शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरकर हरवितात दिवसाला चार मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

चंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. त्याच तुलनेत मोबाईल चोरट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षभरात ...

चंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. त्याच तुलनेत मोबाईल चोरट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षभरात पोलिसांकडे सुमारे १३४७ मोबाईल हरविल्याची, गहाळ झाल्याच्या तक्रार विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झाली आहे. सन २०२० ची मोबाईल गहाळ झाल्याची आकडेवारी २०१९ च्या तुलनेत निम्मी असली तरीही चिंताजनक आहे. स्मार्ट मोबाईल आता चैनीची वस्तू नाही तर सर्वसामान्यांची गरज बनली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून मोबाईलकडे बघितल्या जाते. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाल्याने तसेच अनेक खासगी कंपनीतील कामे ऑनलाईन सुरू असल्याने मोठ्यांपासून सगळ्याकडेच स्मार्ट मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईल चोरटेसुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून, मोबाईल चोरीच्या संख्येतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून सन २०१९ मध्ये २९७९ तर २०२० मध्ये १३४७ मोबाईल गहाळ झाले आहेत. पोलिसांनी ऑनलाईन तपास करून ३० ते ४० टक्के मोबाईल शोधण्यास यश आले आहे.

बॉक्स

गर्दीच्या ठिकाणी जाताय, मोबाईल सांभाळा

यात्रा, समारंभ, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी मोबाईल चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. बहुतेक वेळा त्यांची टोळीच असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. गर्दीचे ठिकाण हेरून अत्यंत शिताफीने मोबाईल लंपास करतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मोबाईल सांभाळणे गरजेचे आहे.

बॉक्स

१३४७ पैकी ७५६ मोबाईल शोधण्यात यश

मोबाईल चोरी झाल्यानंतर त्याची संपूर्ण कागदपत्राच्या आधार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात येते. हा तपास सायबर विभागाकडे असतो. तक्रार मिळताच पोलीस ट्रेस करीत असतात. मोबाईल ट्रेस झाल्यानंतर पोलिसांना शोध लावणे शक्य होत असते. साधारणात: ३० ते ४० टक्के मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. सन २०१९ मध्ये २९७९ पैकी १४८० तर सन २०२० मध्ये १३४७ पैकी ७५६ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.