शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कोविड रुग्णांच्या दुरुस्ती दरात चंद्रपूर जिल्हा सहाव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा तोकडी पडली. त्यामध्ये वाढ करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे ...

चंद्रपूर : कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा तोकडी पडली. त्यामध्ये वाढ करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. मात्र, नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांच्या तुलनेत कोविड रुग्णांच्या दुरुस्ती (रिकव्हरी रेट) दरात चंद्रपूर जिल्हा शेवटच्या स्थानी, तर मृत्युदर रोखण्यात दोन जिल्ह्यांपेक्षा पुढे असल्याची माहिती राज्य शासनाच्या कोविड-१९ डॅश बोर्डातून पुढे आली.

जिल्ह्यात रविवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ८४०वर पोहोचली आहे. उपचारामुळे ठणठणीत होणाऱ्या रुग्णसंख्याही ३६ हजार ४१५ झाली आहे. सध्या १५ हजार ६३७ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यात आल्याने चाचण्यांचा वेग वाढला. परिणामी, आतापर्यंत तीन लाख ५७ हजार २६२ नमुन्यांची तपासणी करणे आरोग्य यंत्रणेला शक्य होऊ शकले. आतापर्यंत तपासलेल्या नमुन्यांपैकी दोन लाख ९८ हजार ४१८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. परंतु नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या पाच जिल्ह्यांतील पॉझिटिव्ह, अ‍ॅक्टिव्ह, निगेटिव्ह आणि कोरोना दुरुस्ती दराचा तुलनात्मक विचार केल्यास चंद्रपूर जिल्हा मागे असल्याचे आरोग्य विभागाच्या कोविड १९ डॅशबोर्ड अहवालातून दिसून येते.

नागपूरनंतर सर्वाधिक पॉझिटिव्ह चंद्रपुरात

२४ एप्रिलपर्यंत नागपूर जिल्ह्यात तीन लाख ७७ हजार ५००, वर्धा ३६ हजार ९१० व भंडारा ४४ हजार ०६१, तर चंद्रपूर जिल्ह्यात ५२ हजार ४२९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. नागपूर विभागातून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमाकांवर आहे. दरदिवशी सुमारे दीड हजार नवीन रुग्णांची भर पडत असल्याने सर्वांच्याच काळजात धडकी भरली आहे.

भंडारा जिल्ह्याने नेमके काय केले?

चंद्रपूर व भंडारातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत केवळ आठ हजार ३६८ रुग्णांचाच फरक आहे. मात्र, भंडाऱ्यातील रुग्णांचा दुरुस्ती दर तब्बल ९०.४ टक्के तर चंद्रपूर जिल्ह्याचा ५८.३ टक्के आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा आरोग्य यंत्रणेने नेमके काय केले, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.

मृत्युतांडवातही एक दिलासा

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये नागपूर व वर्धा जिल्ह्याचा कोविड मृत्युदर प्रत्येकी १.३ टक्के आहे. या दोनही जिल्ह्यांच्या तुलनेत सध्या तरी चंद्रपूर जिल्ह्यातील मृत्युदर १.१ टक्के आहे. त्यामुळे मृत्युतांडव रोखण्यासाठी रात्रंदिवस लढणाऱ्या प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या आवाहनाला नागरिकांनीच आता गंभीरतेने प्रतिसाद देऊन सावध व्हावे लागणार आहे.