शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

चंद्रपूरकर हरवितात दिवसाला चार मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

चंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. त्याच तुलनेत मोबाईल चोरट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षभरात ...

चंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. त्याच तुलनेत मोबाईल चोरट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षभरात पोलिसांकडे सुमारे १३४७ मोबाईल हरविल्याची, गहाळ झाल्याच्या तक्रार विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झाली आहे. सन २०२० ची मोबाईल गहाळ झाल्याची आकडेवारी २०१९ च्या तुलनेत निम्मी असली तरीही चिंताजनक आहे. स्मार्ट मोबाईल आता चैनीची वस्तू नाही तर सर्वसामान्यांची गरज बनली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून मोबाईलकडे बघितल्या जाते. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाल्याने तसेच अनेक खासगी कंपनीतील कामे ऑनलाईन सुरू असल्याने मोठ्यांपासून सगळ्याकडेच स्मार्ट मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईल चोरटेसुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून, मोबाईल चोरीच्या संख्येतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून सन २०१९ मध्ये २९७९ तर २०२० मध्ये १३४७ मोबाईल गहाळ झाले आहेत. पोलिसांनी ऑनलाईन तपास करून ३० ते ४० टक्के मोबाईल शोधण्यास यश आले आहे.

बॉक्स

गर्दीच्या ठिकाणी जाताय, मोबाईल सांभाळा

यात्रा, समारंभ, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी मोबाईल चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. बहुतेक वेळा त्यांची टोळीच असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. गर्दीचे ठिकाण हेरून अत्यंत शिताफीने मोबाईल लंपास करतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मोबाईल सांभाळणे गरजेचे आहे.

बॉक्स

१३४७ पैकी ७५६ मोबाईल शोधण्यात यश

मोबाईल चोरी झाल्यानंतर त्याची संपूर्ण कागदपत्राच्या आधार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात येते. हा तपास सायबर विभागाकडे असतो. तक्रार मिळताच पोलीस ट्रेस करीत असतात. मोबाईल ट्रेस झाल्यानंतर पोलिसांना शोध लावणे शक्य होत असते. साधारणात: ३० ते ४० टक्के मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. सन २०१९ मध्ये २९७९ पैकी १४८० तर सन २०२० मध्ये १३४७ पैकी ७५६ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.