शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील शेतमजूर चंद्रपूर जिल्ह्यात

By admin | Updated: April 17, 2016 00:35 IST

गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे. यावर्षी त्याची दाहकता अधिकच वाढली आहे.

दुष्काळाची दाहकता वाढली : शेतावर गडी म्हणून करीत आहेत कामरत्नाकर चटप नांदाफाटागेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे. यावर्षी त्याची दाहकता अधिकच वाढली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजुर हतबल झाला आहे. रोजगारच मिळत नसल्याने मराठवाड्यातील शेतमजुर रोजगाराच्या शोधात चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात दाखल झाले आहेत. तेलंगणा सीमेलगतच्या कोरपना तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांकडे गडी माणूस म्हणून या मजुरांनी काम स्वीकारले आहे. त्यापोटी एका वर्षाचे त्यांना ८० ते ९० हजार रुपये मिळणार आहे. सोबतच राहण्याची व इंधनाची सोय संबंधित शेतकरी या शेतमजुरांसाठी करून देत आहे. शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने शेतात काम मिळते. तसेच जिवती तालुक्यात २५ ते ३० वर्षांपासून मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी आदी जिल्ह्यातील नागरिक स्थलांतरीत होऊन कायम वास्तव्यास आहेत. माणिकगड पहाडावर शेती व्यवसायातून त्यांची गुजरान सुरू आहे. यंदा मराठवाड्या भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे तेथील शेतमजुर रोजगाराचा शोध घेत कोरपना ताालुक्यात दाखल झाले आहेत. गावात शेतीवर काम करणाऱ्या गडी माणसांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. वाढत्या महागाईमुळे वर्षाचे ९० हजार ते १ लाख रुपयापर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना केवळ गडी माणसाला द्यावी लागते. दुसरीकडे हे काम करणारी माणसं मिळत नसल्याने शेतकरी बाहेरगावावरून माणसांना शेतावर कामासाठी आणत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांची ही गरज ओळखून दुुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील शेतमजुरांना येथील शेतकरी कामावर ठेवत आहेत. त्यांच्यासाठी शेतातच ताटवे, टिनाचे पत्रे लावून निवाऱ्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. काही शेतकरी वर्षभरासाठी जळावू लाकडांची व्यवस्था गडी माणसांना करून देत आहे. कोरपना तालुक्याला लागून तेलंगाणाची सीमा आहे. त्यानंतर मराठवाड्याची सीमा सुरू होते. एकापाठोपाठ एक होत आहे दाखलसुुरूवातीला आदिलाबादमार्गे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून दोन ते तीन शेतमजूर कोरपना तालुक्यात आले. त्यांना शेतकऱ्यांकडे राहण्याची व रोजगारांची संधी मिळाल्याने आता मराठवाड्यातील अनेक कुटुंब कामाच्या शोधात या परिसरात दाखल होत आहे.तिकडं गुराढोरांची लई बेकार अवस्थामराठवाड्यात दुष्काळामुळे माणसांबरोबरच गुरढोरांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. पाणी नसल्याने शेतात चारा नाही. नाले, नद्या कोरड्या झाल्या आहे. अहो माणसाले पाणी मिळेना अशी अवस्था आहे असे मामा कांबळे किनवट या शेतमजुराने सांगितले.पाण्यासाठी जातो पूर्ण दिवसयावर्षी मराठवाड्यात पाऊस नसल्याने गावातील विहीरी, लहान नाले आटले आहेत. शासनाकडून कााही दिवस टँकरनी पाणी पुरवठा करण्यात आला. त्यातही अर्ध्या लोकांची तहान भागली तर अर्धे गावकरी पाण्यासाठी आटापिटा करीत राहिले. आता टँकरही येत नाही. पाण्यासाठी लांब अंतरावरून एखाद्या विहिरीतून पाणी आणावे लागते. एकाच विहिरीवर सारा गाव पाणी भरतो.