शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

नागरिकांनो, कोरोना संपल्याच्या मानसिकतेतून बाहेर निघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे कोविड-१९ पूर्णपणे संपला या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर येण्याची गरज आहे. सतत ...

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे कोविड-१९ पूर्णपणे संपला या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर येण्याची गरज आहे. सतत मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर केला तरच कोविडपासून आपण सुरक्षित राहू शकू, असेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले. कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोज घेतला, काहीही त्रास झाला नाही, नियमांचे पालन केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, लस देणारे आरोग्य सेवक प्रशिक्षित असल्याने कुठलाही त्रास झाला नाही. २८ दिवसांनी लसीकरणाचा दुसरा डोज दिला जाईल. त्यापुढे १४ दिवसानंतर कोरोनाच्या ॲन्टिबॉडीज शरीरात तयार होतील. ज्यांची नावे लसीकरण मोहिमेत समाविष्ट आहेत, त्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लस टोचून घ्यावी. अपर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, लस अतिशय सुरक्षित आहे. मास्कचा वापर, हात धुणे व अंतर राखणे ही त्रिसूत्री पाळूनच आपण कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकू शकतो. यावेळी उपजिल्हाधिकारी जनार्दन लोंढे, तहसीलदार यशवंत धाईत, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी लस घेतली. आरोग्य सेविका चंदा डहाके या प्रशिक्षित आरोग्य सेविकेने सर्वांना लस दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, डॉ. राजेंद्र सुरपाम, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.

बॉक्स

लसीकरणासाठी ७ हजार ७५५ जणांची नोंदणी

जिल्ह्यातील ७ हजार ७५५ फ्रंटलाईन वर्कर्सची लसीकरणासाठी नोंदणी झाली. शुक्रवारपर्यंत ३ हजार ५९ कोरोना योद्धे यांना लस देण्यात आली. यापूर्वी १२ हजार ९१ आरोग्य सेवकांना कोरोना लस देण्यात........................... होती.