शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

तंटामुक्त समित्यांसमोर आव्हान

By admin | Updated: September 12, 2015 01:01 IST

गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत. दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्याचे निराकरण करून ते कमी करणे.

गुंजेवाही : गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत. दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्याचे निराकरण करून ते कमी करणे. गावासाठी गावातच लोकसहभागातून तत्काळ व सर्वमान्य तडजोड घडवून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे, गावातील व राजकीय सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. लोकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्यांचे निर्मूलन करणे, अनिष्ट प्रथा व चालिरीती नष्ट करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आदी उद्दिष्ट समोर ठेवून राज्य सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. गावागावांत स्थापन करण्यात आलेल्या या समित्यापुढे मात्र अवैध धंद्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.या मोहिमेत गावांना विविध उपक्रम राबवून गाव तंटामुक्त करून गावाचा विकास साध्य करावयाचा असतो. अवैध धंदे, धार्मिक कलह असेल तर गावाचा विकास कदापीही साध्य होणार नाही. दारू, मटका, वरली हे भांडण तसेच शांतता धोक्यात येण्याचे मुळ कारण आहे. यामुळे अशा अवैध धंद्यालाच मूठमाती दिली तर गावांची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल होण्यास वेळ लागणार नाही. यावर शिक्कामोर्तब करून गावकऱ्यांच्या सहकार्याने तंटामुक्त गाव समितीने अवैध धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे शासनाने सुचविले आहे.त्या दृष्टीने प्रत्येक गावातील तंटामुक्त समितीने अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करणे, व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम राबविणे, व्यसनी लोकांचे समुपदेशन करणे, आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेणे वा इतर कामी पोलिसांना सहकार्य करणे ही कामे समिती पदाधिकाऱ्यांना करावी लागतात. भांडण तंटे व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दारूला गावातून हद्दपार करण्याचे कर्तव्य तंटामुक्त गाव समित्यांनी पोलिसांच्या सहकार्याने पार पाडणे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अपेक्षित आहे. मात्र याचा विसर बहुतांश समितीच्या पदाधिकाऱ्यांना पडल्याने गावात दारूसह अवैध धंद्याचे अस्तित्व अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.गावात शांतता राहावी, गावाचा सर्वांगीण विकास साधला जावा. यासाठी प्रत्येक तंटामुक्त गाव समितीने सभा बोलावून गावात असलेले अवैध धंदे हद्दपार करण्याचा ठराव घेणे गरजेचे आहे. धंदे हद्दपार करण्याचा ठराव घेणे गरजेचे आहे. तसेच त्याची प्रत पोलीस ठाण्याला द्यावी. अवैध धंदे करणाऱ्या धंदेवाईकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे आणि अवैधधंदे बंद करण्यासाठी विनवणी करावी. तरीही अवैध धंदे बंद होत नसतील तर संबंधित पोलीस ठाण्याचे सहकार्य घेऊन त्यावर योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाने करणे तंटामुक्त गाव मोहिमेसाठी अतिशय आवश्यक आहे. तरच समित्यांना बळ येऊ शकणार आहे. (वार्ताहर)