शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था

By admin | Updated: June 24, 2017 00:41 IST

शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम केले.

१८ लाखांचा खर्च : अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम केले. परंतु कामातील त्रुट्यांमुळे केवळ वर्षभरातच हा बंधारा निरूपयोगी ठरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. पण अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व अनास्थेमुळे अनेक हितोपयोगी अभियानाची पुरती वाट लागत आहे. असाच एका विभागाच्या नाकर्तेपणा उघड्यावर आला आहे. येथील जिल्हा परिषद लघुसिंचाई विभागाने मागील वर्षी शहरालगत १८ लाखांचा कोल्हापुरी बंधारा बांधला आहे. परंतु नियोजनशून्य काम व तांत्रिक बाबी धाब्यावर बसविण्यात आल्याने वर्षभरातच हा बंधारा निकामी ठरला आहे. त्यामुळे या प्रकारणाची चौकशी करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होत आहे.लघुसिंचन विभागाच्या अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे या बंधाऱ्याचे तीन पिलर बाहेर निघाले. पिल्लरचे काम एकाच रेषेत नसल्याने कामात कुठेही सुसूत्रता दिसत नाही. लोखंडी सळाखीचा अल्पवापर करण्यात आला आहे. नियोजनबद्ध ढुलाई अभावी अनेक सळाखी उघड्यावर पडल्या आहेत. सोबतच क्युरिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हा बंधारा एका वर्षात कुचकामी ठरला आहे. बंधाऱ्याची बाजूची भिंत अक्षरश: कोसळली आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूची अंदाजे १५ ते २० फूट जमीन खोदल्या गेली आहे. अंदाजपत्रकातील दिशानिर्देश व तांत्रिक बाबीला केराची टोपली दाखविण्यात आल्याने निधीचा चुराडा झाला आहे. या बंधाऱ्याच्या दुरवस्थेला विभागाचे अभियंते जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. एका वर्षातच बंधारा स्वाहा झाला असतानाही अभियंत्यांना मात्रो या कामाचे काही देणेघेणे नसल्याचा प्रत्यय आला आहे. विदर्भ सघन सिंचन योजनेतून काम जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने विदर्भ सघन सिंचन योजनेअंतर्गत शहरालगत पेट्रोलपंपाच्या मागे १८ लाखांचा कोल्हापुरी बंधारा बांधला आहे. बंधाऱ्यात साचलेल्या पाण्यातून परिसरातील शेती सुजलाम - सुफलाम होईल. त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, ही अपेक्षा होती. पण अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे १८ लाखांच्या निधीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. काम सुरु करण्यात आल्यावर सर्व जबाबदारी कंत्राटदारावर सोपवून अभियंत्यानी बंधाऱ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने मनमानी पद्धतीने आपल्या सोईनुसार काम केले.