोयाबीन हे पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती या तालुक्यात कापूस उत्पादन घेतले जाते; मात्र कापूस उत्पादनासाठी खूप खर्च येतो. त्यातच मजुरी परवडत नसल्याने काय करावे, या विवंचनेत शेतकरी पडले आहे.