शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी शाळांचे साडेतीनशे संगणक बंद

By admin | Updated: October 24, 2016 00:51 IST

ई-लर्निंग या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांना संगणक वितरीत करून...

जिल्हा परिषद शाळांतील स्थिती : पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्षचंद्रपूर : ई-लर्निंग या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांना संगणक वितरीत करून तेथील विद्यार्थ्यांना संगणकीय धडे देण्याचे काम प्रशासनस्तरावरून सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ९०० शाळांना संगणक वितरीत करण्यात आले. मात्र संगणक व्यवस्थापनासाठी निधीची तरतुद करण्यात न आल्याने तब्बल ३५० संगणक शाळांमध्ये बंद अवस्थेत पडले आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कुठेही मागे राहू नये, यासाठी जिल्हा परिषद शाळांना संगणक पुरविण्याचे काम सुरू आहे. यातून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे दिले जात आहेत. मात्र संगणकात बिघाड झाल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी निधीची तरतुदच करण्यात आलेली नाही. परिणामी जिल्हाभरातील शाळांमध्ये तब्बल ३५० संगणक बंद पडून असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद शाळांमधील रोडावलेली विद्यार्थी संख्या दूर करण्यासाठी खासगी शाळांसारख्या सोयीसुविधा देण्याचे काम जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांना सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना ९०० संगणक वाटप करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्रशासनाचे कोट्यवधी रुपयाचे अंदाजपत्रक आहे. यातून लोकपयोगी विविध योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात येते. मात्र अनेक विभागाचा निधी दरवर्षी अखर्चित असते. ज्यासाठी निधीची तरतुद आवश्यक आहे, अशा कामांसाठी निधीची तरतुद होत नसल्याने अनेक शाळांमधील संगणक सध्या धुळखात पडले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)दुरूस्तीचा प्रश्नवाटप करण्यात आलेले संगणक काही वर्षे सुस्थितीत होते. मात्र, आता यातील अनेक संगणक लहानसहान कारणांमुळे बंद पडले आहेत. संगणकांचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने निधीची तरतुदच केलेली नाही. बिघाड झालेल्या संगणकाची दुरुस्ती तरी कशी करायची, असा प्रश्न शाळांतील मुख्याध्यापकांना पडला आहे.