शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर महावितरणने ४ हजार ५८५ वीज ग्राहकांना दिला शाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:00 IST

पोकळ आश्वासनांमुळे विनाकारण अंधारात राहण्याची वेळ सामान्य वीज ग्राहकांवर आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले. या काळात मोठ्या संख्येने ग्राहकांनी वीजबिल थकविले. विशेष म्हणजे, जे ग्राहक दर महिन्यात वीजबिल भरत होते. त्यांनीही काही राजकीय पक्षांच्या भूमिकांमुळे बिल माफ होईल या आशेपोटी बिल भरणे टाळले. 

ठळक मुद्देथकबाकीदारांना अंधारात राहण्याची आली वेळ : २८ फेब्रुवारीपर्यंत होणार अन्य थकबाकीदारांची वीज कट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाकाळात मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून वीजबिल थकविलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४  हजार ५८५ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करीत महावितरण कंपनीने ग्राहकांना वीज शाॅक दिला आहे. विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारीपर्यंत वीजबिल न भरल्यास उर्वरित ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांनी दिलेल्या आश्वासनाचे काय, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला आहे. पोकळ आश्वासनांमुळे विनाकारण अंधारात राहण्याची वेळ सामान्य वीज ग्राहकांवर आली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले. या काळात मोठ्या संख्येने ग्राहकांनी वीजबिल थकविले. विशेष म्हणजे, जे ग्राहक दर महिन्यात वीजबिल भरत होते. त्यांनीही काही राजकीय पक्षांच्या भूमिकांमुळे बिल माफ होईल या आशेपोटी बिल भरणे टाळले. दरम्यान, यासाठी विविध आंदोलनेही झाली. मात्र, सरकारने आजपर्यंत यावर कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या बिलाचा भर पडत ग्राहकांवर सद्यस्थितीत हजारो रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे महावितरणने आता सक्त पाऊल उचलले असून थकबाकीदारांची वीज कट करण्याचा  सपाटा सुरू केला आहे. यासाठी महावितरणला वरिष्ठांकडून २८ फेब्रुवारीपर्यंत वसुली करण्याचे सक्त आदेश आले आहे.  दरम्यान, २४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा एकंदरीत ४ हजार ५८५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.  यात चंद्रपूर मंडळातील ३ हजार ३५८ घरगुती, १०५८ वाणिज्यिक व १६९ औद्योगिक  ग्राहकांचा समावेश आहे. 

  ४६ हजार ८७९ ग्राहकांनी थकविले बिलएप्रिल २०२० पासून २४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा एकंदरीत ८८ हजार २१४ ग्राहकांनी ७० कोटींचा २० लाखांचा भरणा केला नाही. चंद्रपूर मंडळातील ४६ हजार ८७९ हजार ग्राहकांनी ४४ कोटी ५० लाख व गडचिरोली मंडळातील ४१ हजार ३३५ ग्राहकांनी २५ कोटी ८० लाख भरले नाहीत. 

सर्व  थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई  सुरू आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत अशा थकबाकीदारांनी वीजबिलांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.     - सुनील देशपांडे , मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

  २८ हजार ग्राहक बचावलेमागील दहा महिन्यांपासून एकही वीजबिल न भरलेल्या ग्राहकांपैकी २८ हजार २८ ग्राहकांनी २३ कोटी ७० लाखांच्या वीजबिलाचा भरणा केला. त्यामुळे या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होण्यापासून बचावले आहे.

  गावातील नेते गायबवीज कट करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीज कट करू देऊ नका, आम्हाला सांगा असे म्हणणारे बहुतांश गावातील नेतेही आता गायब झाले आहे.

 

टॅग्स :electricityवीज