शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

संगणकीकृत सातबारासाठी प्रत्येक गावात चावडी वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 00:41 IST

महाराष्ट्र शासनाने नुकतेच महसुल विभागांतगृत संगणीकृत सातबारा चावडी वाचन आणि गाळमुक्त धरण-गाळमुक्त शिवार या दोन महत्वाच्या योजना सुरू केल्या.

शेतकऱ्यांचा प्रतिसाद : गाळमुक्त धरण-गाळमुक्त शिवारलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : महाराष्ट्र शासनाने नुकतेच महसुल विभागांतगृत संगणीकृत सातबारा चावडी वाचन आणि गाळमुक्त धरण-गाळमुक्त शिवार या दोन महत्वाच्या योजना सुरू केल्या. सदर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल विभाग भद्रावतीद्वारे पालिका सभागृहात आज मंगळवारी लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार सचिन कुमावत, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, तलाठी व कोतवाल प्रामुख्याने उपस्थित होते.१५ मे ते १५ जुन या कालावधीपर्यंत प्रत्येक गावात चावडी वाचन होणार आहे. सुररुवातीच्या आॅनलाईन सातबारामध्ये काही चुका असल्यास त्या याद्वारे दुरूस्त करण्यात येणार आहे. दररोज प्रत्येक मंडळातील एका गावात वाचन होणार आहे. ग्रा.पं. कार्यालय, जि.प. शाळा आंगणवाडी किंवा चावडी येथे सकाळी ८ वाजता चावडी वाचनाला सुरुवात होईल. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी व पर्यवेक्षण अधिकारी म्हणून तहसिलदार, नायब तहसिलदार अव्वल कारकुन हे उपस्थित राहतील. उपस्थित शेतकऱ्यांना संगणीकृत सातबाराचे नोंट्री वाचून दाखविल्या जाईल. दुरूस्ती असल्यास लाल रंगाने सातबारावर दुरूस्ती दर्शविण्यात येणार आहे. चावडी वाचनाला उपस्थित नसणाऱ्या शेतकऱ्यासाठी त्यांचे घरी जावून संगणीकृत सातबाऱ्याच्या नोंट्री वाचुन दाखविल्या जाईल. शेतकरी व खातेदारांनी सातबारा तपासून स्वाक्षरी करून तलाठी यांना सातबारा वर्ग करायचा आहे. त्यानंतर १५ जुन ते ३१ जुलै या कालावधीत नोंदविण्यात आलेल्या सातबारावरील सर्व दुरूस्त्या संगणकात करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सचिव कुमावत यांनी उपस्थितांना सांगीतल. हीच पध्दत शहरालाही लागू राहील, असे नगराध्यक्ष अनिल धानोरकर म्हणाले.१ आॅगस्टपासून संपूर्णपणे संगणीकृत सातबाराचा वापर सुरू होणार आहे. या चावडी वाचनाच्या मोहीमेमुळे शेतकऱ्यांना गावात आपला संगणीकृत सातबारा पहायला मिळणार आहे. तसेच दुरूस्ती असल्यास तीदेखिल सुचविता येणार आहे. भविष्यात सातबारातील चुका काढण्यासाठी या कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे.भद्रावती तालुक्यातील प्रत्येक गावांसाठी दिनाक, वेळ व ठिकाण यानुसार कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. १६ मे रोजी कुचना, मुधोली, धोनाड, बरांज व सागरा येथे चावडी वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.या सोबतच तालुक्यातील लघुपाटबंधारे तलाव, मामा तलाव, पाझर तलाव आदींमधून गाळ काढणे, याकरिता गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मुखत्वेकरून तलावात, धरणात साचलेला गाळ काढून पाणी साठविण्यासाठी क्षमता वाढवणे व काढलेल्या मातीचा शेतकऱ्यांच्या शेतात उपयोग करणे, असा दुहेरी फ ायदा यात आहे.० ते २५० हे सिंचन क्षमता असलेल्या धरणाचा तलावाचा यात समावेश आहे. फ क्त शेतकऱ्यांच्या शेतात त्यांना माती घेऊन जाता येईल. वैयक्तीक शेतकरी, ग्रामपंचायत, कंपनीद्वारे उत्खनन करण्यात येईल. मातीच्या व्यावसायिक वापर करता येणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार भद्रावती यांच्याकडे अर्ज सादर करावे, अर्जाची उपअभियंता यांच्यामार्फत तपासणी करून प्रस्ताव सादर केला जाईल.