शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत वितरण अभियंत्यांना नागरिकांचा घेराव

By admin | Updated: September 14, 2015 00:48 IST

येथील तसेच परिसरातील गावखेड्यातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत असल्याने त्रस्त झालेल्या .....

मेंडकी : येथील तसेच परिसरातील गावखेड्यातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत असल्याने त्रस्त झालेल्या मेंडकी तसेच परिसरातील जनतेने विद्युत वितरण अभियंत्यांना घेराव घातल्याचा प्रकार मेंडकी येथे घडला आहे.मेंडकी विद्युत वितरण कंपनी कार्यालयाअंतर्गत कळमगाव, जबराबोडी मेंढा, एकारा, रानबोथली अशा बऱ्याच गावखेड्यांचा परिसर येत येतो. मेंडकी तसेच परिसरातील वीज पुरवठा ७ आणि ८ सप्टेंबरला दोन दिवस खंडीत झाला होता. येथील विद्युत वितरण कार्यालयाचे अभियंता दिनेश झोडापे यांना मेंडकी तसेच परिसरातील काही नागरिकांनी येथील विद्युत पुरवठा खंडीत असल्याची माहिती दिली. त्यानंतर अभियंता दिनेश झोडापे हे ब्रह्मपुरी येथे वास्तव्याने राहत असल्याने ‘होय आपण मेंडकीला येऊनच राहिलो आहे, काही वेळातच विद्युत पुरवठा सुरळीत होईल, असे मोबाईलवरुन काही नागरिकांना सांगितले. दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबरला विद्युत पुरवठा सुरू न झाल्याने कळमगाव, जवराबोडी मेंडा, मेंडकी येथील जवळपास १०० ते २०० लोकांनी रात्री ८ वाजता मेंडकी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ एकत्र येऊन अभियंता दिनेश झोडापे यांना विद्युत पुरवठा सुरू का झाला नाही, याबाबत मोबाईलवर विचारणा केली असता अभियंता दिनेश झोडापे यांनी उडवा-उडवीचे उत्तरे देवून टाळाटाळ करून फोन ठेवून दिला. त्यानंतर परत पुन्हा अभियंता दिनेश झोडापेंना फोन केला असता विद्युत पुरवठा आता सुरू होऊ शकत नाही, असे सांगितले. त्रस्त झालेल्या लोकांनी अभियंता दिनेश झोडापे यांना तुम्हाला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करायचा आहे की नाही, नसेल करायचे तस सांगा अन्यथा याचे परिणाम वाईट होतील, असे ठणकावून सांगितले. अभियंता दिनेश झोडापे हे ब्रह्मपुरीवरुन आपल्या कर्मचाऱ्यासोबत रात्री ११ वाजता कार्यालयाजवळ येताच त्रस्त झालेल्या १०० ते २०० लोकांनी अभियंत्यांना घेराव घालून प्रश्नाची सरबत्ती केली. हे प्रकरण अधिक तापले असतानाच मेंडकी येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले.त्यानंतर सदर प्रकरण शांत झाले. त्यानंतर मेंडकी येथील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खैरकर आणि त्यांचे कर्मचारी तसेच मेंडकीचे उपसरपंच यशवंत आबोरकर व जवराबोडी मेंडा, कळमगाव मेंडकी येथील उपस्थित लोकांनी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी पहाटेच्या ४ वाजतापर्यंत विद्युत कर्मचाऱ्यांना सहकार्य करून वीज पुरवठा सुरळीत सुरू केला. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. (वार्ताहर)