शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

गुंडप्रवृत्तीवर प्रतिबंध घालण्यासाठी कोठारी बंद

By admin | Updated: June 14, 2014 23:27 IST

येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली.

कोठारी : येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली. मात्र यावर योग्य कारवाई करण्यात आली नाही. उलट आरोपींना बचावात्मक कारवाई करण्यात आल्याने गावकऱ्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलीस प्रशासनाविरुद्ध व गुंड प्रवृतीच्या टोळक्यांवर कडक कारवाई करावी यासाठी कोठारी बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला.कोठारी बस स्थानक परिसरात नितीन खाडीलकर यांचे कोल्ड्रीक्स व उपहार गृह आहे. ९ जून च्या रात्री ८ वाजताच्या दरम्यान अक्रम युनूस शेख याने आपल्या सहकार्यासह शितपेय घेतले. त्याची जूनी उधारी थकित होती. त्याची मागणी करताच त्याने नितीन खाडीलकर याला मारहाण केली. थोड्याचवेळात अक्रमचा भाऊ शारीफ व इरफान त्याठिकाणी येवून नितीनचे वडील रमेश व आई सुंदराबाई यांना सामूहिकपणे फायटर हत्याराने मारपिट केली. यात नितीन तसेच त्याच्या आईवडील जखमी झाले. याबाबतची तक्रार कोठारी पोलीस ठाण्यात करण्यात आली. रात्री तीन वाजता आरोपींना जामिनावर सोडण्यात आले. मारपीट करुन गावात दहशत पसरविणे तसेच गावात अवैध व्यवसाय करण्याचा या टोळक्यांचा व्यवसाय आहे. त्याच्या विरोधात बोलणाऱ्यास धमक्या देवून मारहाण करण्यात येते. अशा युवकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. असे असताना पोलिसांनी त्यांना पाठिशी घालून बचाव केला. सदर प्रकरणाने संतापलेल्या कोठारीकरांनी शनिवारी कोठारीत कडकडीत बंद ठेवून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पोलीस प्रशासनाविरुद्ध नारेबाजी करण्यात आली. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड, कोठारीचे ठाणेदार अरुण खुटेमाटे यांना निवेदन देवून प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी कोठारीचे व्यापारी, समाजसेवी संस्था, पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली. यात शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष राजू दारी, मनसे तालुका प्रमुख विष्णू बुजोणे, शिवसेना तालुका प्रमुख आशिष देवतळे, शहर अध्यक्ष बाबा साहू, संजय खाडीलकर, मोरेश्वर लोहे, सुरेश तपासे किशोर कोटरंगे, सुरेश चहारे, शंकर भरारकर आदींनी निवेदन दिले. तीन दिवसात पोलिसांनी ठोस कारवार्ई करुन आरोपींना जेरबंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी पोलिसांना दिला आहे. (वार्ताहर)