शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जिल्हाधिकारी कार्यालयावर संभाजी ब्रिगेडची धडक

By admin | Updated: October 3, 2015 00:54 IST

जिल्ह्यातील कापूस पिकावर झालेल्या मर रोगामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतातील पिके करपत आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्यातील कापूस पिकावर झालेल्या मर रोगामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतातील पिके करपत आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून संभाजी ब्रिगेडनेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाला मदतीसाठी साकडे घातले आहे. शेतातील करपलेली झाडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी धडक दिली. चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होत असताना त्यात कोरडा दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यासाठी वारंवार संभाजी ब्रिगेडने निवेदन देत असताना त्यावर दुर्लक्ष होत आहे. अवकाळी पावसामुळे कपाशी पिकावर मर रोग आल्याने संपूर्ण शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असून शासनाने यावर त्वरीत उपाय करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरुण आंदोलन करेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विनोद थेरे, तालुकाध्यक्ष दीपक खारकर, महानगर कार्याध्यक्ष विवेक बोरीकर यांनी दिला. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हा कृषी अधीक्षक निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे चंद्रकांत वैद्य, मंगेश चटकी, चंद्रशेखर झाडे, रुपेश सोनेकर, निमकर, महेश जेनेकर, शंकर भोगेकर, मारोती बरडे, दशरथ आत्राम, राहुल जेनेकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)