शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयावर संभाजी ब्रिगेडची धडक

By admin | Updated: October 3, 2015 00:54 IST

जिल्ह्यातील कापूस पिकावर झालेल्या मर रोगामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतातील पिके करपत आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्यातील कापूस पिकावर झालेल्या मर रोगामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतातील पिके करपत आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून संभाजी ब्रिगेडनेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाला मदतीसाठी साकडे घातले आहे. शेतातील करपलेली झाडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी धडक दिली. चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होत असताना त्यात कोरडा दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यासाठी वारंवार संभाजी ब्रिगेडने निवेदन देत असताना त्यावर दुर्लक्ष होत आहे. अवकाळी पावसामुळे कपाशी पिकावर मर रोग आल्याने संपूर्ण शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असून शासनाने यावर त्वरीत उपाय करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरुण आंदोलन करेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विनोद थेरे, तालुकाध्यक्ष दीपक खारकर, महानगर कार्याध्यक्ष विवेक बोरीकर यांनी दिला. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हा कृषी अधीक्षक निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे चंद्रकांत वैद्य, मंगेश चटकी, चंद्रशेखर झाडे, रुपेश सोनेकर, निमकर, महेश जेनेकर, शंकर भोगेकर, मारोती बरडे, दशरथ आत्राम, राहुल जेनेकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)