शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST

चंद्रपूर : कोरोनापूर्वी उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात विविध नाटकाचे कार्यक्रम आयोजित केले जात होते. कालांतराने शंकरपटावर न्यायालयाने बंदी आणली. ...

चंद्रपूर : कोरोनापूर्वी उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात विविध नाटकाचे कार्यक्रम आयोजित केले जात होते. कालांतराने शंकरपटावर न्यायालयाने बंदी आणली. त्यामुळे दुय्यम तमाशे व नाटक कलाकारांवर संक्रांत आली. असे असले तरी झाडीपट्टीतील गावागावांत मंडईनिमित्ताने दुय्यम नाटकाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. यातून कलाकारांना काही प्रमाणात आर्थिक लाभ तर नागरिकांचे मनोरंजन होत होते. आता मात्र कोरोनाच्या सावटात लॉकडाऊन सुरू झाल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनही हिरावून नेले आहे.

झाडीपट्टीत विविध कलेत, विविध कलाकार पारंगत असल्याने गोंधळ तसेच नाटकांना नागरिक चांगला प्रतिसाद देत होते. विशेष म्हणजे, शेती कामातून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही प्रमाणात उसंत मिळत असल्याने नाटकाच्या मैफलीसाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून अनेक जिल्ह्यांतील कलाकार येत होते. विविध गावांत नाटक आयोजित केले जायचे.

ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही या तालुक्यांसह जिवती, गोंडपिपरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसादही मिळत होता. नागरिकांच्या मनोरंजनासाठी गावकऱ्यांकडून किंवा ग्रामपंचायत व समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत होते; परंतु गावातील शंकरपट बंदी आणल्याने बंद करण्यात आले. त्यानंतर कोरोना सावट सुरू झाल्याने मागील वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रमावरच नव्हे तर भजन, कीर्तन, गोंधळ यावरही बंदी आहे. यातून जनजागृती तसेच मनोरंजनही व्हायचे. आता सर्व व्यवसाय ठप्प असल्याने विविध कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून गावातील आर्थिक चक्रही बिघडले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या नाट्य कलावंत खडीगंमत कलावंत, गोंधळ कलावंत, कव्वाल कलावंत, कीर्तनकार व अन्य कलाकारांवर कोरोनाने मोठे संकट आले आहे.

बाॅक्स

घोडे व्यावसायिकांचेही नुकसान

चंद्रपूर : कोरोनामुळे सलत दुसऱ्याही वर्षी लग्नसराईचा खोळंबा झाल्याने घोडे व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे. मागील वर्षीपासून नववधूंना हातावर मेंहदी लावण्याऐवजी सॅनिटायझर लावण्याची वेळ आली आहे. सध्या तर केवळ २५ जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभाची परवानगी आहे. त्यामुळे ना घोडे, ना बँडबाजा अशी अवस्था लग्नघरी बघायला मिळत आहे. साध्या पद्धतीने लग्नविधी झटपट उरकून घेतले जात आहेत. यामुळे नवरदेवाची घोड्यावर बसून मिरवणुकीची हौस मावळली असून घोड्यासह व्यावसायिकांच्या पोटापाण्यालाही लगाम लागला आहे.

शहर तसेच गावातील यात्रा, उत्सव व लग्नसराईत मिरवणुकीसाठी लागणारा घोडा भाडोत्री देणारे व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे व जून आदी चार महिन्यांमध्ये त्यांची चांगली कमाई असते. यावरच ते वर्ष काढतात. मात्र, सद्य:स्थितीला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विवाह सोहळ्याला प्रशासनाने मर्यादा घातल्याने लग्नसराईचा खोळंबा झाला आहे. लग्न उरकते घेतले जात आहेत.

बाॅक्स

हौस कायम

काळानुरूप लग्न सोहळ्यात आधुनिकता आली असली तरी नवरदेवाची घोड्यावरून मिरवणूक काढण्याची हौस कायम आहे. शाही घोड्यासाठी तासभर मिरवणुकीचे १० ते २० हजार रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागते; परंतु सध्या कोरोनामुळे मिरवणुकीला बंधने आल्याने नवरदेवांची हौस पूर्णच होत नाही. यामुळे लग्नसराईत घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.