शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्हा बाजारपेठेत माघारला

By admin | Updated: October 28, 2015 01:19 IST

कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात.

प्रकाश काळे गोवरीकापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. मात्र दरवर्षी कापसाला मिळणारा तोकडा दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे. जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर असतानाही कापसाची मोठी बाजारपेठ चंद्रपूर जिल्ह्यात व्हावी, अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र कापूस उत्पादकांची हाक शासन दरबारी पोहोचली नाही. त्यामुळे कापसाचा जिल्ह्याच बाजारपेठेत माघारला आहे.कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. कापसाच्या उत्पादनार शेतकऱ्यांचा वर्षभराचा वार्षिक बजेट अवलंबून असतो. विदर्भाच्या सुपिक मातीत कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा, भद्रावती हे तालुके कापसासाठी अग्रेसर मानले जातात. शेतकऱ्यांची भिस्तच कापसावर असल्यने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापूस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. कापसाचा उत्पादन खर्च बघता, त्या तुलनेत मिळणारा कापसाचा दर तोकडा आहे. उत्पादनावर केलेला खर्च भरुन निघणार नाही, एवढी बिकट अवस्था पिकांची झाली आहे. दिवसरात्रं काबाडकष्ट करुन हाडाची काडं करणारा शेतकरी कापसाच्या रुपात पांढरे सोने पिकवितो. सोन्यासारखाच कापसाला भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तीन- चार दशकापासून शेतकरी कापूस पिकवत आहे. परंतु शेतकऱ्यांची होत असलेली परवड अजुनही थांबलेली नाही. कापूस उत्पादकांच्या चंद्रपूर जिल्ह्यात कापसाची सर्वांत मोठी बाजारपेठ व्हावी, ही शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांची आर्त हाक शासन दरबारी पोहोचलीच नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवूनही शेतकऱ्यांना तो नाईलाजाने परप्रांतात विकावा लागत आहे. तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या तुलनेत कापसाच्या बाजारपेठच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा पोरका झाला आहे. जिल्ह्यात कापसाचे मोठे उत्पादन घेऊनही कापसाला मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना कापूस बाहेरील राज्यात विकावा लागत आहे. त्यासाठी लागणारा प्रवास खर्च शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे.यावर्षी कापूस पिकाला योग्य दर मिळेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु मायबाप सरकारने चार हजार १०० रुपये हमीभाव कापसाला जाहीर केला. कापसाला दिला गेलेला तोकडा दर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखा आहे. यावर्षी अपुऱ्या पडलेल्या पावसाने उत्पादनात मोठी घट झाली आहे. कापूस वेचणीचे दर सहा ते सात रुपये झाल्याने व मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव काकुळतीला आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात कापूस फुटून आहे. मात्र कापूस वेचणीला मजुर मिळविण्यासाठी शेतकरी मजुरांच्या शोधात गावोगाव फिरत आहेत. त्यांना प्रवासाचा वेगळा खर्च देऊनही मजुरांची वाणवा आहे. कापूस झाडावर लोंबकळत असल्याने तो कोणत्याही क्षणी भूईसपाट होण्याच्या धोका निर्माण झाला आहे. सारी यंत्रणाच शेतकऱ्यांच्या विरुद्ध उभी ठाकल्याने दिवसेंदिवस शेती परवडेनाशी झाली आहे. शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना छळत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शासकीय कापूस संकलन केंद्रावर कापूस खरेदीचा श्रीगणेशाच झाला नाही. त्यामुळे खासगी व्यापारी याचा पूरेपूर फायदा घेऊन कवडीमोल गावात कापसाची खरेदी करीत आहे.