शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

विद्युत वितरण अभियंत्यांना नागरिकांचा घेराव

By admin | Updated: September 14, 2015 00:48 IST

येथील तसेच परिसरातील गावखेड्यातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत असल्याने त्रस्त झालेल्या .....

मेंडकी : येथील तसेच परिसरातील गावखेड्यातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत असल्याने त्रस्त झालेल्या मेंडकी तसेच परिसरातील जनतेने विद्युत वितरण अभियंत्यांना घेराव घातल्याचा प्रकार मेंडकी येथे घडला आहे.मेंडकी विद्युत वितरण कंपनी कार्यालयाअंतर्गत कळमगाव, जबराबोडी मेंढा, एकारा, रानबोथली अशा बऱ्याच गावखेड्यांचा परिसर येत येतो. मेंडकी तसेच परिसरातील वीज पुरवठा ७ आणि ८ सप्टेंबरला दोन दिवस खंडीत झाला होता. येथील विद्युत वितरण कार्यालयाचे अभियंता दिनेश झोडापे यांना मेंडकी तसेच परिसरातील काही नागरिकांनी येथील विद्युत पुरवठा खंडीत असल्याची माहिती दिली. त्यानंतर अभियंता दिनेश झोडापे हे ब्रह्मपुरी येथे वास्तव्याने राहत असल्याने ‘होय आपण मेंडकीला येऊनच राहिलो आहे, काही वेळातच विद्युत पुरवठा सुरळीत होईल, असे मोबाईलवरुन काही नागरिकांना सांगितले. दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबरला विद्युत पुरवठा सुरू न झाल्याने कळमगाव, जवराबोडी मेंडा, मेंडकी येथील जवळपास १०० ते २०० लोकांनी रात्री ८ वाजता मेंडकी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ एकत्र येऊन अभियंता दिनेश झोडापे यांना विद्युत पुरवठा सुरू का झाला नाही, याबाबत मोबाईलवर विचारणा केली असता अभियंता दिनेश झोडापे यांनी उडवा-उडवीचे उत्तरे देवून टाळाटाळ करून फोन ठेवून दिला. त्यानंतर परत पुन्हा अभियंता दिनेश झोडापेंना फोन केला असता विद्युत पुरवठा आता सुरू होऊ शकत नाही, असे सांगितले. त्रस्त झालेल्या लोकांनी अभियंता दिनेश झोडापे यांना तुम्हाला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करायचा आहे की नाही, नसेल करायचे तस सांगा अन्यथा याचे परिणाम वाईट होतील, असे ठणकावून सांगितले. अभियंता दिनेश झोडापे हे ब्रह्मपुरीवरुन आपल्या कर्मचाऱ्यासोबत रात्री ११ वाजता कार्यालयाजवळ येताच त्रस्त झालेल्या १०० ते २०० लोकांनी अभियंत्यांना घेराव घालून प्रश्नाची सरबत्ती केली. हे प्रकरण अधिक तापले असतानाच मेंडकी येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले.त्यानंतर सदर प्रकरण शांत झाले. त्यानंतर मेंडकी येथील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खैरकर आणि त्यांचे कर्मचारी तसेच मेंडकीचे उपसरपंच यशवंत आबोरकर व जवराबोडी मेंडा, कळमगाव मेंडकी येथील उपस्थित लोकांनी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी पहाटेच्या ४ वाजतापर्यंत विद्युत कर्मचाऱ्यांना सहकार्य करून वीज पुरवठा सुरळीत सुरू केला. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. (वार्ताहर)