शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आंदोलनातून मिळालेले बसस्थानक अडगळीत

By admin | Updated: October 1, 2015 01:27 IST

नागभीड तालुक्याच्या निर्मितीनंतर नागभीडमध्ये एस.टी. आगाराच्या मागणीसाठी एकच मोठे आंदोलन झाले.

घनश्याम नवघडे नागभीडनागभीड तालुक्याच्या निर्मितीनंतर नागभीडमध्ये एस.टी. आगाराच्या मागणीसाठी एकच मोठे आंदोलन झाले. या आंदोलनातून मिळालेले बसस्थानक आता अडगळीत पडले आहे. तत्कालीन पुढाऱ्यांच्या विवेकशुन्य नियोजनाचा हा परिपाक असून या बसस्थानकाचा वापर अवैध कामासाठी होत असल्याचे दिसून येत आहे.नागभीड हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने नागभीड येथे बस आगार असावे, या मागणीसाठी नागभीड येथे एक मोठे आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनाची तिव्रता एवढी मोठी होती की आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. बस आगाराच्या मागणीची तिव्रता लक्षात घेऊन या ठिकाणी बसस्थानक मंजूर करण्यात आले. पण येथेही नागभीडकरांचे दुर्दैव आड आले.बसस्थानकास मंजुरी मिळाल्यानंतर ते पंचायत समितीजवळील रेल्वेच्या जागेत होईल, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा होती. जेणेकरून रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक जवळजवळ होतील आणि ते प्रवाशांच्या सोयीचे होईल. पण झाले उलटेच. सदर बसस्थानक गावाच्या पश्चिमेला आणि तेव्हाच्या निर्जनस्थळी बांधण्यात आले. बसस्थानक बांधण्यात आल्यानंतर पहिली एक दोन वर्ष तिथे बसेस गेल्याही. पण फालतू वेळेचा अपव्यय होत आहे अशी ओरड झाल्यानंतर तिथे बसेस जाणेच बंद झाले. आज लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे बसस्थानक अडगळीत पडले आहे. बसस्थानक अडगळीत पडले असले तरी आजही प्रवासी नागपूर-चंद्रपूरला प्रवास करतात, तेव्हा तिकीट आकारणीत या टप्प्याचा विचार करूनच तिकीट आकारल्या जात असल्याची माहिती आहे. म्हणजे उपयोग नसलेल्या या बसस्थानकाचा भूर्दंडही सामान्य नागरिकच सोसत आहेत. जर संपुर्ण विचार करून या बसस्थानकाची निर्मिती रेल्वेच्या जागेत किंवा टी पाईंटवर करण्यात आली असती तर ते नागभीडकरांना अतिशय सोयीचे झाले असते आणि आज अडगळीत पडलेले बसस्थानक पकडून चार ठिकाणी बसथांब्याची निर्मिती करावी लागली, ती करावी लागली नसती. आंदोलनातून मिळालेल्या या बसस्थानकाचा आता कोणताही उपयोग नाही. उलट समाज विघातक शक्तींचे ते आश्रयस्थान बनल्याची चर्चा आहे. येथील नेतृत्वाने या बसस्थानकाचा उपयोग अन्य शासकीय कार्यालयासाठी कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची मागणी होत असते.