शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वेकोलीच्या मुजोरीपुढे प्रकल्पग्रस्तांचे चालेचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:26 IST

राजुरा : प्रकल्पग्रस्त आशा घटे आत्महत्या प्रकरणाने वेकोली प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. वेकोलीकडून प्रकल्पग्रस्तांना अतिशय खालच्या दर्जाची ...

राजुरा : प्रकल्पग्रस्त आशा घटे आत्महत्या प्रकरणाने वेकोली प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. वेकोलीकडून प्रकल्पग्रस्तांना अतिशय खालच्या दर्जाची वागणूक देत असल्याची बाब या घटनेने पुढे आली आहे. वेकोलीच्या मुजोरीपुढे प्रकल्पग्रस्तांचे काहीएक चालत नसल्याचे आता प्रकल्पग्रस्त उघड बोलू लागले आहेत. राजुरा तालुक्यात तब्बल १२८० वेकोली प्रकल्पग्रस्त न्यायासाठी अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र, न्याय कधी मिळेल ठाऊक नाही, अशी केविलवाणी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झालेली आहे.

वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत राजुरा तालुक्यात अनेक कोळसा खाणी आहेत. या खाणींसाठी हजारो हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण झालेले आहे. १०० टक्के प्रकल्पग्रस्तांना अद्याप न्याय मिळाला नाही. काहींना मोबदला मिळाला नाही, तर काहींना नोकरी मिळाली नाही. तालुक्यात १२८० प्रकल्पग्रस्तांचा तब्बल १० वर्षांपासून वेकोली प्रशासनासह संघर्ष सुरू आहे. शेकडो बैठका झाल्या. अनेक आंदोलने झाली. मात्र, न्याय कुठेही मिळाला नाही. तो केव्हा मिळेल, याची शाश्वती नाही. केवळ आश्वासनाचे गाजर दाखवले जात आहे.

पोवणी-२ प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न ६ वर्षांपासून रेंगाळतोय.

३० मार्च रोजी पोवणी-२ कोळसा खाणीमध्ये शेती गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनी वेकोलीची वाहतूक रोखून धरली होती. आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. गेल्या सहा वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळत आहे.

सुबई-चिंचोली प्रकल्पग्रस्तांचा १० वर्षांपासून संघर्ष

सुबई-चिंचोली प्रकल्प २०११ पासून सुरू आहे. गेल्या १० वर्षांत सभांचा फार्स सुरू आहे. हाती काहीच आले नाही. या प्रकल्पात शेतकऱ्यांची ४०० हेक्टर शेती गेली आहे. सुमारे २०८ शेतकरी नोकरीसाठी धडपडत आहेत. न्याय मिळालाच नाही.

सास्ती यूजी टू ओसी प्रकल्पात १०८० शेतकऱ्यांना नोकरीची प्रतीक्षा

सास्ती यूजी टू ओसी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न २०१२ पासून प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी ८७२ शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १०८० शेतकरी वेकोली व शासकीय अधिकाऱ्यांसह नेतेमंडळींचे उंबरठे झिजवत आहे. न्यायाचा पत्ता नाही.

साखरी-पोवणी-धोपटाळा प्रकल्पात नोकरीसाठी २२ प्रकल्पग्रस्तांच्या येरझारा

साखरी-पोवणी-धोपटाळा प्रकल्पात नोकरीसाठी २२ प्रकल्पग्रस्तांच्या येरझारा सुरू आहे. वेकोली व्यवस्थापन थातूरमातूर उत्तरे देऊन मोकळे होत आहे. नाल्याचा प्रश्नही प्रलंबित आहे.

वेकोलीच्या मुजोर धाेरणाचा फटका

प्रकल्पच आला नसता तर शेतकरी भूमिहीन झाले नसते. आपल्याच शेतीच्या मोबदल्यासाठी त्यांना हा संघर्ष करण्याची गरज भासली नसती. आता त्यांना आपल्याच शेतीच्या मोबदल्यासाठी वेकोली व्यवस्थापनाचे वारंवार उंबरठे झिजवावे लागत आहे. अधिकारीवर्ग मात्र त्यांना हीन दर्जाची वागणूक देतो. अनेकदा अपमानित केले जाते. आपल्या शेतजमिनी देऊन पाप केले, अशी भावना शेतकऱ्यांची झालेली आहे.

नेतेमंडळी का नाही मिळवून देऊ शकत न्याय

शेतकरीबांधव आपल्या शेतीच्या मोबदल्यासाठी चकरा मारतो आहे. त्यांना अपमानित व्हावे लागते आहे. कित्येक वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे. कुठेतरी न्याय मिळावा म्हणून नेतेमंडळींकडून मोठ्या अपेक्षा असतात. या मंडळींनी मनात आणले तर शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाची गाथा बघितल्यास अपवाद वगळता न्याय मिळाला नसल्याचेच चित्र आहे.