शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चंद्रपूरकर हरवितात दिवसाला चार मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

चंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. त्याच तुलनेत मोबाईल चोरट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षभरात ...

चंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. त्याच तुलनेत मोबाईल चोरट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षभरात पोलिसांकडे सुमारे १३४७ मोबाईल हरविल्याची, गहाळ झाल्याच्या तक्रार विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झाली आहे. सन २०२० ची मोबाईल गहाळ झाल्याची आकडेवारी २०१९ च्या तुलनेत निम्मी असली तरीही चिंताजनक आहे. स्मार्ट मोबाईल आता चैनीची वस्तू नाही तर सर्वसामान्यांची गरज बनली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून मोबाईलकडे बघितल्या जाते. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाल्याने तसेच अनेक खासगी कंपनीतील कामे ऑनलाईन सुरू असल्याने मोठ्यांपासून सगळ्याकडेच स्मार्ट मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईल चोरटेसुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून, मोबाईल चोरीच्या संख्येतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून सन २०१९ मध्ये २९७९ तर २०२० मध्ये १३४७ मोबाईल गहाळ झाले आहेत. पोलिसांनी ऑनलाईन तपास करून ३० ते ४० टक्के मोबाईल शोधण्यास यश आले आहे.

बॉक्स

गर्दीच्या ठिकाणी जाताय, मोबाईल सांभाळा

यात्रा, समारंभ, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी मोबाईल चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. बहुतेक वेळा त्यांची टोळीच असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. गर्दीचे ठिकाण हेरून अत्यंत शिताफीने मोबाईल लंपास करतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मोबाईल सांभाळणे गरजेचे आहे.

बॉक्स

१३४७ पैकी ७५६ मोबाईल शोधण्यात यश

मोबाईल चोरी झाल्यानंतर त्याची संपूर्ण कागदपत्राच्या आधार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात येते. हा तपास सायबर विभागाकडे असतो. तक्रार मिळताच पोलीस ट्रेस करीत असतात. मोबाईल ट्रेस झाल्यानंतर पोलिसांना शोध लावणे शक्य होत असते. साधारणात: ३० ते ४० टक्के मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. सन २०१९ मध्ये २९७९ पैकी १४८० तर सन २०२० मध्ये १३४७ पैकी ७५६ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.