शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था

By admin | Updated: June 24, 2017 00:41 IST

शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम केले.

१८ लाखांचा खर्च : अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम केले. परंतु कामातील त्रुट्यांमुळे केवळ वर्षभरातच हा बंधारा निरूपयोगी ठरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. पण अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व अनास्थेमुळे अनेक हितोपयोगी अभियानाची पुरती वाट लागत आहे. असाच एका विभागाच्या नाकर्तेपणा उघड्यावर आला आहे. येथील जिल्हा परिषद लघुसिंचाई विभागाने मागील वर्षी शहरालगत १८ लाखांचा कोल्हापुरी बंधारा बांधला आहे. परंतु नियोजनशून्य काम व तांत्रिक बाबी धाब्यावर बसविण्यात आल्याने वर्षभरातच हा बंधारा निकामी ठरला आहे. त्यामुळे या प्रकारणाची चौकशी करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होत आहे.लघुसिंचन विभागाच्या अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे या बंधाऱ्याचे तीन पिलर बाहेर निघाले. पिल्लरचे काम एकाच रेषेत नसल्याने कामात कुठेही सुसूत्रता दिसत नाही. लोखंडी सळाखीचा अल्पवापर करण्यात आला आहे. नियोजनबद्ध ढुलाई अभावी अनेक सळाखी उघड्यावर पडल्या आहेत. सोबतच क्युरिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हा बंधारा एका वर्षात कुचकामी ठरला आहे. बंधाऱ्याची बाजूची भिंत अक्षरश: कोसळली आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूची अंदाजे १५ ते २० फूट जमीन खोदल्या गेली आहे. अंदाजपत्रकातील दिशानिर्देश व तांत्रिक बाबीला केराची टोपली दाखविण्यात आल्याने निधीचा चुराडा झाला आहे. या बंधाऱ्याच्या दुरवस्थेला विभागाचे अभियंते जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. एका वर्षातच बंधारा स्वाहा झाला असतानाही अभियंत्यांना मात्रो या कामाचे काही देणेघेणे नसल्याचा प्रत्यय आला आहे. विदर्भ सघन सिंचन योजनेतून काम जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने विदर्भ सघन सिंचन योजनेअंतर्गत शहरालगत पेट्रोलपंपाच्या मागे १८ लाखांचा कोल्हापुरी बंधारा बांधला आहे. बंधाऱ्यात साचलेल्या पाण्यातून परिसरातील शेती सुजलाम - सुफलाम होईल. त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, ही अपेक्षा होती. पण अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे १८ लाखांच्या निधीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. काम सुरु करण्यात आल्यावर सर्व जबाबदारी कंत्राटदारावर सोपवून अभियंत्यानी बंधाऱ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने मनमानी पद्धतीने आपल्या सोईनुसार काम केले.