शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

पालकांची खासदारांकडे तक्रार

By admin | Updated: July 21, 2014 23:46 IST

स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व विद्यालयात शिक्षकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक यांच्यात समन्वय नसल्याने दिवसेंदिवस येथे समस्या वाढत आहे. याकडे व्यवस्थापन मंडळाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.

हरिश्चंद्र पाल - तळोधी(बा.)स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व विद्यालयात शिक्षकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक यांच्यात समन्वय नसल्याने दिवसेंदिवस येथे समस्या वाढत आहे. याकडे व्यवस्थापन मंडळाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. परिणामी पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात आता पालकांनी कठोर भूमिका घेतली असून खासदार, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शालेय प्रशासनाच्या विरोधात चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्याकडे तक्रार केली. सोबतच या निवेदनाच्या प्रती निदेशक, जन शिकायत, नवोदय विद्यालय समिती दिल्ली, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी (माध्य.) चंद्रपूर, प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा.) यांना पाठविल्या आहे. विशेष म्हणजे या निवेदनामध्ये साठ ते सत्तर पालकांच्या स्वाक्षरी आहे.पालकांनी दिलेल्या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकासावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. विद्यालयातील मेस, गणवेष व इतर अनुदानात वाढ होवूनही विद्यार्थ्यांना सकस व समतोल आहार दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी अर्धेपोटी असतात. मागील एका वर्षापासून फळ देणे बंद केले आहे. भोजनगृहात जेवणापूर्वी हात धुण्याकरिता साबण किंवा वॉशींग पावडरची व्यवस्था नाही. पिण्याचे पाण्याचे आरोक्युरिफायर संयत्र पूर्णत: बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे दात, केस व डोळे तसेच आतळ्याचे आजाराचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थी निवास परिसरात नियमित पाणी पुरवठा होत नाही. निवास परिसरातील प्रसाधनगृहात पाण्याचा पुरेसा वापर होत नसल्याने दुर्गंधी आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.वर्ग ९ ते १२ या माध्यमिक वर्गात भौतिकशास्त्र व गणित विषयाचे अध्यापन व्यवस्थीत होत नसून अभ्यासक्रम पूर्ण केला जात नाही. परिणामी दरवर्षी बरेच विद्यार्थी जळगाव, नागपूर, नाशिक व चंद्रपूर येथे खासगी शिकवणीकडे धाव घेतात. मागील वर्षेभरात पीटीसीचीची बैठक झाली नाही. नवोदय विद्यालय परिसरातील साफसफाई विद्यार्थ्यांकडून करुन घेतली जात आहे. मुल्यशिक्षणावर भर दिला जात नसल्याने विद्यालयात मोबाईलच गैरवापर रॅगिंग व चोरी या सारखे वाईट कृत्य विद्यार्थ्यांकडून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यालयातील काही कर्मचारी, शिक्षक व प्राचार्य पालकांसोबत अरेरावीची भाषा करतात. विद्यार्थ्यांकडून समस्यांबाबत आवाज केल्यास त्यांना धमकावून मानसिक व शारीरिक छळ करुन शाळेतून काढण्याची धमकी ते असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.