शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

जल सप्ताहात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 00:41 IST

राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासन करीत आहे

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : १६ ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताह चंद्रपूर : राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासन करीत आहे. मात्र पाणी टंचाईचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग व सहकार्य मिळाल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नसून यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून १६ ते २२ मार्चदरम्यान जल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभाग प्रमुखांना दिल्या.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत शासकीय विभागप्रमुखांची बैठक शुक्रवार पार पडली. या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जी. मो. शेख, कार्यकारी अभियंता ए. बी. भाके, चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. सोनुने व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या सप्ताहात शाळा, महाविद्यालय, गाव, ग्रामपंचायतस्तरावर जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या माध्यमातून पाणी व पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १६ ते २२ मार्च या सप्ताहात जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करुन पाणी वाचवाचा संदेश देण्यात येणार आहे. जल सप्ताह केवळ शासनाचा उपक्रम नसून तो जनतेचा उपक्रम आहे. या उपक्रमात जिल्हावासीयांनी सक्रिय सहभाग घेऊन पाणी बचतीचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पाण्याविषयी कथाकथन, कविता वाचन, लघुनाटय, जलसाहित्य संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेमध्ये जलजागृती करण्यात येणार आहे. पाणी, पाण्याची गुणवत्ता, स्थानिक सिंचन प्रकल्प, सिंचन व्यवस्थापन यंत्रणा व त्यांची कार्यपध्दती याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय यामध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गावोगावी पाण्याचे महत्त्व पटवून देणारे मेळावे, कीर्तन व पथनाट्य आयोजित करुन जल जागृती करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.जल सप्ताहाचा एक भाग म्हणून वॉटर रन किंवा जल दौड आयोजित केली जाणार आहे. ही अभिनव कल्पना असून आपल्या कॉलनीत, शाळेत, महाविद्यालयात जल दौडचे आयोजन करुन पाणी वाचविण्याचा संदेश, पाण्याचा जपून वापर करणे व पाण्याचे महत्त्व समजावून सांगता येईल.शासनाच्या या जल सप्ताहात सर्वांनी सहभागी झाल्यास पाणी बचतीचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. याकरीता जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी बचतीचे विविध कार्यक्रम आयोजित करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)