शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

नगरसेवक होण्यासाठी उमेदवारांची पायपीट

By admin | Updated: October 26, 2015 01:13 IST

जिंदाबाद... जिंदाबाद... विजयी करा... अशा घोषणा देत कार्यकर्ते सध्या जीव ओतून प्रचाराचे काम करीत आहेत.

मतदारांशी वैयक्तिक संपर्क : प्रचार फेऱ्यांना आला जोरखडसंगी: जिंदाबाद... जिंदाबाद... विजयी करा... अशा घोषणा देत कार्यकर्ते सध्या जीव ओतून प्रचाराचे काम करीत आहेत. नगरसेवक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नगरपरिषद निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वच पक्षाच्या उमेदवाराना जिवाचे रान करावे लागत आहे. मतदान होईपर्यंत प्रत्येक उमेदवाराला दररोज सकाळ सायंकाळ प्रभागाच्या कमीत कमी चार- पाच फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे उमेदवारांवर आपला प्रचार व भूमिका मांडण्यासाठी पर्यायाने नगरसेवक होण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.नव्यानेच निर्माण झालेली चिमूर नगरपरिषदेची प्रथमत: सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने पहिला नगरसेवक होण्याचा मान मिळावा व आपल्या नावाची इतिहासात नोंद व्हावी, यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू आहे. मतदारांशी संपर्क साधण्यात जो कुचराई दाखवील, त्याला विजयापासून दूर राहावे लागण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी मैदानातील प्रत्येक उमेदवाराला दररोज दिवसभर कमीत कमी पाच-सहा किलोमीटर पायदळ वारी करावी लागत आहे.ऐन सणासुदीच्या दिवसांत नगरपरिषदेना रणसंग्राम भरात आला असून आपले नाव लोकापर्यंत पोहोचावे, आपल्या पक्षाची भूमिका त्यांना कळावी यासाठी मतदारांपर्यंत वैयक्तिकरीत्या संपर्क साधण्यास सर्वांचे प्राधान्य आहे. यासाठी ‘डोअर टू डोअर’ तसेच वसाहतीमधील प्रत्येक चौकापर्यंत पोहोचण्याचे नियोजन उमेदवारांकडून केले जात आहे. पण हे करताना उमेदवारांना घाम गाळावा लागत आहे. कारण आधुनिक युगात ऊठसूठ गाड्या घेऊन जाण्याच्या सवयीमुळे अनेकजण पायदळ चालणेच विसरले आहेत. त्यामुळे काही अंतर जरी चालले तरी अनेकांना दम लागत आहे.विजयासाठी एक-एक मतांचे मूल्य असल्याने उमेदवारांना कार्यकर्त्यांना दूरवरची प्रचाराची फेरी काढण म्हणजे एक दिव्यच ठरत आहे. सत्तेसाठी प्रचार करावाच लागणार असल्याने अनेक पुरुष-महिला उमेदवारांनी नास्ता, शीतपेय यांची सोय केली आहे. त्यामुळे प्रचारातील कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहण्यास मदत होत आहे. काही जण थंडगार पाण्याच्या बाटल्याही सोबत घेत आहेत.चिमूर नगरपरिषदेसाठी लोकसंख्या कमी पडत असल्याने ११ गावांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे नगरपरिषदेचा ११-११ किलोमीटरचा परिसर पडतो. यामध्ये १७ प्रभाग विभागले आहेत. त्यामध्ये अनेक प्रभाग विस्तारलेले आहेत. एका प्रभागात हजार ते पंधराशे मतदार आहेत. त्यामुळे एक प्रभाग दिड ते दोन किलोमीटरच्या परिघात विस्तारलेला आहे. मतदारापर्यंत पोहचताना उमेदवाराना शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत.प्रचारासाठी सध्या सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा वापर होत असला तरी पारंपरिक फेऱ्याचे आजही महत्त्व कायम आहे. (वार्ताहर)