शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्हा बाजारपेठेत माघारला

By admin | Updated: October 28, 2015 01:19 IST

कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात.

प्रकाश काळे गोवरीकापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. मात्र दरवर्षी कापसाला मिळणारा तोकडा दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे. जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर असतानाही कापसाची मोठी बाजारपेठ चंद्रपूर जिल्ह्यात व्हावी, अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र कापूस उत्पादकांची हाक शासन दरबारी पोहोचली नाही. त्यामुळे कापसाचा जिल्ह्याच बाजारपेठेत माघारला आहे.कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. कापसाच्या उत्पादनार शेतकऱ्यांचा वर्षभराचा वार्षिक बजेट अवलंबून असतो. विदर्भाच्या सुपिक मातीत कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा, भद्रावती हे तालुके कापसासाठी अग्रेसर मानले जातात. शेतकऱ्यांची भिस्तच कापसावर असल्यने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापूस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. कापसाचा उत्पादन खर्च बघता, त्या तुलनेत मिळणारा कापसाचा दर तोकडा आहे. उत्पादनावर केलेला खर्च भरुन निघणार नाही, एवढी बिकट अवस्था पिकांची झाली आहे. दिवसरात्रं काबाडकष्ट करुन हाडाची काडं करणारा शेतकरी कापसाच्या रुपात पांढरे सोने पिकवितो. सोन्यासारखाच कापसाला भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तीन- चार दशकापासून शेतकरी कापूस पिकवत आहे. परंतु शेतकऱ्यांची होत असलेली परवड अजुनही थांबलेली नाही. कापूस उत्पादकांच्या चंद्रपूर जिल्ह्यात कापसाची सर्वांत मोठी बाजारपेठ व्हावी, ही शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांची आर्त हाक शासन दरबारी पोहोचलीच नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवूनही शेतकऱ्यांना तो नाईलाजाने परप्रांतात विकावा लागत आहे. तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या तुलनेत कापसाच्या बाजारपेठच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा पोरका झाला आहे. जिल्ह्यात कापसाचे मोठे उत्पादन घेऊनही कापसाला मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना कापूस बाहेरील राज्यात विकावा लागत आहे. त्यासाठी लागणारा प्रवास खर्च शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे.यावर्षी कापूस पिकाला योग्य दर मिळेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु मायबाप सरकारने चार हजार १०० रुपये हमीभाव कापसाला जाहीर केला. कापसाला दिला गेलेला तोकडा दर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखा आहे. यावर्षी अपुऱ्या पडलेल्या पावसाने उत्पादनात मोठी घट झाली आहे. कापूस वेचणीचे दर सहा ते सात रुपये झाल्याने व मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव काकुळतीला आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात कापूस फुटून आहे. मात्र कापूस वेचणीला मजुर मिळविण्यासाठी शेतकरी मजुरांच्या शोधात गावोगाव फिरत आहेत. त्यांना प्रवासाचा वेगळा खर्च देऊनही मजुरांची वाणवा आहे. कापूस झाडावर लोंबकळत असल्याने तो कोणत्याही क्षणी भूईसपाट होण्याच्या धोका निर्माण झाला आहे. सारी यंत्रणाच शेतकऱ्यांच्या विरुद्ध उभी ठाकल्याने दिवसेंदिवस शेती परवडेनाशी झाली आहे. शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना छळत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शासकीय कापूस संकलन केंद्रावर कापूस खरेदीचा श्रीगणेशाच झाला नाही. त्यामुळे खासगी व्यापारी याचा पूरेपूर फायदा घेऊन कवडीमोल गावात कापसाची खरेदी करीत आहे.