शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

चिचोलीचा मालगुजारी तलाव कुचकामी

By admin | Updated: September 6, 2014 23:40 IST

नलेश्वर सिंचन प्रकल्पाला लागुनच चिचोली माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाची सिंचन क्षमता १५० हेक्टरच्या जवळपास आहे. शेकडो एकर शेती ओलिताखाली असताना, तलावाची मात्र

मोहाळी (नलेश्वर) : नलेश्वर सिंचन प्रकल्पाला लागुनच चिचोली माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाची सिंचन क्षमता १५० हेक्टरच्या जवळपास आहे. शेकडो एकर शेती ओलिताखाली असताना, तलावाची मात्र दुरवस्था झाली आहे. तुरूंबाला लिकेज असून तलावातील पाणी नाल्याला वाहून जात आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई उपविभाग सिंदेवाही यांच्या अखत्यारितीत हा तलाव येत असून संबंधीत विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक वर्षांपासून तलावाचे तुरूंब पूर्णत: लिकेज आहे. तलावाचे पाणी तुरूंबातुन नाल्याला वाहुन जात आहे. त्यामुळे तलावात सिंचनाकरिता पाणीच राहत नाही. त्यामुळे धान शेती पाण्याअभावी मरण्याची शक्यता आहे. तलावाच्या मुख्य नहराचीही मोडतोड झाली आहे.दुष्काळ निवारण्यासाठी व धान पिकाला संरक्षण देण्यासाठी ठिकठिकाणी मालगुजारी तलावाची निर्मीती करण्यात आली. नलेश्वर सिंचन प्रकल्पाच्या शेजारी हा मालगुजारी तलाव असुन या तलावाची ओळख चिचोली तलाव म्हणून आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या तलावाचे बांधकाम झालेले असुन या तलावाचे पाणी धान पिकाला दिले जाते. तलावाचे सिंचन क्षेत्र १५० हेक्टर आहे. हा तलाव जवळपास निर्मितीपासूनच दुर्लक्षित आहे. हा तलाव माजी माल गुजारी तलाव आहे किंवा नाही हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई विभागाला माहीतही नव्हते. या संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मुख्य पाळीला पूर्णत: जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या तलावाच्या मुख्य पाळीने सहजासहजी जाता येत नाही. तर तलावाचे तुरूंब पूर्णता लिकेज व फुटून असल्याने पाणी नाल्याला वाहुन जात असते. मुख्य नहर पूर्णत: मोळकळीस आल्याने मालगुजारी तलावाची अत्यंत दयनिय अवस्था आहे. यावर्षी अपुरा पाऊस व दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे. धान पीक करपली आहेत. तर अनेकांची रोवणी झालेली नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असुन कर्जाच्या दलदलीत आहे. अनेक तलावाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत नूतनीकरण करण्यात आले. मात्र चिचोली माजी मालगुजारी तलावाची अत्यंत बिकट अवस्था असतानादेखील जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई विभागाने अनेक वर्षांपासून याकडे लक्ष दिले नाही. वास्तविक पाहता १५० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या तलावाचे नूतनीकरण झाले असते तर, शेतकऱ्यांना सिंचनासाठीपाणी मिळाले असते.