शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

स्वच्छता मोहीम गतिमान करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:29 IST

पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी बल्लारपूर : जिल्ह्यातील अनेक गावात पाणीपुरवठ्याची बोंब आहे. पाण्याच्या टाक्या असून त्या शोभेच्या वास्तू ठरल्या ...

पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी

बल्लारपूर : जिल्ह्यातील अनेक गावात पाणीपुरवठ्याची बोंब आहे. पाण्याच्या टाक्या असून त्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. पाणीपुरवठा योजना मंजूर असतानाही पाणी मिळत नसल्याने अनेक गावातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे. उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची गरज जास्त आहे.

शेतीपूरक योजना गावात पोहोचविण्याची गरज

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील जनता शेतीवरच अवलंबून आहे. दरवर्षीच अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. कृषी व अन्य विभागाच्या योजना गावात न आल्याने शेतकरी निराश आहे.

डास प्रतिबंधक फवारणीची मागणी

जिवती : परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने डास प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पूर्वी गावागावात कीटकनाशकाची फवारणी करण्यात येत होती.

कातलाबोडीसाठी बस सुरू करण्याची मागणी

कोरपना : येथून कातलाबोडी गावाला जाण्यासाठी बस नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर खासगी वाहने उपलब्ध नसल्याने नागरिकांना पायी जावे लागते. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन बस सुरू करावी, अशी मागणी आहे.

अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका

नांदा : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या व वाहने वाढली. या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. अनेकजण वाहतूक नियमांचे उल्लघन करतात.

खडसंगीत पाणीपुरवठा अवेळी

खडसंगी : मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र वेळी- अवेळी नळ सोडण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी सकाळी पाणीपुरवठा केला जात होता. आता कधी सकाळी तर कधी सायंकाळी पाणी सोडले जात असल्याने अडचण जात आहे.

पोलीस पाटलांची रिक्त पदे भरावे

सावली : सर्वसामान्यांच्या समस्यांचे गावातच निराकरण व्हावे, हा एकमेव हेतू समोर ठेवून शासनाने गावागावांत पोलीस पाटील पदाची निर्मिती केली. परंतु, तालुक्यातील अनेक गावांतील पोलीस पाटलांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पोलीस पाटील पद तत्काळ भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.