शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीकृत सातबारासाठी प्रत्येक गावात चावडी वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 00:41 IST

महाराष्ट्र शासनाने नुकतेच महसुल विभागांतगृत संगणीकृत सातबारा चावडी वाचन आणि गाळमुक्त धरण-गाळमुक्त शिवार या दोन महत्वाच्या योजना सुरू केल्या.

शेतकऱ्यांचा प्रतिसाद : गाळमुक्त धरण-गाळमुक्त शिवारलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : महाराष्ट्र शासनाने नुकतेच महसुल विभागांतगृत संगणीकृत सातबारा चावडी वाचन आणि गाळमुक्त धरण-गाळमुक्त शिवार या दोन महत्वाच्या योजना सुरू केल्या. सदर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल विभाग भद्रावतीद्वारे पालिका सभागृहात आज मंगळवारी लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार सचिन कुमावत, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, तलाठी व कोतवाल प्रामुख्याने उपस्थित होते.१५ मे ते १५ जुन या कालावधीपर्यंत प्रत्येक गावात चावडी वाचन होणार आहे. सुररुवातीच्या आॅनलाईन सातबारामध्ये काही चुका असल्यास त्या याद्वारे दुरूस्त करण्यात येणार आहे. दररोज प्रत्येक मंडळातील एका गावात वाचन होणार आहे. ग्रा.पं. कार्यालय, जि.प. शाळा आंगणवाडी किंवा चावडी येथे सकाळी ८ वाजता चावडी वाचनाला सुरुवात होईल. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी व पर्यवेक्षण अधिकारी म्हणून तहसिलदार, नायब तहसिलदार अव्वल कारकुन हे उपस्थित राहतील. उपस्थित शेतकऱ्यांना संगणीकृत सातबाराचे नोंट्री वाचून दाखविल्या जाईल. दुरूस्ती असल्यास लाल रंगाने सातबारावर दुरूस्ती दर्शविण्यात येणार आहे. चावडी वाचनाला उपस्थित नसणाऱ्या शेतकऱ्यासाठी त्यांचे घरी जावून संगणीकृत सातबाऱ्याच्या नोंट्री वाचुन दाखविल्या जाईल. शेतकरी व खातेदारांनी सातबारा तपासून स्वाक्षरी करून तलाठी यांना सातबारा वर्ग करायचा आहे. त्यानंतर १५ जुन ते ३१ जुलै या कालावधीत नोंदविण्यात आलेल्या सातबारावरील सर्व दुरूस्त्या संगणकात करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सचिव कुमावत यांनी उपस्थितांना सांगीतल. हीच पध्दत शहरालाही लागू राहील, असे नगराध्यक्ष अनिल धानोरकर म्हणाले.१ आॅगस्टपासून संपूर्णपणे संगणीकृत सातबाराचा वापर सुरू होणार आहे. या चावडी वाचनाच्या मोहीमेमुळे शेतकऱ्यांना गावात आपला संगणीकृत सातबारा पहायला मिळणार आहे. तसेच दुरूस्ती असल्यास तीदेखिल सुचविता येणार आहे. भविष्यात सातबारातील चुका काढण्यासाठी या कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे.भद्रावती तालुक्यातील प्रत्येक गावांसाठी दिनाक, वेळ व ठिकाण यानुसार कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. १६ मे रोजी कुचना, मुधोली, धोनाड, बरांज व सागरा येथे चावडी वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.या सोबतच तालुक्यातील लघुपाटबंधारे तलाव, मामा तलाव, पाझर तलाव आदींमधून गाळ काढणे, याकरिता गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मुखत्वेकरून तलावात, धरणात साचलेला गाळ काढून पाणी साठविण्यासाठी क्षमता वाढवणे व काढलेल्या मातीचा शेतकऱ्यांच्या शेतात उपयोग करणे, असा दुहेरी फ ायदा यात आहे.० ते २५० हे सिंचन क्षमता असलेल्या धरणाचा तलावाचा यात समावेश आहे. फ क्त शेतकऱ्यांच्या शेतात त्यांना माती घेऊन जाता येईल. वैयक्तीक शेतकरी, ग्रामपंचायत, कंपनीद्वारे उत्खनन करण्यात येईल. मातीच्या व्यावसायिक वापर करता येणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार भद्रावती यांच्याकडे अर्ज सादर करावे, अर्जाची उपअभियंता यांच्यामार्फत तपासणी करून प्रस्ताव सादर केला जाईल.