शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

निधीअभावी शाळांचे साडेतीनशे संगणक बंद

By admin | Updated: October 24, 2016 00:51 IST

ई-लर्निंग या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांना संगणक वितरीत करून...

जिल्हा परिषद शाळांतील स्थिती : पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्षचंद्रपूर : ई-लर्निंग या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांना संगणक वितरीत करून तेथील विद्यार्थ्यांना संगणकीय धडे देण्याचे काम प्रशासनस्तरावरून सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ९०० शाळांना संगणक वितरीत करण्यात आले. मात्र संगणक व्यवस्थापनासाठी निधीची तरतुद करण्यात न आल्याने तब्बल ३५० संगणक शाळांमध्ये बंद अवस्थेत पडले आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कुठेही मागे राहू नये, यासाठी जिल्हा परिषद शाळांना संगणक पुरविण्याचे काम सुरू आहे. यातून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे दिले जात आहेत. मात्र संगणकात बिघाड झाल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी निधीची तरतुदच करण्यात आलेली नाही. परिणामी जिल्हाभरातील शाळांमध्ये तब्बल ३५० संगणक बंद पडून असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद शाळांमधील रोडावलेली विद्यार्थी संख्या दूर करण्यासाठी खासगी शाळांसारख्या सोयीसुविधा देण्याचे काम जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांना सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना ९०० संगणक वाटप करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्रशासनाचे कोट्यवधी रुपयाचे अंदाजपत्रक आहे. यातून लोकपयोगी विविध योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात येते. मात्र अनेक विभागाचा निधी दरवर्षी अखर्चित असते. ज्यासाठी निधीची तरतुद आवश्यक आहे, अशा कामांसाठी निधीची तरतुद होत नसल्याने अनेक शाळांमधील संगणक सध्या धुळखात पडले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)दुरूस्तीचा प्रश्नवाटप करण्यात आलेले संगणक काही वर्षे सुस्थितीत होते. मात्र, आता यातील अनेक संगणक लहानसहान कारणांमुळे बंद पडले आहेत. संगणकांचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने निधीची तरतुदच केलेली नाही. बिघाड झालेल्या संगणकाची दुरुस्ती तरी कशी करायची, असा प्रश्न शाळांतील मुख्याध्यापकांना पडला आहे.