शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

अफलातून आदेशाने नागरिकांना झाले हसू की रडू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पाहता पाहता चांगलाच वाढायला लागला आहे. या वर्षात सुरुवातीला आठ-दहा रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत होती. ...

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पाहता पाहता चांगलाच वाढायला लागला आहे. या वर्षात सुरुवातीला आठ-दहा रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत होती. ती आता तीनशेच्या घरात गेली आहे. यावर मात करण्यासाठी दुकानांची वेळ सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंतची केली आहे. या जिल्हा प्रशासनाच्या अफलातून आदेशाने नागरिकांना हसू की रडू झाले आहे. काय हो...कोरोना सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत शांत असतो का? या वेळात तो कोणालाच काही करत नाही का? असे नसेल तर ही वेळ निर्धारित करण्याचे काय कारण? या प्रश्नांची नागरिक चवीने चर्चा करीत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. आताच त्यावर आवश्यक उपयायोजना केली नाही तर या जिल्ह्याची स्थिती नागपूरसारखी व्हायला वेळ लागणार नाही. मात्र यावर कोणतेही उपाय जिल्हा प्रशासनाकडे दिसत नाही. गुरुवारी जिल्हा प्रशासनाने एका आदेशान्वये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ रात्री ८ ते सकाळी ७ वाजतापर्यंत अघोषित लाॅकडाऊन आहे. या निर्णयावरून नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ वाजता कोरोनाचे संक्रमण होत नाही का? कोरोना रात्रीच आक्रमण करतो का? हे सवाल या आदेशानंतर नागरिकांकडून चर्चिले जात आहे. हा एकप्रकारे विनोदाचा भाग म्हणून विचारात घेतला तरी वस्तुस्थितीही नाकारता येत नाही.

नागरिक सकाळी घराबाहेर पडतात. दिवसभर शहरे, गावे गजबजलेली असते. बहुतांश नागरिक रात्री ८ वाजतापर्यंत आपापल्या घरी जातात. यानंतर केवळ शतपावलीसाठी नागरिक घराबाहेर पडतात. हा एकच धोका कोरोनाचा संसर्ग होण्याच्या दृष्टीने रात्रीचा आहे.

दिवसा होणाऱ्या संसर्गावर निर्बंधच नाही

सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात आली आहे. वास्तविक, याच काळात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची भीती आहे. परंतु या काळात कोणतेही निर्बंध नाही.

‘स्प्रेडर’वर नियंत्रण कसे मिळवाल?

कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या मोठी आहे. ही संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांचा शोध घेऊन आरटीपीसीआर वा ॲन्टिजेन चाचणी अल्पावधीत व्हावी, यासाठी कोणत्याही उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडे दिसत नाहीत.