शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
4
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
5
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
6
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
7
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
8
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
9
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
10
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
11
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
12
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
13
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
14
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
15
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
16
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
17
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
18
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
19
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
20
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...

अन्न सुरक्षेच्या लाभार्थ्यांची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने तोंड वर काढले ...

चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने तोंड वर काढले आहे. परिणामी राज्य सरकारने प्रथम संचारबंदी त्यानंतर आता लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये गरीब तसेच गरजूंची उपासमार होऊ नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यामध्ये मोफत धान्य देण्याची घोषणा केली. मात्र, काही लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्यातील धान्य पैसे देऊन उचलल्यामुळे या लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, अशा लाभार्थ्यांना पुढील म्हणजेच मे महिन्यामध्येही मोफत धान्याचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भात शासनाने तसे निर्देश दिले आहे.

मागील काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात वर्षभरामध्ये ४७ हजार ९८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत १३ हजार ६० रुग्ण ॲक्टिव्ह आहे. अनेक रुग्णांना बेडसुद्धा मिळत नसल्याची स्थिती आहे अशीच स्थिती राज्यभरात आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रथम संचारबंदी लागू केली. मात्र, रुग्णसंख्या कमी होत नसल्याने आता लाॅकडाऊन लागू केला आहे. दरम्यान, गरीब कुटुंबातील व्यक्तींची वाताहात होऊ नये, त्यांना दिलासा मिळाला यासाठी अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिकार्ड ३५ किलो गहू तसेच तांदूळ तर प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ५ किलो गहू, तांदूळ एक महिन्यासाठी मोफत देण्याची देण्याची घोषणा केली. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, काही लाभार्थ्यांनी चालू महिन्यामध्ये स्वस्त धान्य दुकानांतून पैसे देऊन धान्य विकत घेतल्यामुळे आपल्याला लाभ मिळणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, पुरवठा विभागाने नवा आदेश काढून अशा लाभार्थ्यांना पुढील महिन्यामध्ये धान्याचा लाभ देण्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, या महिन्यामध्ये लाभार्थ्यांनी धान्य उचलले नसेल तरीही पुढील महिन्यात एप्रिलचे धान्य मोफत तसेच पुढील महिन्याचे धान्य पैसे देऊन घ्यावे लागणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

बाॅक्स

जिल्ह्यातील अंत्योदय लाभार्थी

१,३७१८७

प्राधान्य कुटुंब

२,६१,०८४

कोट

राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातील धान्य मोफत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, काही लाभार्थ्यांनी या महिन्यामध्ये पैसे देऊन धान्य उचलले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना पुढील महिन्यात मोफत धान्य मिळणार आहे तर ज्यांनी एप्रिल महिन्यातील धान्य उचलले नाही. अशाही लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

-भारत तुंबडे

अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी, चंद्रपूर