शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

चंद्रपूर जिल्हा बाजारपेठेत माघारला

By admin | Updated: October 28, 2015 01:19 IST

कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात.

प्रकाश काळे गोवरीकापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. मात्र दरवर्षी कापसाला मिळणारा तोकडा दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे. जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर असतानाही कापसाची मोठी बाजारपेठ चंद्रपूर जिल्ह्यात व्हावी, अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र कापूस उत्पादकांची हाक शासन दरबारी पोहोचली नाही. त्यामुळे कापसाचा जिल्ह्याच बाजारपेठेत माघारला आहे.कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. कापसाच्या उत्पादनार शेतकऱ्यांचा वर्षभराचा वार्षिक बजेट अवलंबून असतो. विदर्भाच्या सुपिक मातीत कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा, भद्रावती हे तालुके कापसासाठी अग्रेसर मानले जातात. शेतकऱ्यांची भिस्तच कापसावर असल्यने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापूस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. कापसाचा उत्पादन खर्च बघता, त्या तुलनेत मिळणारा कापसाचा दर तोकडा आहे. उत्पादनावर केलेला खर्च भरुन निघणार नाही, एवढी बिकट अवस्था पिकांची झाली आहे. दिवसरात्रं काबाडकष्ट करुन हाडाची काडं करणारा शेतकरी कापसाच्या रुपात पांढरे सोने पिकवितो. सोन्यासारखाच कापसाला भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तीन- चार दशकापासून शेतकरी कापूस पिकवत आहे. परंतु शेतकऱ्यांची होत असलेली परवड अजुनही थांबलेली नाही. कापूस उत्पादकांच्या चंद्रपूर जिल्ह्यात कापसाची सर्वांत मोठी बाजारपेठ व्हावी, ही शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांची आर्त हाक शासन दरबारी पोहोचलीच नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवूनही शेतकऱ्यांना तो नाईलाजाने परप्रांतात विकावा लागत आहे. तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या तुलनेत कापसाच्या बाजारपेठच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा पोरका झाला आहे. जिल्ह्यात कापसाचे मोठे उत्पादन घेऊनही कापसाला मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना कापूस बाहेरील राज्यात विकावा लागत आहे. त्यासाठी लागणारा प्रवास खर्च शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे.यावर्षी कापूस पिकाला योग्य दर मिळेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु मायबाप सरकारने चार हजार १०० रुपये हमीभाव कापसाला जाहीर केला. कापसाला दिला गेलेला तोकडा दर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखा आहे. यावर्षी अपुऱ्या पडलेल्या पावसाने उत्पादनात मोठी घट झाली आहे. कापूस वेचणीचे दर सहा ते सात रुपये झाल्याने व मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव काकुळतीला आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात कापूस फुटून आहे. मात्र कापूस वेचणीला मजुर मिळविण्यासाठी शेतकरी मजुरांच्या शोधात गावोगाव फिरत आहेत. त्यांना प्रवासाचा वेगळा खर्च देऊनही मजुरांची वाणवा आहे. कापूस झाडावर लोंबकळत असल्याने तो कोणत्याही क्षणी भूईसपाट होण्याच्या धोका निर्माण झाला आहे. सारी यंत्रणाच शेतकऱ्यांच्या विरुद्ध उभी ठाकल्याने दिवसेंदिवस शेती परवडेनाशी झाली आहे. शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना छळत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शासकीय कापूस संकलन केंद्रावर कापूस खरेदीचा श्रीगणेशाच झाला नाही. त्यामुळे खासगी व्यापारी याचा पूरेपूर फायदा घेऊन कवडीमोल गावात कापसाची खरेदी करीत आहे.