शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

पालकांची खासदारांकडे तक्रार

By admin | Updated: July 21, 2014 23:46 IST

स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व विद्यालयात शिक्षकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक यांच्यात समन्वय नसल्याने दिवसेंदिवस येथे समस्या वाढत आहे. याकडे व्यवस्थापन मंडळाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.

हरिश्चंद्र पाल - तळोधी(बा.)स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व विद्यालयात शिक्षकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक यांच्यात समन्वय नसल्याने दिवसेंदिवस येथे समस्या वाढत आहे. याकडे व्यवस्थापन मंडळाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. परिणामी पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात आता पालकांनी कठोर भूमिका घेतली असून खासदार, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शालेय प्रशासनाच्या विरोधात चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्याकडे तक्रार केली. सोबतच या निवेदनाच्या प्रती निदेशक, जन शिकायत, नवोदय विद्यालय समिती दिल्ली, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी (माध्य.) चंद्रपूर, प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा.) यांना पाठविल्या आहे. विशेष म्हणजे या निवेदनामध्ये साठ ते सत्तर पालकांच्या स्वाक्षरी आहे.पालकांनी दिलेल्या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकासावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. विद्यालयातील मेस, गणवेष व इतर अनुदानात वाढ होवूनही विद्यार्थ्यांना सकस व समतोल आहार दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी अर्धेपोटी असतात. मागील एका वर्षापासून फळ देणे बंद केले आहे. भोजनगृहात जेवणापूर्वी हात धुण्याकरिता साबण किंवा वॉशींग पावडरची व्यवस्था नाही. पिण्याचे पाण्याचे आरोक्युरिफायर संयत्र पूर्णत: बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे दात, केस व डोळे तसेच आतळ्याचे आजाराचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थी निवास परिसरात नियमित पाणी पुरवठा होत नाही. निवास परिसरातील प्रसाधनगृहात पाण्याचा पुरेसा वापर होत नसल्याने दुर्गंधी आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.वर्ग ९ ते १२ या माध्यमिक वर्गात भौतिकशास्त्र व गणित विषयाचे अध्यापन व्यवस्थीत होत नसून अभ्यासक्रम पूर्ण केला जात नाही. परिणामी दरवर्षी बरेच विद्यार्थी जळगाव, नागपूर, नाशिक व चंद्रपूर येथे खासगी शिकवणीकडे धाव घेतात. मागील वर्षेभरात पीटीसीचीची बैठक झाली नाही. नवोदय विद्यालय परिसरातील साफसफाई विद्यार्थ्यांकडून करुन घेतली जात आहे. मुल्यशिक्षणावर भर दिला जात नसल्याने विद्यालयात मोबाईलच गैरवापर रॅगिंग व चोरी या सारखे वाईट कृत्य विद्यार्थ्यांकडून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यालयातील काही कर्मचारी, शिक्षक व प्राचार्य पालकांसोबत अरेरावीची भाषा करतात. विद्यार्थ्यांकडून समस्यांबाबत आवाज केल्यास त्यांना धमकावून मानसिक व शारीरिक छळ करुन शाळेतून काढण्याची धमकी ते असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.