शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चांदाफोर्ट - गोंदिया रेल्वेमार्गावरील रेल्वे प्लॅटफार्म उंचीकरणाचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST

चंद्रपूर : चांदाफोर्ट - गोंदिया रेल्वेमार्गावर मूलजवळ असलेल्या मारोडा रेल्वेप्लॅटफार्मच्या उंचीकरणाचे कामाचे कंत्राट दक्षिण - पूर्व मध्य रेल्वे ...

चंद्रपूर : चांदाफोर्ट - गोंदिया रेल्वेमार्गावर मूलजवळ असलेल्या मारोडा रेल्वेप्लॅटफार्मच्या उंचीकरणाचे कामाचे कंत्राट दक्षिण - पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने दिले. मात्र, संबंधित कंत्राटदाराने सदर उंचीकरणाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे संबंधित रेल्वे प्लॅटफार्म अपूर्ण अवस्थेत आहे. सध्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे चांदाफोर्ट - गोंदिया ही पॅसेंजर रेल्वे बंद आहे. त्यामुळे या काळात सदर काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराकडून प्लॅटफार्म उंचीकरणासाठी मातीकाम योग्य पद्धतीने न करताच काम बंद ठेवले आहे. रेल्वे प्रशासनाकडून संबंधित कंत्राटदाराकडे दुर्लक्ष होत असल्याने मारोडा रेल्वे प्लॅटफार्म उंचीकरण लांबणीवर पडल्यागत स्थिती निर्माण झाली आहे.

मूलपासून जवळच असलेल्या मारोडा येथे रेल्वे प्रशासनाने १ जुलै २०१३ रोजी रेल्वे थांबा मंजूर केला. तेव्हापासून या रेल्वेस्थानकावरून प्रवाशांचे आवागमन सुरू आहे. प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र असलेले सोमनाथ, बाबा आमटे यांनी उभारलेले आमटे फॉर्म या महत्त्वाच्या ठिकाणांसह मारोडा, करवन, काटवन, छोटी कोसंबी, मोठी कोसंबी, मोरवाई, उश्राळा, भादुर्णी, पडझरी, रत्नापूर असे जवळपास १२ गावे या रेल्वेस्थानकाला जोडली गेली आहेत. सुरुवातीच्या काळात रेल्वेथांबा होता. मात्र, रेल्वे प्लॅटफार्म उंच नसल्याने अनेकदा प्रवासी रेल्वेतून चढत अथवा उतरताना अपघात घडले आहेत. महिलावर्ग व लहान मुलांना रेल्वेत चढण्या - उतरण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. अशातच रेल्वेचा थांबा काही मिनिटांचाच असल्याने प्रवाशांची लगबग वाढून अपघाताच्या घटना घडू लागल्या. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीवरून मारोडा रेल्वे प्लॉटफार्मचे उंचीकरणासाठी दक्षिण - पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने मंजुरी देऊन निविदेद्वारे कंत्राट दिले. रेल्वे प्लॉटफार्मच्या उंचीकरणाचे काम सुरू झाले. मात्र, अल्पावधीतच कंत्राटदाराने हे काम सोडून दिले. सध्या रेल्वे बंद असल्याने त्याचा फारसा परिणाम दिसत नसला तरी रेल्वे सुरू झाल्यावर प्रवाशांसाठी हे अर्धवट काम मोठी डोकेदुखी ठरणार आहे. सदर काम मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. यासंबंधी रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन त्वरित रेल्वे प्लॉटफार्म उंचीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.