शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

समितीने दिला करकपातीचा प्रस्ताव

By admin | Updated: April 13, 2016 01:15 IST

महानगर पालिकेने कर आकारणी करताना मालमत्ताधारकांवर अधिकचा बोझा पडणार नाही, याची जाणिव ठेवावी आणि किमान १५ टक्के कर कपात करावी,

झोपड्यांवरचा भार हलका करा : कर मूल्यांकन प्रक्रिया समितीची शिफारसचंद्रपूर : महानगर पालिकेने कर आकारणी करताना मालमत्ताधारकांवर अधिकचा बोझा पडणार नाही, याची जाणिव ठेवावी आणि किमान १५ टक्के कर कपात करावी, असा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या कर मूल्यांकन प्रक्रिया समितीच्या दुसऱ्या बैठकीत ठेवण्यात आला. हा अंतिम प्रस्ताव पुढील प्रक्रियेसाठी महापौरांकडे पाठविला जाणार असून त्यावर सभागृहात निर्णय होणार आहे.या समितीची पहिली बैठक ६ एप्रिलला पार पडली. त्यानंतर दुसरी बैठक मंगळवारी सायंकाळी ५ वाजता महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात समितीचे अध्यक्ष संतोष लहामगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला मनपाचे उपायुक्त तथा समितीचे सचिव विजय इंगोले, मनपाचे सभागृह नेता रामू तिवारी, गटनेता अनिल फुलझेले, झोन क्रमांक १ च्या सभापती अंजली घोटेकर, राष्ट्रवादीचे गटनेता संजय वैद्य, शिवसेनेचे गटनेते संदीप आवारी, नगरसेवक प्रवीण पडवेकर, नंदू नागरकर, धनंजय हुड, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक भुक्ते, वकील असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सपाटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर उपस्थित होते. नगरसेवक प्रवीण पडवेकर यांनी विचारलेल्या, मालमत्ता कराचे सर्वेक्षण तज्ज्ञांकडून करण्यात आले का, या प्रश्नावरून प्रारंभी खडाजंगी उडाली. बैठकीतील वातावरण वेगळ्या वळणावर जात असल्याचे बघून वकील असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सपाटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार आदींनी ही बैठक राजकीय विषयासाठी नसून नागरिकांवरील कराचा भार कमी करण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यासाठी असल्याचे निदर्शनास आणून दिले. नगरसेवक संजय वैद्य यांनीही या बैठकीत मनपाच्या सभागृहाबाहेरील प्रतिष्ठित सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे भान सदस्यांनी ठेवण्याची सूचना केली. त्यानंतर वातावरण निवळून पुन्हा चर्चेला सुरूवात झाली.सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांनी आपआपली मते मांडली. त्यावर विचारमंथन होऊन सरासरी १५ टक्के कर कपात केली जावी, असा सूर उमटला. महानगर पालिकेने आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मालमत्ताधारकांवर कराचा अधिक बोझा न टाकता अन्य उपाययोजना कराव्या, मात्र सर्वसामान्य नागरिकांवर कराचे दडपण आणून नये, असा प्रस्ताव हर्षवर्धन सिंघवी यांनी मांडला. २०१५-१६ या वर्षापासून होणाऱ्या कराच्या अकारणीमध्ये अग्नीशमन सेवा कर (मालमत्ता कराच्या) दोन टक्के, रस्ता शुल्क पाच टक्के आणि पाणी शुल्क दोन टक्के असा अंतर्भाव करण्यात आला आहे. हे तिन्ही कर रद्द करण्याची शिफारस समितीच्या सदस्यांनी केली. या सोबतच, स्वच्छता कर पाच टक्यांवरून तीन टक्के आकारण्याची शिफारसही करण्यात आली. उच्च, मध्यम आणि निम्न वस्तींमधील झोपड्यांसाठी प्रत्येकी १४०, १०० आणि ६० रूपये असे दर लावण्यात आले आहेत. ते रद्द करून सर्व वस्ती प्रकारातील झोपड्यांसाठी ६० रूपये दर लावण्याचा तसेच खुल्या भूखंडासाठी १२ रूपये दर लावण्याचा प्रस्ताव समितीने दिला. या सोबतच, नवीन बांधकाम आणि घराचे नूतनीकरण यातील फरक लक्षात घेऊन दर लावले जावे, त्यासाठी योग्य सर्वेक्षण व्हावे, अशी सूचनाही समितीने केली.मालमत्ता कराच्या मूल्यांकनावर आक्षेप घेणारे २७ हजार २२९ नागरिकांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी २२ हजार ५८५ नागरिकांनी उपस्थित राहून आक्षेप नोंदविले. त्यातील सुमारे दीड हजार नागरिकांच्या मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण झाले. याचा अर्थ २७ हजार मालमत्ताधारकांचे समाधान झाले, असे समजणे चुकीचे असल्याचे यावेळी गोपालकृष्ण मांडवकर यांनी निदर्शनास आणून दिले. आक्षेप नोंदविणाऱ्यांचे कसल्याही प्रकारे समाधान झाले नसल्याची बाब विजय चंदावार यांनी सप्रमाण निदर्शनास आणून दिली. हे लक्षात घेऊन, नागरिकांना आक्षेप नोदविण्यासाठी संधी दिली जाईल, असे समितीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. सामाजिक संस्थांना व्यावसायिक आकारणी न करता करातून वगळावे, अशी सूचना नगरसेवक नंदू नागरकर यांनी मांडली. व्यावसायिक वापरासाठी भाड्याने दिलेल्या मालमत्तांपासून मालमत्ता मालकास मिळणारे उत्पन्न कर आकारणी करताना विचारात घेतले जावे, अशीही सूचना यावेळी करण्यात आली. या समितीने केलेल्या शिफारशींचा प्रस्ताव महापौरांकडे सादर केला जाणार आहे. त्यावर सभागृहात चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)