शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विद्युत वितरण अभियंत्यांना नागरिकांचा घेराव

By admin | Updated: September 14, 2015 00:48 IST

येथील तसेच परिसरातील गावखेड्यातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत असल्याने त्रस्त झालेल्या .....

मेंडकी : येथील तसेच परिसरातील गावखेड्यातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत असल्याने त्रस्त झालेल्या मेंडकी तसेच परिसरातील जनतेने विद्युत वितरण अभियंत्यांना घेराव घातल्याचा प्रकार मेंडकी येथे घडला आहे.मेंडकी विद्युत वितरण कंपनी कार्यालयाअंतर्गत कळमगाव, जबराबोडी मेंढा, एकारा, रानबोथली अशा बऱ्याच गावखेड्यांचा परिसर येत येतो. मेंडकी तसेच परिसरातील वीज पुरवठा ७ आणि ८ सप्टेंबरला दोन दिवस खंडीत झाला होता. येथील विद्युत वितरण कार्यालयाचे अभियंता दिनेश झोडापे यांना मेंडकी तसेच परिसरातील काही नागरिकांनी येथील विद्युत पुरवठा खंडीत असल्याची माहिती दिली. त्यानंतर अभियंता दिनेश झोडापे हे ब्रह्मपुरी येथे वास्तव्याने राहत असल्याने ‘होय आपण मेंडकीला येऊनच राहिलो आहे, काही वेळातच विद्युत पुरवठा सुरळीत होईल, असे मोबाईलवरुन काही नागरिकांना सांगितले. दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबरला विद्युत पुरवठा सुरू न झाल्याने कळमगाव, जवराबोडी मेंडा, मेंडकी येथील जवळपास १०० ते २०० लोकांनी रात्री ८ वाजता मेंडकी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ एकत्र येऊन अभियंता दिनेश झोडापे यांना विद्युत पुरवठा सुरू का झाला नाही, याबाबत मोबाईलवर विचारणा केली असता अभियंता दिनेश झोडापे यांनी उडवा-उडवीचे उत्तरे देवून टाळाटाळ करून फोन ठेवून दिला. त्यानंतर परत पुन्हा अभियंता दिनेश झोडापेंना फोन केला असता विद्युत पुरवठा आता सुरू होऊ शकत नाही, असे सांगितले. त्रस्त झालेल्या लोकांनी अभियंता दिनेश झोडापे यांना तुम्हाला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करायचा आहे की नाही, नसेल करायचे तस सांगा अन्यथा याचे परिणाम वाईट होतील, असे ठणकावून सांगितले. अभियंता दिनेश झोडापे हे ब्रह्मपुरीवरुन आपल्या कर्मचाऱ्यासोबत रात्री ११ वाजता कार्यालयाजवळ येताच त्रस्त झालेल्या १०० ते २०० लोकांनी अभियंत्यांना घेराव घालून प्रश्नाची सरबत्ती केली. हे प्रकरण अधिक तापले असतानाच मेंडकी येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले.त्यानंतर सदर प्रकरण शांत झाले. त्यानंतर मेंडकी येथील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खैरकर आणि त्यांचे कर्मचारी तसेच मेंडकीचे उपसरपंच यशवंत आबोरकर व जवराबोडी मेंडा, कळमगाव मेंडकी येथील उपस्थित लोकांनी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी पहाटेच्या ४ वाजतापर्यंत विद्युत कर्मचाऱ्यांना सहकार्य करून वीज पुरवठा सुरळीत सुरू केला. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. (वार्ताहर)