शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

अनिल मडावी मृत्यूप्रकरणाची सीआयडी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST

रेल्वे पोलिसांनी ९ जुलै रोजी विरूर स्टेशन येथून चार तरुणांना पकडून नेले होते. १३ जुलै रोजी रेल्वे पाेलिसांनी अनिल मडावी यांची आई विमल मडावी यांना तुमचा मुलगा फिट आल्याने मरण पावला. त्याचा मृतदेह चंद्रपूरहून घेऊन जावा, असा निरोप दिला होता. आपल्या मुलाचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या कोठडीत मारहाणीत झाल्याची तक्रार विरूर पोलिसात करून, मृतदेह घेण्यास नकार दिला.

ठळक मुद्देमृतकाच्या आई व बहिणीसह ‘त्या’ तीन साक्षीदारांचा घेतला जबाब, रेल्वे पोलीस गोत्यात

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यातील विरूर (स्टेशन) येथील अनिल मडावी युवकाचे रेल्वे पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरण आता गंभीर वळणावर आले आहे. दोन दिवसांपासून मुंबईहून आलेले सीआयडीचे पथक  तपासात गुंतले आहे. शनिवारी या पथकाने विरूर स्टेशन येथे मृतकाच्या आई व बहिणीसह रेल्वे पोलिसांनी धरून नेलेल्या युवकांचे जबाब नोंदविल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.रेल्वे पोलिसांनी ९ जुलै रोजी विरूर स्टेशन येथून चार तरुणांना पकडून नेले होते. १३ जुलै रोजी रेल्वे पाेलिसांनी अनिल मडावी यांची आई विमल मडावी यांना तुमचा मुलगा फिट आल्याने मरण पावला. त्याचा मृतदेह चंद्रपूरहून घेऊन जावा, असा निरोप दिला होता. आपल्या मुलाचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या कोठडीत मारहाणीत झाल्याची तक्रार विरूर पोलिसात करून, मृतदेह घेण्यास नकार दिला. यानंतर, राजुराचे माजी आमदार ॲड.संजय धोटे आणि राज्याचे माजी अर्थमंत्री व लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओ‌ळखून गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती. गृहमंत्र्यांनी मुंबईहून राजलक्ष्मी शिवणकर यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय पथक पाठवून चौकशी सुरू केली आहे. आज हे पथक विरूर स्टेशन येथे पोहोचले. दरम्यान, मृतक अनिलची आई विमल मडावी व त्याच्या बहिणीची विचारपूस केली, तसेच रेल्वे पोलिसांनी अनिल मडावीसोबत गावातील तीन जणांनाही सोबत नेले होते. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. या तीनही युवकांचे जबाब या पथकाने नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे पथक बल्लारपूर पोलीस ठाण्यातही पोहोचले होते. तेथे पोलिसांकडून काही चौकशी केल्याचे समजते. या प्रकरणात रेल्वे पोलीस कोठडीत अनिल मडावीचा मृत्यू झाल्याने व त्याच्या सोबतच्या तरुणांना कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याने, रेल्वे पोलीस गोत्यात येण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.

नियम असा आहे की, कोठडीतील मृत्यू हे गंभीर प्रकरण मानले. कोठडीतील मृत्यू झाल्याचे कळले, तर अधिवेशन थांबविले जाते. आधी कोठडीतील मृत्यूवर चर्चा होते. कोठडीत उद्या कोणी कोणालाही मारू शकते. यासाठी हा नियम आहे. रेल्वे पोलीस कोठडीत झालेल्या अनिल मडावी मृत्युप्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते. त्याच अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे.- आ. सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री व लोकलेखा समिती प्रमुख, म.रा.

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार