शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

‘मन की बात’ला नागरिकांचा प्रतिसाद

By admin | Updated: April 26, 2016 00:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी ग्रामीण भागातील नागरिकांना मार्गदर्शन केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

वरोरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी ग्रामीण भागातील नागरिकांना मार्गदर्शन केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. हा कार्यक्रम बघण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर ग्रामस्थांसोबत आनंदवन ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित होते. ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधला. हा कार्यक्रम ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला पाहता किंवा ऐकता यावा, याकरिता ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम बघण्याकरिता नागरिक दुपारी ३ वाजता उपस्थित झाले. हा कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामस्थांसोबत बघितला. त्यानंतर आनंदवन ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती वर्ष सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील नागरकांना मार्गदर्शन करीत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व स्वच्छता तसेच पाण्याचे महत्त्व विषद केले. ना.हंसराज अहीर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून हा कार्यक्रम ग्रामस्थांसोबत बघितला. या कार्यक्रमाबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्स्कुता दिसून आली. या कार्यक्रमामुळे पंचायत राज नितीला चालना मिळणार असल्याचे मत याप्रसंगी ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. यावेळी आनंदवन ग्रामपंचायतीचे सरपंच काशिनाथ मेश्राम, माजी सरपंच राजु सावसाकडे, भाजपा तालुका संघटक ओम मांडवकर, रवी नागपुरे, रविंद्र कष्टी, आनंदवन ग्रामपंचायतीचे सदस्य तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच तहसीलदार राजेश मांडवकर, सवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, विस्तार अधिकारी एन.ए. नागतोडे, आस्कर, खुजे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)