शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

कोविड रुग्णांच्या दुरुस्ती दरात चंद्रपूर जिल्हा सहाव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा तोकडी पडली. त्यामध्ये वाढ करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे ...

चंद्रपूर : कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा तोकडी पडली. त्यामध्ये वाढ करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. मात्र, नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांच्या तुलनेत कोविड रुग्णांच्या दुरुस्ती (रिकव्हरी रेट) दरात चंद्रपूर जिल्हा शेवटच्या स्थानी, तर मृत्युदर रोखण्यात दोन जिल्ह्यांपेक्षा पुढे असल्याची माहिती राज्य शासनाच्या कोविड-१९ डॅश बोर्डातून पुढे आली.

जिल्ह्यात रविवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ८४०वर पोहोचली आहे. उपचारामुळे ठणठणीत होणाऱ्या रुग्णसंख्याही ३६ हजार ४१५ झाली आहे. सध्या १५ हजार ६३७ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यात आल्याने चाचण्यांचा वेग वाढला. परिणामी, आतापर्यंत तीन लाख ५७ हजार २६२ नमुन्यांची तपासणी करणे आरोग्य यंत्रणेला शक्य होऊ शकले. आतापर्यंत तपासलेल्या नमुन्यांपैकी दोन लाख ९८ हजार ४१८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. परंतु नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या पाच जिल्ह्यांतील पॉझिटिव्ह, अ‍ॅक्टिव्ह, निगेटिव्ह आणि कोरोना दुरुस्ती दराचा तुलनात्मक विचार केल्यास चंद्रपूर जिल्हा मागे असल्याचे आरोग्य विभागाच्या कोविड १९ डॅशबोर्ड अहवालातून दिसून येते.

नागपूरनंतर सर्वाधिक पॉझिटिव्ह चंद्रपुरात

२४ एप्रिलपर्यंत नागपूर जिल्ह्यात तीन लाख ७७ हजार ५००, वर्धा ३६ हजार ९१० व भंडारा ४४ हजार ०६१, तर चंद्रपूर जिल्ह्यात ५२ हजार ४२९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. नागपूर विभागातून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमाकांवर आहे. दरदिवशी सुमारे दीड हजार नवीन रुग्णांची भर पडत असल्याने सर्वांच्याच काळजात धडकी भरली आहे.

भंडारा जिल्ह्याने नेमके काय केले?

चंद्रपूर व भंडारातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत केवळ आठ हजार ३६८ रुग्णांचाच फरक आहे. मात्र, भंडाऱ्यातील रुग्णांचा दुरुस्ती दर तब्बल ९०.४ टक्के तर चंद्रपूर जिल्ह्याचा ५८.३ टक्के आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा आरोग्य यंत्रणेने नेमके काय केले, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.

मृत्युतांडवातही एक दिलासा

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये नागपूर व वर्धा जिल्ह्याचा कोविड मृत्युदर प्रत्येकी १.३ टक्के आहे. या दोनही जिल्ह्यांच्या तुलनेत सध्या तरी चंद्रपूर जिल्ह्यातील मृत्युदर १.१ टक्के आहे. त्यामुळे मृत्युतांडव रोखण्यासाठी रात्रंदिवस लढणाऱ्या प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या आवाहनाला नागरिकांनीच आता गंभीरतेने प्रतिसाद देऊन सावध व्हावे लागणार आहे.