शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

इंधन दरवाढीने नागरिकांची सरपणासाठी जंगलात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:33 IST

ब्रह्मपुरी : केंद्र शासनाने इंधन व गॅसच्या दरांत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने आतापर्यंतच्या सर्व चूलमुक्तीसाठी अमलात आणलेल्या योजना कुचकामी ...

ब्रह्मपुरी : केंद्र शासनाने इंधन व गॅसच्या दरांत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने आतापर्यंतच्या सर्व चूलमुक्तीसाठी अमलात आणलेल्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत गॅसच्या दरवाढीने जंगलात सरपण गोळा करण्याकरिता ग्रामीण भागातील नागरिक धाव घेत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचे हल्ले वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

डिझेल, पेट्रोलपाठोपाठ घरगुती गॅसच्या दरात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आपसूकच वाढल्या आहेत. तालुक्याचा परीघ फार मोठा असून तालुक्यातील ७५ टक्के जनता जंगलव्याप्त भागात वास्तव्यास आहे. दोन वेळ चुलीवर स्वयंपाक केल्याने गृहिणींच्या प्रकृतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो. केंद्र शासनाने चूलमुक्तीसाठी उज्ज्वला गॅस योजनासारख्या विविध योजना राबविल्या. या योजनांद्वारे स्वस्त दरात ग्रामीण भागात गॅस उपलब्ध करून देण्यात आला.

ब्रह्मपुरी वनविभाग विस्तीर्ण पसरला असून, वाघ व बिबट यांच्यासह मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आढळून येतात. त्यामुळे सरपण गोळा करण्यासाठी किंवा गुरे चारण्यासाठी जंगलात नागरिक गेले असता वन्य प्राणी - मानव संघर्षाच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यात बऱ्याच नागरिकांना प्राणास मुकावे लागले असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

इंधन दरवाढ व गॅसच्या किमती भरमसाट वाढल्याने ग्रामीण भागातील जनतेला ते परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शासनाच्या उज्ज्वल योजनेसारख्या विविध योजना कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे परत एकदा ग्रामीण जनतेला नाइलाजाने सरपणासाठी जंगलात जावे लागते. त्यामुळे मानव व वन्य प्राणी यांचा संघर्ष वाढत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे येत्या काळात वन्य प्राण्यांचे हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.