शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करा : रामदास आठवले

By admin | Updated: April 28, 2016 00:45 IST

गौतम बुद्धांनी जी संपूर्ण जगाला शिकवण दिली, त्याचा वसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालविला.

वरोरा: गौतम बुद्धांनी जी संपूर्ण जगाला शिकवण दिली, त्याचा वसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालविला. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन रिपाईचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी वरोरा येथील रत्नमाला चौकात केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षनिमित्त खा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात जाती तोडो भारत जोडो समता अभियान अंतर्गत भारत भिम यात्रा आयोजित करण्यात आली आहे. भारत भिम यांत्रा २६ जानेवारीपासून कन्याकुमारी येथून निघाली असून १ मे रोजी मध्यप्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महु येथील जन्मभूमीमध्ये समारोप करण्यात येणार आहे. भारत भिम यात्रेचे वरोरा शहरातील रत्नमाला चौकात रिपाई ए गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. सध्या भारतात काही जातीय शक्ती डोकेवर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याकरिता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. आजही जाती धर्माच्या नावावर संघर्ष निर्माण होत आहे. आजही जाती प्रथा देशात पाळण्यात येत आहे. ते मिटविण्याचे आवाहन खा. आठवले यांनी केले. भारत भीम यात्रेला सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. यावेळी रिपाई (ए) तालुका अध्यक्ष बंडू लभाने, विनोद वानखेडे, सुनिल गायकवाड, दर्शन वाघमारे, अतुल वानखडे, धर्मा जीवने, मेघा लिहितकर, रुपा तांबे, वनिता बारसागडे, सुमन भगत, सुरेश मेश्राम, बापू रामटेके आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)