शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जिल्ह्यात ३६० शेततळ्यांचे काम पूर्ण

By admin | Updated: September 16, 2016 01:40 IST

शेतकऱ्यांना सहज सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम

चंद्रपूर : शेतकऱ्यांना सहज सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून सुरु केला आहे. शाश्वत आणि हक्काची सिंचन सुविधा देणाऱ्या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी १९६३ शेतकऱ्यांना शेततळे उपलब्ध करुन दिले जाणार असून आतापर्यंत ३६० शेततळे पूर्ण झाले आहेत. सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून राहावे लागते. खरीपाच्या मुख्य हंगामातही पावसाने दगा दिल्यास ही पिकेही हातचे जातात. हक्काची सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास खरीपासह अन्य पिकेही शेतकऱ्यांना घेता येवू शकतो. तसेच रब्बी व उन्हाळी पिकेही घेतली जावू शकते. यासाठी सिंचन असणे फार आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अनेक पिके घेण्यास प्रोत्साहित करण्यासोबतच या माध्यमातून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना १७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्याला सन २०१६-१७ या योजनेच्या प्रथम वर्षाकरिता १९६३ इतक्या शेततळयांचे लक्षांक देण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज करावयाचे होते. जिल्ह्यातील ३१२७ शेतकऱ्यांनी शेततळयांसाठी अर्ज सादर केले आहे. अर्जाच्या छाननीनंतर २२१४ तांत्रिक दृष्टया तसेच जागा योग्य असल्याचे आढळून आले. तालुका समितीने लक्षांकानुसार २००३ अर्जांना मंजूरी दिली आहे. शेततळ्यांसाठी शासनाच्या वतीने कमाल ५० हजारापर्यंत अनुदान मंजूर केल्या जाते. समितीने मंजूर केलेल्या अर्जांपैकी १७१६ अर्जदार शेतकऱ्यांना शेततळे खोदण्याच्या कामास कायार्रंभ आदेश दिले असून ३६० शेततळे खोदून पूर्ण झाली आहे. जिल्ह्याला दिलेल्या लक्षांकापैकी सर्व शेततळे याचवर्षी पूर्ण होणार आहेत. शेततळे पूर्ण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची यापूर्वी सुविधा नव्हती, अशा शेतकऱ्यांना सहज शेततळे संजिवनी देणारे ठरणार आहे. शिवाय एकापेक्षा जास्त पिके शेतकरी शेततळयातील पाण्याच्या भरवशावर घेणार असल्याने त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासोबतच जिवनमान उंचावण्यासही मोलाचे ठरणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)