शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

प्रदूषणास उद्योगासोबतच नागरिकही जबाबदार

By admin | Updated: April 22, 2016 02:54 IST

चंद्रपूर हे देशात सहाव्या क्रमांकाचे प्रदूषीत शहर आहे. येथे दोन कृती आराखडे आखून सुद्धा प्रदूषण कमी झाले नाही.

चंद्रपूर : चंद्रपूर हे देशात सहाव्या क्रमांकाचे प्रदूषीत शहर आहे. येथे दोन कृती आराखडे आखून सुद्धा प्रदूषण कमी झाले नाही. चंद्रपुरातील प्रदूषण व त्यावर उपाय योजना करण्यासाठी निरीने अभ्यास केला. यातून वाढत्या प्रदूषणास थर्मल पॉवर स्टेशन, सिमेंट उद्योग, कोळसा खाणी हे कारणीभूत असून त्याचसोबत नागरिकही जबाबदार असल्याचे निरीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाने चंद्रपूर-वणी क्षेत्राचा अभ्यास करुन उपाय योजना करण्यासाठी निरीला व आयआयटी पवईला अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यानुसार २०१३-१४ या वर्षात राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था निरीने चंद्रपूरच्या प्रदूषणाचे स्त्रोत, कारणे व उपाय यावर एक वर्ष अभ्यास करुन अहवाल सादर केला आहे. निरीने चंद्रपूर जिल्ह्यातील ४० बाय ४० किमी परिसरातील १७ प्रमुख उद्योगांच्या ४७ धुराळ्यांचा अभ्यास केला. चंद्रपुरातील सहा प्रदूषण मापक केंद्राचा २४ तास सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजन डायआॅक्साईड, हवेत आणि श्वसनात जाणाऱ्या धुलीकनाच्या प्रदूषणाची आकडेवारी गोळा केली. त्यात कोळश्यावर आधारीत वीज केंद्र, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, लोहखनिज उद्योग, कागद कारखाने, रासायनिक उद्योग व शहरातील नागरिकांचे प्रदूषण कोळसा जाळणे, स्वयंपाकाचा गॅस, लाकडे जाळणे यांचा समावेश असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक तसेच केंद्रीय पर्यावन वने व जयवायू परिवर्तन मंत्रालय दिल्लीचे क्षेत्रीय समिती सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)सिमेंट उद्योगातून सर्वाधिक वायू प्रदूषणवायू प्रदूषणाच्या बाबतीत ९० टक्के वाटा सिमेंट उद्योगांचा आहे. सल्फरडाय आॅक्साईड हे या उद्योगातून वायू प्रदूषण होते. ५ टक्के वाटा पॉवर प्लांटचा आहे तर ५ टक्के वाटा लोहा खनिज उद्योगांचा आहे. नायट्रोजनडाय आॅक्साईड प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात जास्त ५१ टक्के प्रदूषण थर्मल पॉवर प्लांट तर ४९ टक्के वाटा सिमेंट उद्योगांचा आहे.वाहनेही करतात धूर प्रदूषण१९५१ मध्ये चंद्रपूरची लोकसंख्या ४२ हजार ७५१ इतकी होती. तर २०११ मध्ये ती ३ लाख २१ हजार ३६ इतकी वाढली. त्या तुलनेत २००६ मध्ये १७ लाख ७ हजार २२५ लाख वाहने होती. ती २०११ मध्ये वाढून २८ लाख १ हजार ७६४ झाली. यातून धुलीकण, कार्बन मोनोक्साईड, हायड्रोकार्बन, नायट्रोजन आॅक्साईड इत्यादी वायूंचे उत्सर्जन होते. दोन-तीन चाकी वाहने, पेट्रोल डीझेल चार चाकी वाहने, बसेस, हलकी व जड वाहने मिळून दरवर्षी ३६.४० टन धुलीकन, ५३५.१२ टन कार्बन मोनोआॅक्साईड, १२५२.७१ टन हायड्रोकार्बन आणि ११६०.२९ टन नायट्रोजन आॅक्साईड उत्सर्जित होते. हे सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणातील प्रदूषण आहे.सीटीपीएसमुळे सर्वाधिक धुलीकणचंद्रपूर, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा एवढ्याच मर्यादित क्षेत्रात सर्व कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, थर्मल प्लाँट, लोह व कागद उद्योग अशी लहान, मोठी उद्योग आहेत. त्यामुळे प्रदूषण जास्त आहे. जिल्ह्यात धुलीकणाच्या बाबतीत सर्वात जास्त ७५ टक्के धुलीकनाचे प्रदूषण चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनचे आहे. त्यानंतर १८ टक्के धुलीकण प्रदूषण सिमेंट उद्योगांचे आहे. ४ टक्के वाटा लोह उद्योगाचा तर ३ टक्के वाटा कागद उद्योग, मल्टी आॅर्गनिक व इतर लहान उद्योगांचा आहे.जळाऊ लाकडांपासूनही वाढले प्रदूषणचंद्रपूर शहरातील झोपडपट्टीत वर्षाला कमीत कमी ३०० टन कोळसा जाळला जातो. त्यातून आरोग्यास सर्वात जास्त हानीकारक वायूंचे उत्सर्जन होते. एलपीजी गॅस मुळे दरवर्षी ३.५२ टन, सल्फर डाय आॅक्साईड ७.०३ टन, नायट्रोजन आॅक्साईड २.२१ टन व मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन उत्सर्जित होत आहे. मृत्यूनंतर दहन विधीसाठी लागणारी लाकडे, झोपडपट्टीत जळाऊ लाकडांसाठी केरोसीनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच नागरीक मोठ्या प्रमाणातत प्लॉस्टिक, कचरा जाळतात. बेकरी व हॉटेल्स आदी त्यातून मोठ्या प्रमाणात धुलीकन, सल्फरडाय आॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड व कार्बन मोनोक्साईड उत्सर्जित होते. तसेच बांधकाम, शहर सफाई यातून धुलीकरण उत्सर्जित होते. या गतिविधी लहान वाटत असल्या तरी सामूहीकरित्या त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.