शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

चंद्रपूर जिल्हा सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 22:12 IST

जिल्ह्याच्या विविध भागात नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा सुरू होत्या. तालुकास्थळांच्या सीमेवरही त्या त्या भागातील पोलीस तैनात होते. तरीही काही नागरिक शहरातून फिरताना आढळले. सकाळी काही नागरिक नेहमीप्रमाणे बाहेर पडताना दिसले. विनाकारण बाहेर पडलेल्यांना पोलिसांच्या दंड्याचा सौम्य का होईना मार खावा लागला. या शिवाय जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडल्याचे ऐकिवात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू होताच जिल्ह्याच्या सर्व बाजूच्या सीमा सील करण्यात आल्या. बाहेरून येणाऱ्यांना सीमेवरच अडविण्यात आले. जिल्ह्याच्या विविध भागात नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा सुरू होत्या. तालुकास्थळांच्या सीमेवरही त्या त्या भागातील पोलीस तैनात होते. तरीही काही नागरिक शहरातून फिरताना आढळले. सकाळी काही नागरिक नेहमीप्रमाणे बाहेर पडताना दिसले. विनाकारण बाहेर पडलेल्यांना पोलिसांच्या दंड्याचा सौम्य का होईना मार खावा लागला. या शिवाय जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडल्याचे ऐकिवात नाही.चंद्रपूर महानगरातील रस्त्यांवर सकाळी नागरिक काही प्रमाणात बाहेर पडले होते. मात्र प्रत्येक ठिकाणी पोलीस अडवत असल्यामुळे दुपारनंतर अपवाद वगळता कुणीही फिरकताना दिसले नाही. काहींना पोलिसांच्या लाठ्यांचा सामना करावा लागला. शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. किराणा दुकाने, पेट्रोल पंप सुरू होते. हीच स्थिती जिल्ह्यातील चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, पोंभूर्णा, सावली, मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा व भद्रावती या तालुक्यांची व तालुक्यातील गावांची होती. संचारबंदीमुळे नागरिक कुटुंबीयांसह घरातच राहणेच पसंत केले.मनपाद्वारे प्रतिबंधात्मक फवारणीराज्यात करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन भविष्यात उद्भवणारी आपात्कालीन सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी महानगर पालिकेने शहरातील सर्व वार्डांमध्ये जंतूनाशक फवारणी सुरू करण्यात आली. बाजार, रेल्वेस्थानक, बसस्थानक, वर्दळीच्या ठिकाणी, पब्लिक कम्युनिटी टॉयलेट व रूग्णालयांमध्ये फवारणी धुरळणी केली जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने पसरत असल्याने नागरिकांनी आपली काळजी स्वत: घ्यायची आहे. या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तुंसाठी घराबाहेर पडा, परंतु गरज नसताना घराबाहेर निघू नये, असा सल्ला प्रशासनातर्फे देण्यात येत आहे.चंद्रपुरात ७५ दुचाकीस्वारांना दंडचंद्रपूर : संचारबंदीच्या काळात विनाकारण दुचाकीने शहरात फिरणाऱ्या ७५ दुचाकीस्वारांवर मंगळवारी रामनगर पोलिसांनी विविध कलमातंर्गत दंड ठोठावला. प्रशासनाच्या निर्देशांचे यापुढेही पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व रामनगरचे ठाणेदार हाके यांनी केले.माणिकगड कंपनी सुरूच - आमदाराची तक्रारकोरपना : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासन परिश्रम घेत आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही मंगळवारी माणिकगड सिमेंट कंपणीने कामगारांना कामावर बोलावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीत शेकडो कामगार कामावर आहेत. सर्व कंपन्या बंद करण्याचे आदेश असताना या कंपनीने कामगारांना कामावर बोलाविल्याने कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकºयांकडे केली आहे.