शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अनिल मडावी मृत्यूप्रकरणाची सीआयडी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST

रेल्वे पोलिसांनी ९ जुलै रोजी विरूर स्टेशन येथून चार तरुणांना पकडून नेले होते. १३ जुलै रोजी रेल्वे पाेलिसांनी अनिल मडावी यांची आई विमल मडावी यांना तुमचा मुलगा फिट आल्याने मरण पावला. त्याचा मृतदेह चंद्रपूरहून घेऊन जावा, असा निरोप दिला होता. आपल्या मुलाचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या कोठडीत मारहाणीत झाल्याची तक्रार विरूर पोलिसात करून, मृतदेह घेण्यास नकार दिला.

ठळक मुद्देमृतकाच्या आई व बहिणीसह ‘त्या’ तीन साक्षीदारांचा घेतला जबाब, रेल्वे पोलीस गोत्यात

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यातील विरूर (स्टेशन) येथील अनिल मडावी युवकाचे रेल्वे पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरण आता गंभीर वळणावर आले आहे. दोन दिवसांपासून मुंबईहून आलेले सीआयडीचे पथक  तपासात गुंतले आहे. शनिवारी या पथकाने विरूर स्टेशन येथे मृतकाच्या आई व बहिणीसह रेल्वे पोलिसांनी धरून नेलेल्या युवकांचे जबाब नोंदविल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.रेल्वे पोलिसांनी ९ जुलै रोजी विरूर स्टेशन येथून चार तरुणांना पकडून नेले होते. १३ जुलै रोजी रेल्वे पाेलिसांनी अनिल मडावी यांची आई विमल मडावी यांना तुमचा मुलगा फिट आल्याने मरण पावला. त्याचा मृतदेह चंद्रपूरहून घेऊन जावा, असा निरोप दिला होता. आपल्या मुलाचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या कोठडीत मारहाणीत झाल्याची तक्रार विरूर पोलिसात करून, मृतदेह घेण्यास नकार दिला. यानंतर, राजुराचे माजी आमदार ॲड.संजय धोटे आणि राज्याचे माजी अर्थमंत्री व लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओ‌ळखून गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती. गृहमंत्र्यांनी मुंबईहून राजलक्ष्मी शिवणकर यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय पथक पाठवून चौकशी सुरू केली आहे. आज हे पथक विरूर स्टेशन येथे पोहोचले. दरम्यान, मृतक अनिलची आई विमल मडावी व त्याच्या बहिणीची विचारपूस केली, तसेच रेल्वे पोलिसांनी अनिल मडावीसोबत गावातील तीन जणांनाही सोबत नेले होते. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. या तीनही युवकांचे जबाब या पथकाने नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे पथक बल्लारपूर पोलीस ठाण्यातही पोहोचले होते. तेथे पोलिसांकडून काही चौकशी केल्याचे समजते. या प्रकरणात रेल्वे पोलीस कोठडीत अनिल मडावीचा मृत्यू झाल्याने व त्याच्या सोबतच्या तरुणांना कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याने, रेल्वे पोलीस गोत्यात येण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.

नियम असा आहे की, कोठडीतील मृत्यू हे गंभीर प्रकरण मानले. कोठडीतील मृत्यू झाल्याचे कळले, तर अधिवेशन थांबविले जाते. आधी कोठडीतील मृत्यूवर चर्चा होते. कोठडीत उद्या कोणी कोणालाही मारू शकते. यासाठी हा नियम आहे. रेल्वे पोलीस कोठडीत झालेल्या अनिल मडावी मृत्युप्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते. त्याच अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे.- आ. सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री व लोकलेखा समिती प्रमुख, म.रा.

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार