शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

नागरिकांनो, बालविवाह रोखण्यासाठी जागरूक राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:26 IST

भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्त्वाची आणि सर्वाधिक सामाजिक क्रिया आहे. साहजिकच अनेक शुभमुहूर्तांवर विवाह विधी केले जातात. यामध्ये ...

भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्त्वाची आणि सर्वाधिक सामाजिक क्रिया आहे. साहजिकच अनेक शुभमुहूर्तांवर विवाह विधी केले जातात. यामध्ये बालविवाहही मोठ्या प्रमाणात केले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बालविवाह रोखण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने आदेश जारी केले आहेत. बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि याविरोधात गुन्हा नोंदविला जातो. या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे बालविवाह रोखणे आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या क्षेत्रात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि असे बालविवाह लक्षात आल्यास त्यावर तातडीने आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यासाठी बाल कल्याण समिती, पोलीस अधीक्षक, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी (बाल विकास प्रकल्प अधिकारी-शहरी व ग्रामीण, ग्रामसेवक) पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाला कळवावे. माहिती मिळताच तत्काळ बाल विवाह थांबविण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.

कोट

जिल्ह्यात बालविवाह कदापि होणार नाही, यासाठी नागरिकांना विविध साधनांद्वारे व्यापकस्तरावर माहिती देण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यात असे विवाह होत असतील अथवा तयारी सुरू असेल तर लगेच बाल संरक्षण कक्षाला कळवावे.

- अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चंद्रपूर