शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
3
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
4
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
5
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
6
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
7
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
8
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
9
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
10
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
11
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
12
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
13
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
14
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
15
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!
16
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
17
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
18
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
19
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
20
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे

चंद्रपूर झाले डास उत्पत्ती केंद्र

By admin | Updated: July 10, 2015 01:31 IST

चंद्रपूर महानगरपालिकेत मागील काही महिन्यांपासून कचरा संकलनाच्या कंत्राटावरून चांगलाच वाद पेटला आहे.

रवी जवळे चंद्रपूरचंद्रपूर महानगरपालिकेत मागील काही महिन्यांपासून कचरा संकलनाच्या कंत्राटावरून चांगलाच वाद पेटला आहे. या भांडणात मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांना मूळ शहर स्वच्छतेचाच विसर पडल्याचे दिसून येते. घराघरातून कचरा संकलन करणे तर दूर रस्त्यांवरील कचराही नीट उचलला जात नसल्याने शहर स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. कचरा पेट्या तुंबलेल्या, नाल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य, रस्त्याच्या कडेला साचून असलेला केरकचरा, यामुळे चंद्रपूर शहरच डासांचे उत्पत्ती केंद्र झाले आहे. शहरभर डासांचे थैमान असतानाही मनपाला औषध, धूर फवारणी करावीशी वाटू नये, ही बाब संताप अनावर करणारी आहे.चंद्रपूरला नगरपालिका असतानाही स्वच्छतेबाबत हे प्रशासन कधीही गंभीर वाटले नाही. नगरपालिका होती, तेव्हापासून असलेल्या शहरातील घाणीचे साम्राज्य महानगरपालिका झाल्यानंतरही कमी होऊ शकले नाही. चंद्रपुरात महानगरपालिका झाल्यानंतर ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ ही संकल्पना पूर्णत्वास येईल, अशी सर्वांना आशा होती. त्या दृष्टीने कामेही सुरू झाली. भूमिगत मलनिस्सारण योजनेला मंजुरी देत महानगरपालिकेने या योजनेच्या कामाला सुरूवातही केली. त्यानंतर शहरातील कचरा डम्पींग यार्डवर टाकण्याचे कंत्राट नागपूर येथील कंपनीला दिले. या कंपनीने महानगरपालिकेला केलेल्या कराराप्रमाणे कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी नवीन वाहनेही चंद्रपुरात आणली. प्रारंभी अतिशय गांभीर्याने शहरातील कचरा उचलला जाऊ लागला. मात्र त्यानंतर यात अनियमिता दिसू लागली आणि शहरात घाणीचे साम्राज्य दृष्टीस पडू लागले. त्यानंतर नवी युक्ती काढत मनपाने घराघरातून कचरा संकलन करण्याचे नवीन टेंडर काढले. नागपूर येथील त्याच कंपनीला हे आणखी वेगळे टेंडर देण्यात आले. यावरून सध्या महानगरपालिकेत अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक यांच्यामध्ये खडाजंगी उडाली आहे. मागील अनेक दिवसांपासून हा वाद सुरू आहे. या वादात शहरातील कचरा उचलण्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. कचरा कुंड्या तुडूंब भरून असतानाही त्यातील कचरा काढून डम्पींग यार्डवर टाकला जात नाही. याशिवाय नाल्यांमधील गाळही साफ केला जात नाही. त्यामुळे सध्या चंद्रपूर शहरात डासांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. प्रत्येक वार्डातील नागरिक सध्या डासांमुळे हैराण झाले आहेत. तरीही महानगरपालिका प्रशासनाला याचे काही सोयरसूतक असल्याचे वाटत नाही. त्यामुळे चंद्रपुरात डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे.