शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छ झाले, मनेही स्वच्छ व्हावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 00:34 IST

केंद्र सरकारने देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेबाबत घेतलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

राजेश भोजेकर । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेबाबत घेतलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. देशातील ७२६ शहरांमध्ये चंद्रपूर शहराचा ७६ वा क्रमांक लागला. आणि राज्यात सहावा. गौरवाची बाब म्हणजे, विदर्भातील नागपूर, अमरावती आणि अकोला या महानगरांना मागे टाकत चंद्रपूरने ही बाजी मारताना विदर्भात स्वच्छतेच्या बाबतीत मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. ही बाब चंद्रपूरकांना अभिमानास्पद वाटावी अशीच आहे. चंद्रपूरला महानगराचे स्वरुप येऊन जेमतेम पाच-सहा वर्षे झालीत. या काळात चंद्रपूरने राज्यात टॉप टेन शहरामध्ये मिळविलेला हा सन्मान चंद्रपूर बदलत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे. पुण्या-मुंबईत बसून चंद्रपूरकडे बघितल्यानंतर हे शहर अतिशय दुर्गम असल्याचे जाणवते. तसे ऐकायलाही मिळते. अधिकारी वर्गही पूर्वी या शहरात बदली घेताना विचारच करायचा. मात्र त्यांच्या लेखी दुर्गम असलेल्या या शहराने राज्यात सहावा क्रमांक पटकावून त्या सर्वमंडळींचे एकाएकी डोळे उघडले आहे. ही बाब पूर्वीपासून मिरवत आलेल्या महानगरांचे गर्वहरण करणारी आहे. या यशाचे श्रेय महापालिकेला असले तरी यामध्ये चंद्रपूरकरांचा वाटाही तेवढाच मोलाचा आहे, हे विसरता येणार नाही. पालिकेने कितीही स्वच्छता मोहिमा राबविल्या आणि त्यासाठी जनतेचे सहकार्यच नसेल, तर परिणामकारकता शून्य ठरते. एकाएकी लागलेल्या आश्चर्यकारक निकालामुळे चंद्रपूरकरांसह पालिकेची जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. यापुढे हा क्रमांक कायम ठेवणे हे मोठे आव्हान असणार आहे. स्वप्न मोठेच बघितले पाहिजे. त्या स्वप्नांचा पाठलाग करताना मार्गातील अनेक अडथळे केव्हा दूर झाले हे कळतदेखील नाही. प्रयत्नच झाले नाही तर मिळाले ते स्थानही गमाविण्याची भीती असते. आणि हे अपयश खाली बघायला लावणारे ठरते. म्हणूनच चंद्रपूरकर व पालिका हे यश कसे पचविते, हे महत्त्वाचे ठरेल. पालिकेकडे अनेक योजना आहेत. या मध्यमातून ती शहराचा कायापालट करण्याचा पूरेपूर प्रयत्न करणार. या योजना जनहितार्थच असल्या तरी स्वच्छतेसारख्या काही योजनांमध्ये जनतेचाही प्रत्यक्ष सहभाग आवश्यक असतो. यासाठी जनजागृती केली जाते. वास्तविक, या जनजागृतीवर लागणाऱ्या खर्चात अनेक विकासकामेही करता येणे शक्य आहे. मात्र सामान्य मानसिकता आहे, आपला कचरा दुसरीकडे फेकून आपले घर वा परिसर स्वच्छ ठेवण्याची. मग जनजागृतीपर केलेला खर्च वाया जाणारच. ही जनजागृती एकाच विषयावर वर्षानुवर्षांपासून केली जात आहे. यावर झालेला खर्च जनतेच्या खिशातून कराच्या स्वरुपात शासनाकडे जमा पैशात असतो. काहीच लोकांवर या जनजागृतीचा परिणाम होतो. अनेकांना कळते पण वळत नाही. काहीजण याकडे लक्षही द्यायला तयार नसतात. मात्र आपणच कचरा फेकल्यानंतर पालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले असे बोलणाऱ्यांची संख्याही कमी नाही. या विविधांगी मानसिकतेने नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर त्या योजनेचे तीनतेरा वाजलेले असते. आपण आपले घर स्वच्छ राहावे म्हणून जसा प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न प्रत्येकांनी आपला परिसर व शहर स्वच्छ राहण्यासाठी केला, तर एकेदिवशी चंद्रपूर प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर झाल्यावाचून राहणार नाही. यासाठी गरज आहे ती प्रत्येक चंद्रपूरकरांनी स्वच्छतेचा ध्यास घेण्याची.