शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जल सप्ताहात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 00:41 IST

राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासन करीत आहे

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : १६ ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताह चंद्रपूर : राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासन करीत आहे. मात्र पाणी टंचाईचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग व सहकार्य मिळाल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नसून यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून १६ ते २२ मार्चदरम्यान जल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभाग प्रमुखांना दिल्या.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत शासकीय विभागप्रमुखांची बैठक शुक्रवार पार पडली. या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जी. मो. शेख, कार्यकारी अभियंता ए. बी. भाके, चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. सोनुने व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या सप्ताहात शाळा, महाविद्यालय, गाव, ग्रामपंचायतस्तरावर जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या माध्यमातून पाणी व पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १६ ते २२ मार्च या सप्ताहात जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करुन पाणी वाचवाचा संदेश देण्यात येणार आहे. जल सप्ताह केवळ शासनाचा उपक्रम नसून तो जनतेचा उपक्रम आहे. या उपक्रमात जिल्हावासीयांनी सक्रिय सहभाग घेऊन पाणी बचतीचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पाण्याविषयी कथाकथन, कविता वाचन, लघुनाटय, जलसाहित्य संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेमध्ये जलजागृती करण्यात येणार आहे. पाणी, पाण्याची गुणवत्ता, स्थानिक सिंचन प्रकल्प, सिंचन व्यवस्थापन यंत्रणा व त्यांची कार्यपध्दती याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय यामध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गावोगावी पाण्याचे महत्त्व पटवून देणारे मेळावे, कीर्तन व पथनाट्य आयोजित करुन जल जागृती करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.जल सप्ताहाचा एक भाग म्हणून वॉटर रन किंवा जल दौड आयोजित केली जाणार आहे. ही अभिनव कल्पना असून आपल्या कॉलनीत, शाळेत, महाविद्यालयात जल दौडचे आयोजन करुन पाणी वाचविण्याचा संदेश, पाण्याचा जपून वापर करणे व पाण्याचे महत्त्व समजावून सांगता येईल.शासनाच्या या जल सप्ताहात सर्वांनी सहभागी झाल्यास पाणी बचतीचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. याकरीता जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी बचतीचे विविध कार्यक्रम आयोजित करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)