शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

गुंडप्रवृत्तीवर प्रतिबंध घालण्यासाठी कोठारी बंद

By admin | Updated: June 14, 2014 23:27 IST

येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली.

कोठारी : येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली. मात्र यावर योग्य कारवाई करण्यात आली नाही. उलट आरोपींना बचावात्मक कारवाई करण्यात आल्याने गावकऱ्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलीस प्रशासनाविरुद्ध व गुंड प्रवृतीच्या टोळक्यांवर कडक कारवाई करावी यासाठी कोठारी बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला.कोठारी बस स्थानक परिसरात नितीन खाडीलकर यांचे कोल्ड्रीक्स व उपहार गृह आहे. ९ जून च्या रात्री ८ वाजताच्या दरम्यान अक्रम युनूस शेख याने आपल्या सहकार्यासह शितपेय घेतले. त्याची जूनी उधारी थकित होती. त्याची मागणी करताच त्याने नितीन खाडीलकर याला मारहाण केली. थोड्याचवेळात अक्रमचा भाऊ शारीफ व इरफान त्याठिकाणी येवून नितीनचे वडील रमेश व आई सुंदराबाई यांना सामूहिकपणे फायटर हत्याराने मारपिट केली. यात नितीन तसेच त्याच्या आईवडील जखमी झाले. याबाबतची तक्रार कोठारी पोलीस ठाण्यात करण्यात आली. रात्री तीन वाजता आरोपींना जामिनावर सोडण्यात आले. मारपीट करुन गावात दहशत पसरविणे तसेच गावात अवैध व्यवसाय करण्याचा या टोळक्यांचा व्यवसाय आहे. त्याच्या विरोधात बोलणाऱ्यास धमक्या देवून मारहाण करण्यात येते. अशा युवकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. असे असताना पोलिसांनी त्यांना पाठिशी घालून बचाव केला. सदर प्रकरणाने संतापलेल्या कोठारीकरांनी शनिवारी कोठारीत कडकडीत बंद ठेवून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पोलीस प्रशासनाविरुद्ध नारेबाजी करण्यात आली. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड, कोठारीचे ठाणेदार अरुण खुटेमाटे यांना निवेदन देवून प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी कोठारीचे व्यापारी, समाजसेवी संस्था, पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली. यात शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष राजू दारी, मनसे तालुका प्रमुख विष्णू बुजोणे, शिवसेना तालुका प्रमुख आशिष देवतळे, शहर अध्यक्ष बाबा साहू, संजय खाडीलकर, मोरेश्वर लोहे, सुरेश तपासे किशोर कोटरंगे, सुरेश चहारे, शंकर भरारकर आदींनी निवेदन दिले. तीन दिवसात पोलिसांनी ठोस कारवार्ई करुन आरोपींना जेरबंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी पोलिसांना दिला आहे. (वार्ताहर)