शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

चंद्रपूरकर हरवितात दिवसाला चार मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

चंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. त्याच तुलनेत मोबाईल चोरट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षभरात ...

चंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. त्याच तुलनेत मोबाईल चोरट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षभरात पोलिसांकडे सुमारे १३४७ मोबाईल हरविल्याची, गहाळ झाल्याच्या तक्रार विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झाली आहे. सन २०२० ची मोबाईल गहाळ झाल्याची आकडेवारी २०१९ च्या तुलनेत निम्मी असली तरीही चिंताजनक आहे. स्मार्ट मोबाईल आता चैनीची वस्तू नाही तर सर्वसामान्यांची गरज बनली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून मोबाईलकडे बघितल्या जाते. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाल्याने तसेच अनेक खासगी कंपनीतील कामे ऑनलाईन सुरू असल्याने मोठ्यांपासून सगळ्याकडेच स्मार्ट मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईल चोरटेसुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून, मोबाईल चोरीच्या संख्येतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून सन २०१९ मध्ये २९७९ तर २०२० मध्ये १३४७ मोबाईल गहाळ झाले आहेत. पोलिसांनी ऑनलाईन तपास करून ३० ते ४० टक्के मोबाईल शोधण्यास यश आले आहे.

बॉक्स

गर्दीच्या ठिकाणी जाताय, मोबाईल सांभाळा

यात्रा, समारंभ, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी मोबाईल चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. बहुतेक वेळा त्यांची टोळीच असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. गर्दीचे ठिकाण हेरून अत्यंत शिताफीने मोबाईल लंपास करतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मोबाईल सांभाळणे गरजेचे आहे.

बॉक्स

१३४७ पैकी ७५६ मोबाईल शोधण्यात यश

मोबाईल चोरी झाल्यानंतर त्याची संपूर्ण कागदपत्राच्या आधार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात येते. हा तपास सायबर विभागाकडे असतो. तक्रार मिळताच पोलीस ट्रेस करीत असतात. मोबाईल ट्रेस झाल्यानंतर पोलिसांना शोध लावणे शक्य होत असते. साधारणात: ३० ते ४० टक्के मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. सन २०१९ मध्ये २९७९ पैकी १४८० तर सन २०२० मध्ये १३४७ पैकी ७५६ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.