शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा

By admin | Updated: July 11, 2015 01:43 IST

आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अविष्कार होताना दिसत आहे.

मूल: आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अविष्कार होताना दिसत आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. तसेच शाळेत चालणाऱ्या घडामोडीचा लेखाजोगा बघता मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील कृषक विद्यालयाच्या शिक्षकांनी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा संकल्प केला. सीसीटीव्ही कॅमेरे लावणारी ग्रामीण भागातील ही पहिलीच शाळा असल्याचे बोलले जात आहे.शहरी भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याबरोबरच त्याची माहिती मिळते मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यास बराच अवधी लागतो. नवीन तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना अविष्कार व्हावा. वर्गातील चित्र सर्व शिक्षकवृंद व मुख्याध्यापक बघत आहे. हे विद्यार्थ्यांना ज्ञात होत असल्याने शिस्तबद्ध राहण्याची मानसिकता आपोआपच निर्माण होत असते. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांवरसुद्धा मुख्याध्यापक व संस्थेचे पदाधिकारी निरीक्षण करीत असल्याने शिक्षकातदेखील शिस्त व अध्यापक - अध्ययन प्रक्रिया सुरळीत करण्यात पुढाकार घेतात. हा अनुभव बघायला मिळत असल्याचे बोलले जात आहे. कृषक विद्यालयात विशेष वर्गाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांचा सराव करुन घेण्यास संपूर्ण शिक्षकवृंद झटत असल्याने गेल्या पाच वर्षापासून ९० टक्के निकाल देणारी ग्रामीण भागातील ही विशेष शाळा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सहशालेय उपक्रमासोबतच व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना सुसंस्कारिक घडण्याचा प्रयत्न शाळा करीत आहे.सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यापुढे बायोमॅट्रीक पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये वेळेची शिस्त लागेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)