शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

नगरसेवक होण्यासाठी उमेदवारांची पायपीट

By admin | Updated: October 26, 2015 01:13 IST

जिंदाबाद... जिंदाबाद... विजयी करा... अशा घोषणा देत कार्यकर्ते सध्या जीव ओतून प्रचाराचे काम करीत आहेत.

मतदारांशी वैयक्तिक संपर्क : प्रचार फेऱ्यांना आला जोरखडसंगी: जिंदाबाद... जिंदाबाद... विजयी करा... अशा घोषणा देत कार्यकर्ते सध्या जीव ओतून प्रचाराचे काम करीत आहेत. नगरसेवक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नगरपरिषद निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वच पक्षाच्या उमेदवाराना जिवाचे रान करावे लागत आहे. मतदान होईपर्यंत प्रत्येक उमेदवाराला दररोज सकाळ सायंकाळ प्रभागाच्या कमीत कमी चार- पाच फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे उमेदवारांवर आपला प्रचार व भूमिका मांडण्यासाठी पर्यायाने नगरसेवक होण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.नव्यानेच निर्माण झालेली चिमूर नगरपरिषदेची प्रथमत: सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने पहिला नगरसेवक होण्याचा मान मिळावा व आपल्या नावाची इतिहासात नोंद व्हावी, यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू आहे. मतदारांशी संपर्क साधण्यात जो कुचराई दाखवील, त्याला विजयापासून दूर राहावे लागण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी मैदानातील प्रत्येक उमेदवाराला दररोज दिवसभर कमीत कमी पाच-सहा किलोमीटर पायदळ वारी करावी लागत आहे.ऐन सणासुदीच्या दिवसांत नगरपरिषदेना रणसंग्राम भरात आला असून आपले नाव लोकापर्यंत पोहोचावे, आपल्या पक्षाची भूमिका त्यांना कळावी यासाठी मतदारांपर्यंत वैयक्तिकरीत्या संपर्क साधण्यास सर्वांचे प्राधान्य आहे. यासाठी ‘डोअर टू डोअर’ तसेच वसाहतीमधील प्रत्येक चौकापर्यंत पोहोचण्याचे नियोजन उमेदवारांकडून केले जात आहे. पण हे करताना उमेदवारांना घाम गाळावा लागत आहे. कारण आधुनिक युगात ऊठसूठ गाड्या घेऊन जाण्याच्या सवयीमुळे अनेकजण पायदळ चालणेच विसरले आहेत. त्यामुळे काही अंतर जरी चालले तरी अनेकांना दम लागत आहे.विजयासाठी एक-एक मतांचे मूल्य असल्याने उमेदवारांना कार्यकर्त्यांना दूरवरची प्रचाराची फेरी काढण म्हणजे एक दिव्यच ठरत आहे. सत्तेसाठी प्रचार करावाच लागणार असल्याने अनेक पुरुष-महिला उमेदवारांनी नास्ता, शीतपेय यांची सोय केली आहे. त्यामुळे प्रचारातील कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहण्यास मदत होत आहे. काही जण थंडगार पाण्याच्या बाटल्याही सोबत घेत आहेत.चिमूर नगरपरिषदेसाठी लोकसंख्या कमी पडत असल्याने ११ गावांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे नगरपरिषदेचा ११-११ किलोमीटरचा परिसर पडतो. यामध्ये १७ प्रभाग विभागले आहेत. त्यामध्ये अनेक प्रभाग विस्तारलेले आहेत. एका प्रभागात हजार ते पंधराशे मतदार आहेत. त्यामुळे एक प्रभाग दिड ते दोन किलोमीटरच्या परिघात विस्तारलेला आहे. मतदारापर्यंत पोहचताना उमेदवाराना शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत.प्रचारासाठी सध्या सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा वापर होत असला तरी पारंपरिक फेऱ्याचे आजही महत्त्व कायम आहे. (वार्ताहर)