शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST

चंद्रपूर : कोरोनापूर्वी उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात विविध नाटकाचे कार्यक्रम आयोजित केले जात होते. कालांतराने शंकरपटावर न्यायालयाने बंदी आणली. ...

चंद्रपूर : कोरोनापूर्वी उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात विविध नाटकाचे कार्यक्रम आयोजित केले जात होते. कालांतराने शंकरपटावर न्यायालयाने बंदी आणली. त्यामुळे दुय्यम तमाशे व नाटक कलाकारांवर संक्रांत आली. असे असले तरी झाडीपट्टीतील गावागावांत मंडईनिमित्ताने दुय्यम नाटकाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. यातून कलाकारांना काही प्रमाणात आर्थिक लाभ तर नागरिकांचे मनोरंजन होत होते. आता मात्र कोरोनाच्या सावटात लॉकडाऊन सुरू झाल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनही हिरावून नेले आहे.

झाडीपट्टीत विविध कलेत, विविध कलाकार पारंगत असल्याने गोंधळ तसेच नाटकांना नागरिक चांगला प्रतिसाद देत होते. विशेष म्हणजे, शेती कामातून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही प्रमाणात उसंत मिळत असल्याने नाटकाच्या मैफलीसाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून अनेक जिल्ह्यांतील कलाकार येत होते. विविध गावांत नाटक आयोजित केले जायचे.

ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही या तालुक्यांसह जिवती, गोंडपिपरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसादही मिळत होता. नागरिकांच्या मनोरंजनासाठी गावकऱ्यांकडून किंवा ग्रामपंचायत व समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत होते; परंतु गावातील शंकरपट बंदी आणल्याने बंद करण्यात आले. त्यानंतर कोरोना सावट सुरू झाल्याने मागील वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रमावरच नव्हे तर भजन, कीर्तन, गोंधळ यावरही बंदी आहे. यातून जनजागृती तसेच मनोरंजनही व्हायचे. आता सर्व व्यवसाय ठप्प असल्याने विविध कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून गावातील आर्थिक चक्रही बिघडले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या नाट्य कलावंत खडीगंमत कलावंत, गोंधळ कलावंत, कव्वाल कलावंत, कीर्तनकार व अन्य कलाकारांवर कोरोनाने मोठे संकट आले आहे.

बाॅक्स

घोडे व्यावसायिकांचेही नुकसान

चंद्रपूर : कोरोनामुळे सलत दुसऱ्याही वर्षी लग्नसराईचा खोळंबा झाल्याने घोडे व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे. मागील वर्षीपासून नववधूंना हातावर मेंहदी लावण्याऐवजी सॅनिटायझर लावण्याची वेळ आली आहे. सध्या तर केवळ २५ जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभाची परवानगी आहे. त्यामुळे ना घोडे, ना बँडबाजा अशी अवस्था लग्नघरी बघायला मिळत आहे. साध्या पद्धतीने लग्नविधी झटपट उरकून घेतले जात आहेत. यामुळे नवरदेवाची घोड्यावर बसून मिरवणुकीची हौस मावळली असून घोड्यासह व्यावसायिकांच्या पोटापाण्यालाही लगाम लागला आहे.

शहर तसेच गावातील यात्रा, उत्सव व लग्नसराईत मिरवणुकीसाठी लागणारा घोडा भाडोत्री देणारे व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे व जून आदी चार महिन्यांमध्ये त्यांची चांगली कमाई असते. यावरच ते वर्ष काढतात. मात्र, सद्य:स्थितीला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विवाह सोहळ्याला प्रशासनाने मर्यादा घातल्याने लग्नसराईचा खोळंबा झाला आहे. लग्न उरकते घेतले जात आहेत.

बाॅक्स

हौस कायम

काळानुरूप लग्न सोहळ्यात आधुनिकता आली असली तरी नवरदेवाची घोड्यावरून मिरवणूक काढण्याची हौस कायम आहे. शाही घोड्यासाठी तासभर मिरवणुकीचे १० ते २० हजार रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागते; परंतु सध्या कोरोनामुळे मिरवणुकीला बंधने आल्याने नवरदेवांची हौस पूर्णच होत नाही. यामुळे लग्नसराईत घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.