शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शहर स्वच्छ झाले, मनेही स्वच्छ व्हावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 00:34 IST

केंद्र सरकारने देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेबाबत घेतलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

राजेश भोजेकर । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेबाबत घेतलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. देशातील ७२६ शहरांमध्ये चंद्रपूर शहराचा ७६ वा क्रमांक लागला. आणि राज्यात सहावा. गौरवाची बाब म्हणजे, विदर्भातील नागपूर, अमरावती आणि अकोला या महानगरांना मागे टाकत चंद्रपूरने ही बाजी मारताना विदर्भात स्वच्छतेच्या बाबतीत मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. ही बाब चंद्रपूरकांना अभिमानास्पद वाटावी अशीच आहे. चंद्रपूरला महानगराचे स्वरुप येऊन जेमतेम पाच-सहा वर्षे झालीत. या काळात चंद्रपूरने राज्यात टॉप टेन शहरामध्ये मिळविलेला हा सन्मान चंद्रपूर बदलत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे. पुण्या-मुंबईत बसून चंद्रपूरकडे बघितल्यानंतर हे शहर अतिशय दुर्गम असल्याचे जाणवते. तसे ऐकायलाही मिळते. अधिकारी वर्गही पूर्वी या शहरात बदली घेताना विचारच करायचा. मात्र त्यांच्या लेखी दुर्गम असलेल्या या शहराने राज्यात सहावा क्रमांक पटकावून त्या सर्वमंडळींचे एकाएकी डोळे उघडले आहे. ही बाब पूर्वीपासून मिरवत आलेल्या महानगरांचे गर्वहरण करणारी आहे. या यशाचे श्रेय महापालिकेला असले तरी यामध्ये चंद्रपूरकरांचा वाटाही तेवढाच मोलाचा आहे, हे विसरता येणार नाही. पालिकेने कितीही स्वच्छता मोहिमा राबविल्या आणि त्यासाठी जनतेचे सहकार्यच नसेल, तर परिणामकारकता शून्य ठरते. एकाएकी लागलेल्या आश्चर्यकारक निकालामुळे चंद्रपूरकरांसह पालिकेची जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. यापुढे हा क्रमांक कायम ठेवणे हे मोठे आव्हान असणार आहे. स्वप्न मोठेच बघितले पाहिजे. त्या स्वप्नांचा पाठलाग करताना मार्गातील अनेक अडथळे केव्हा दूर झाले हे कळतदेखील नाही. प्रयत्नच झाले नाही तर मिळाले ते स्थानही गमाविण्याची भीती असते. आणि हे अपयश खाली बघायला लावणारे ठरते. म्हणूनच चंद्रपूरकर व पालिका हे यश कसे पचविते, हे महत्त्वाचे ठरेल. पालिकेकडे अनेक योजना आहेत. या मध्यमातून ती शहराचा कायापालट करण्याचा पूरेपूर प्रयत्न करणार. या योजना जनहितार्थच असल्या तरी स्वच्छतेसारख्या काही योजनांमध्ये जनतेचाही प्रत्यक्ष सहभाग आवश्यक असतो. यासाठी जनजागृती केली जाते. वास्तविक, या जनजागृतीवर लागणाऱ्या खर्चात अनेक विकासकामेही करता येणे शक्य आहे. मात्र सामान्य मानसिकता आहे, आपला कचरा दुसरीकडे फेकून आपले घर वा परिसर स्वच्छ ठेवण्याची. मग जनजागृतीपर केलेला खर्च वाया जाणारच. ही जनजागृती एकाच विषयावर वर्षानुवर्षांपासून केली जात आहे. यावर झालेला खर्च जनतेच्या खिशातून कराच्या स्वरुपात शासनाकडे जमा पैशात असतो. काहीच लोकांवर या जनजागृतीचा परिणाम होतो. अनेकांना कळते पण वळत नाही. काहीजण याकडे लक्षही द्यायला तयार नसतात. मात्र आपणच कचरा फेकल्यानंतर पालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले असे बोलणाऱ्यांची संख्याही कमी नाही. या विविधांगी मानसिकतेने नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर त्या योजनेचे तीनतेरा वाजलेले असते. आपण आपले घर स्वच्छ राहावे म्हणून जसा प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न प्रत्येकांनी आपला परिसर व शहर स्वच्छ राहण्यासाठी केला, तर एकेदिवशी चंद्रपूर प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर झाल्यावाचून राहणार नाही. यासाठी गरज आहे ती प्रत्येक चंद्रपूरकरांनी स्वच्छतेचा ध्यास घेण्याची.