शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

ग्रामसेवकांच्या दांड्यामुळे नागरिक कंटाळले

By admin | Updated: April 15, 2017 00:42 IST

शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती नागरिकांना दणे आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी वा पातळीवर ग्रामपंचायत कार्यरत आहे.

अधिकाऱ्यांचे अभय : शाळेच्या वेळेत शिक्षक चौकातशंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे जिवतीशासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती नागरिकांना दणे आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी वा पातळीवर ग्रामपंचायत कार्यरत आहे. तेथे शासन व ग्रामस्थांमधील दुवा म्हणून ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात येते. मात्र, ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये नियमित उपस्थित राहात नाही. ग्रामसेवकाच्या अनियमिततेमुळे गावाचा विकास खुंटला असून महत्त्वाच्या दस्तावेजासाठी ग्रामपंचायतमध्ये चकरा माराव्या लागतात. तसेच शाळेचीही स्थिती अशीच असून शिक्षक शाळा भरण्याच्या वेळी चौकात चहा घेत असतात.जिवती तालुका जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात वसलेला आहे. तालुक्यात ३५ ग्रामपंचायती आहेत. सर्वच ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. नियमानुसार, शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या कामाच्या मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे. परंतु अनेक ग्रामसेवक शासकीय बैठकीच्या नावावर दांडी मारत आहेत. ग्रामसेवक आठवड्यातून एक-दोन वेळा येतात. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना बळ मिळू लागले आहे. अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे शासकीय कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.ग्रामस्थांना किंवा विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या दस्तावेजाची गरज पडली तर मोबाईलने त्यांना संपर्क करून पत्ता विचारावा लागतो. अनेक ग्रामसेवक आपले खरे लोकेशन सांगत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या मागे चकरा माराव्या लागतात. ते उपस्थित असलेल्या ठिकाणी मागणीनुसार दाखले उपलब्ध करतात. अनेकांच्या घरकुलांचे काम पूर्ण होऊनही देयक अदा केले जात नाही. ज्यांनी पैसे दिले, त्यांची देयक वेळेवर दिली जातात.शिक्षकांच्या चौकात गप्पापहाडावरील गरीब विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी गाव तेथे शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु या शाळेतील गुरूजी शाळेच्या वेळेत जिवतीच्या मुख्य चौकात गप्पा मारत असतात. सध्या सकाळच्या पाळीत शाळा भरते. मात्र, शिक्षका ८ वाजले तरी चौकातून हलत नाहीत. मोबाईलने संदेश देऊन एकमेकांना बोलावितात. तेथे ते टाईमपास करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे पहाडावरील शाळा रामभरोसे आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे तीन महिन्यात एक आणि वर्षभरात चार वेळा शाळा भेटी करणे आवश्यक आहे. परंतु पहाडावरील शाळांची जबाबदारी त्यांनी एका शिक्षकाकडे सोपविल्याचे समजते. प्रत्येक ग्रामपंचायतने गावात एलईडी विद्युत दिवे खरेदी केले आहेत. ते निकृष्ट आणि कमी प्रकाश देणारे आहेत. त्यामुळे ते अल्पावधीतच बंद पडले आहेत. त्याबाबत अनेक वेळा तोंडी तक्रारी देऊनही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. या एलईडी विद्युत दिवे खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून त्याची योग्य चौकशी करण्यात आल्यास मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो.