शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

तंटामुक्त समित्यांसमोर आव्हान

By admin | Updated: September 12, 2015 01:01 IST

गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत. दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्याचे निराकरण करून ते कमी करणे.

गुंजेवाही : गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत. दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्याचे निराकरण करून ते कमी करणे. गावासाठी गावातच लोकसहभागातून तत्काळ व सर्वमान्य तडजोड घडवून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे, गावातील व राजकीय सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. लोकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्यांचे निर्मूलन करणे, अनिष्ट प्रथा व चालिरीती नष्ट करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आदी उद्दिष्ट समोर ठेवून राज्य सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. गावागावांत स्थापन करण्यात आलेल्या या समित्यापुढे मात्र अवैध धंद्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.या मोहिमेत गावांना विविध उपक्रम राबवून गाव तंटामुक्त करून गावाचा विकास साध्य करावयाचा असतो. अवैध धंदे, धार्मिक कलह असेल तर गावाचा विकास कदापीही साध्य होणार नाही. दारू, मटका, वरली हे भांडण तसेच शांतता धोक्यात येण्याचे मुळ कारण आहे. यामुळे अशा अवैध धंद्यालाच मूठमाती दिली तर गावांची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल होण्यास वेळ लागणार नाही. यावर शिक्कामोर्तब करून गावकऱ्यांच्या सहकार्याने तंटामुक्त गाव समितीने अवैध धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे शासनाने सुचविले आहे.त्या दृष्टीने प्रत्येक गावातील तंटामुक्त समितीने अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करणे, व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम राबविणे, व्यसनी लोकांचे समुपदेशन करणे, आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेणे वा इतर कामी पोलिसांना सहकार्य करणे ही कामे समिती पदाधिकाऱ्यांना करावी लागतात. भांडण तंटे व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दारूला गावातून हद्दपार करण्याचे कर्तव्य तंटामुक्त गाव समित्यांनी पोलिसांच्या सहकार्याने पार पाडणे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अपेक्षित आहे. मात्र याचा विसर बहुतांश समितीच्या पदाधिकाऱ्यांना पडल्याने गावात दारूसह अवैध धंद्याचे अस्तित्व अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.गावात शांतता राहावी, गावाचा सर्वांगीण विकास साधला जावा. यासाठी प्रत्येक तंटामुक्त गाव समितीने सभा बोलावून गावात असलेले अवैध धंदे हद्दपार करण्याचा ठराव घेणे गरजेचे आहे. धंदे हद्दपार करण्याचा ठराव घेणे गरजेचे आहे. तसेच त्याची प्रत पोलीस ठाण्याला द्यावी. अवैध धंदे करणाऱ्या धंदेवाईकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे आणि अवैधधंदे बंद करण्यासाठी विनवणी करावी. तरीही अवैध धंदे बंद होत नसतील तर संबंधित पोलीस ठाण्याचे सहकार्य घेऊन त्यावर योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाने करणे तंटामुक्त गाव मोहिमेसाठी अतिशय आवश्यक आहे. तरच समित्यांना बळ येऊ शकणार आहे. (वार्ताहर)