शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

पर्यायी पिकांबरोबरच ‘युवाग्राम’चा मेळ

By admin | Updated: October 11, 2015 02:13 IST

देशातील कृषीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन नवीन काही घेता येईल,

सोमनाथ प्रकल्प : ८ बंधारे, २४ तलाव, १९ विहिरी, युवकांना मिळाला रोजगारराजू गेडाम मूलदेशातील कृषीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन नवीन काही घेता येईल, यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन नवा अविष्कार घडविण्याचा प्रयत्न सोमनाथ प्रकल्पात सुरू असतो. या सगळ्याचा परिणाम म्हणून सोमनाथ हे केवळ लोकसंख्येवर नव्हे तर दर्जा आणि नव्या प्रयोगांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील आदर्श शेती करणारे गाव ठरले आहे. शेतीवर भाताचे पीक न घेता पर्यायी पिके घ्यावीत. जेणेकरुन इतरत्र जावून भाजीपाला घ्यावा लागणार नाही. ही बाब हेरून पर्यायी पिकांची कल्पना साकारण्यात आली. या पर्यायी पिकांबरोबरच मेळ साधला गेला बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी ‘युवाग्राम’ चा. यामुळे बेरोजगार युवकांना स्वत:च्या पायावर आत्मनिर्भर राहण्याचा नवा आत्मविश्वास ‘सोमनाथ’ मधून मिळाला.सोमनाथ येथे पाणी अडवून बंधारे बांधल्या गेल्याने पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात झाली. यातून धान्य पिकाबरोबरच पर्यायी पिकांची लागवड केल्या गेली तर सोमनाथ येथे वास्तव्य करणाऱ्यांना भाजीपाला व इतर बाबीसाठी बाहेर जावे लागणार नाही, हे हेरुन भाजीपाला व इतर फळभाज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात विविध पालेभाज्या व फळभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. गरजेएवढा भाजीपाला प्रकल्पात ठेऊन शिल्लक भाजीपाला बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्यात येतो. यामुळे भाजीपाला उत्पादनासोबतच आर्थिक उत्पन्नातदेखील वाढ झाली. पर्यायी पिकांत गहू, हरबरा, तूर, हळद, उस तसेच इतर पिकाची लागवड केल्याने सोमनाथ हे सर्वसपन्न ठिकाण संबोधल्या जाऊ लागले. धानाचे उत्तम पीक, त्यानंतर पर्यायी पिकातून आलेले यश बघता, परिसरातील बेरोजगार युवकांना शेतीचा अभ्यास करुन आपआपल्या गावात अनुकरणातून शिकता यावे, यासाठी ‘युवाग्राम’ म्हणून प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सन १९९५ पासून ‘युवाग्राम’ यातून परिसरातील दहावी, बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आजही केला जातो. सोमनाथ येथे विद्यार्थ्यांना जेवणाबरोबर राहण्याचीसुद्धा सोय केली जाते. सोमनाथमधील निरनिराळ्या कामांमध्ये सामावून घेण्यात येते. यात ही मुले शेती, डेअरी, इलेक्ट्रीशियन, फॅब्रिकेशन तसेच शेतीच्या उपकरणांच्या दुरुस्ती व देखभालीचे कामदेखील दिल्या जाते. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर इतरत्र मारुन आपला स्वत:चा व्यवसाय करण्यास ते सक्षम बनलेले असतात. शासन सर्वांनाच नोकरी देणे शक्य नसल्याने सोमनाथ येथे होत असलेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला तर स्वत:च्या पायावर आत्मनिर्भर राहण्याचा आत्मविश्वास नक्कीच निर्माण होताना दिसून येतो.सोमनाथ येथे पुरक व्यवसायाला जोड दिली आहे, ती पशुपालन, शेळीपालन व मत्स्यपालनाची. आजच्या स्थितीत पशुपालनावर दुग्ध उत्पादनाचा उच्चांक गाठला गेला आहे. शेळीपालन यशस्वी झाले असून शेळ्या व बोकडांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यात विशेष म्हणजे मत्स्यपालन प्रकल्प सोमनाथ येथे यशस्वी झाला असून लाखो रुपयांचे मासे विक्री केले जात आहेत. मत्स्यपालन संस्थानाच ते देत असल्याने वर्षभर मासे पकडून विक्रीसाठी दूरपर्यंत नेले जातात. सोमनाथ येथे विविध पिकांबरोबर व्यवसायाभिमुख शेळी, मत्स, पशु पालनावर भर दिल्याने हा व्यवसाय देखील येथे यशस्वी होऊ शकतो ही प्रेरणा इतरांना देता येऊ लागली आहे. याच बरोबरच १० व १२ च्या विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न येथे करण्यात येत आहे. बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न येथे होताना दिसत आहे.