शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलला

By admin | Updated: April 16, 2016 00:41 IST

शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थानच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडी कात टाकत आहे.

बांधकाम अंतिम टप्प्यात : गजानन महाराज संस्थानचा पुढाकारघनश्याम नवघडे नागभीडशेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थानच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडी कात टाकत आहे. या ठिकाणी अनेक बांधकाम सुरू असून या बांधकामांनी अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. अड्याळ टेकडीचे बदललेले हे रूप पर्यटकांच्या आंनदात भर पाडत आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने गीताचार्य तुकारामदादा यांनी आपल्या साधनेसाठी अड्याळ टेकडीची निवड केली. या अड्याळ टेकडीवर त्यांनी अखंड १२ वर्ष मौन धारण करून साधना केली. त्यानंतर ते लोकसेवेसाठी बाहेर पडले. संबंध महाराष्ट्रात व देशात त्यांचे समाजसेवेचे कार्य सुरू असताना अड्याळ टेकडीवरही त्यांनी विशेष लक्ष पुरविले. अड्याळ टेकडीवर त्यांनी स्वत:च्या कल्पनेतील सार्वभौम असे एक खेडे तर निर्माण केलेच पण त्याचबरोबर अड्याळ टेकडीच्या पंचक्रोशीत असलेल्या खेड्यांना स्वावलंबनाची दिक्षा देण्याचे कार्यही अविरत केले. अशा या महान आणि आदर्श अशा समाजसेवकांनी ८ जून २००६ रोजी आपले इहलोकीचे कार्य कायमचे संपविले.त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संबंध महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. अशाच मान्यवरांपैकी शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत शिवशंकर पाटील यांनी गीताचार्य तुकाराम दादा आणि आपले काय नाते होते, हे सांगून ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली, त्या ठिकाणी दादांच्या समाधी स्थळासाठी शेगाव संस्थान दोन कोटी रुपये खर्च करणार असल्याची ग्वाही दिली.शिवशंकर पाटील यांच्या ग्वाहीनुसार दादांच्या समाधीस्थळांचे बांधकाम काही दिवसाअगोदर हाती घेण्यात आले. हे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. समाधीस्थळांचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी पद्धतीचे असून बांधकामासाठी लागणारा दगड आणि कारागिरसुद्धा राजस्थानातूनच मागविण्यात आले आहेत. समाधीस्थळाच्या पूर्वेला विशाल असे जलाशय, लता वेली आणि विविध जातीच्या वृक्षांनी बहरलेली अड्याळ टेकडी आणि त्या टेकडीवर हे विलोभनीय बांधकाम. त्यामुळे अड्याळ टेकडीचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे. गीताचार्य तुकारामदादा ज्या ठिकाणी बसून गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन करीत त्या ठिकाणी भव्य असे सभागृह बांधण्यात आले आहे. आणखी छोटी-मोठी अनेक कामे करण्यात आली आहे. या कामांनी अड्याळ टेकडीचा चेहरा मोेहराच बदलून गेला आहे. ज्यांनी अड्याळ टेकडीला दोन वर्षाअगोदर भेट दिली होती, त्यांनी जर आज भेट दिली तर ही नवलाई डोळ्यात भरल्याखेरीज राहणार नाही.