शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

चिचोलीचा मालगुजारी तलाव कुचकामी

By admin | Updated: September 6, 2014 23:40 IST

नलेश्वर सिंचन प्रकल्पाला लागुनच चिचोली माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाची सिंचन क्षमता १५० हेक्टरच्या जवळपास आहे. शेकडो एकर शेती ओलिताखाली असताना, तलावाची मात्र

मोहाळी (नलेश्वर) : नलेश्वर सिंचन प्रकल्पाला लागुनच चिचोली माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाची सिंचन क्षमता १५० हेक्टरच्या जवळपास आहे. शेकडो एकर शेती ओलिताखाली असताना, तलावाची मात्र दुरवस्था झाली आहे. तुरूंबाला लिकेज असून तलावातील पाणी नाल्याला वाहून जात आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई उपविभाग सिंदेवाही यांच्या अखत्यारितीत हा तलाव येत असून संबंधीत विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक वर्षांपासून तलावाचे तुरूंब पूर्णत: लिकेज आहे. तलावाचे पाणी तुरूंबातुन नाल्याला वाहुन जात आहे. त्यामुळे तलावात सिंचनाकरिता पाणीच राहत नाही. त्यामुळे धान शेती पाण्याअभावी मरण्याची शक्यता आहे. तलावाच्या मुख्य नहराचीही मोडतोड झाली आहे.दुष्काळ निवारण्यासाठी व धान पिकाला संरक्षण देण्यासाठी ठिकठिकाणी मालगुजारी तलावाची निर्मीती करण्यात आली. नलेश्वर सिंचन प्रकल्पाच्या शेजारी हा मालगुजारी तलाव असुन या तलावाची ओळख चिचोली तलाव म्हणून आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या तलावाचे बांधकाम झालेले असुन या तलावाचे पाणी धान पिकाला दिले जाते. तलावाचे सिंचन क्षेत्र १५० हेक्टर आहे. हा तलाव जवळपास निर्मितीपासूनच दुर्लक्षित आहे. हा तलाव माजी माल गुजारी तलाव आहे किंवा नाही हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई विभागाला माहीतही नव्हते. या संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मुख्य पाळीला पूर्णत: जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या तलावाच्या मुख्य पाळीने सहजासहजी जाता येत नाही. तर तलावाचे तुरूंब पूर्णता लिकेज व फुटून असल्याने पाणी नाल्याला वाहुन जात असते. मुख्य नहर पूर्णत: मोळकळीस आल्याने मालगुजारी तलावाची अत्यंत दयनिय अवस्था आहे. यावर्षी अपुरा पाऊस व दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे. धान पीक करपली आहेत. तर अनेकांची रोवणी झालेली नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असुन कर्जाच्या दलदलीत आहे. अनेक तलावाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत नूतनीकरण करण्यात आले. मात्र चिचोली माजी मालगुजारी तलावाची अत्यंत बिकट अवस्था असतानादेखील जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई विभागाने अनेक वर्षांपासून याकडे लक्ष दिले नाही. वास्तविक पाहता १५० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या तलावाचे नूतनीकरण झाले असते तर, शेतकऱ्यांना सिंचनासाठीपाणी मिळाले असते.