शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

आंदोलनातून मिळालेले बसस्थानक अडगळीत

By admin | Updated: October 1, 2015 01:27 IST

नागभीड तालुक्याच्या निर्मितीनंतर नागभीडमध्ये एस.टी. आगाराच्या मागणीसाठी एकच मोठे आंदोलन झाले.

घनश्याम नवघडे नागभीडनागभीड तालुक्याच्या निर्मितीनंतर नागभीडमध्ये एस.टी. आगाराच्या मागणीसाठी एकच मोठे आंदोलन झाले. या आंदोलनातून मिळालेले बसस्थानक आता अडगळीत पडले आहे. तत्कालीन पुढाऱ्यांच्या विवेकशुन्य नियोजनाचा हा परिपाक असून या बसस्थानकाचा वापर अवैध कामासाठी होत असल्याचे दिसून येत आहे.नागभीड हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने नागभीड येथे बस आगार असावे, या मागणीसाठी नागभीड येथे एक मोठे आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनाची तिव्रता एवढी मोठी होती की आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. बस आगाराच्या मागणीची तिव्रता लक्षात घेऊन या ठिकाणी बसस्थानक मंजूर करण्यात आले. पण येथेही नागभीडकरांचे दुर्दैव आड आले.बसस्थानकास मंजुरी मिळाल्यानंतर ते पंचायत समितीजवळील रेल्वेच्या जागेत होईल, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा होती. जेणेकरून रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक जवळजवळ होतील आणि ते प्रवाशांच्या सोयीचे होईल. पण झाले उलटेच. सदर बसस्थानक गावाच्या पश्चिमेला आणि तेव्हाच्या निर्जनस्थळी बांधण्यात आले. बसस्थानक बांधण्यात आल्यानंतर पहिली एक दोन वर्ष तिथे बसेस गेल्याही. पण फालतू वेळेचा अपव्यय होत आहे अशी ओरड झाल्यानंतर तिथे बसेस जाणेच बंद झाले. आज लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे बसस्थानक अडगळीत पडले आहे. बसस्थानक अडगळीत पडले असले तरी आजही प्रवासी नागपूर-चंद्रपूरला प्रवास करतात, तेव्हा तिकीट आकारणीत या टप्प्याचा विचार करूनच तिकीट आकारल्या जात असल्याची माहिती आहे. म्हणजे उपयोग नसलेल्या या बसस्थानकाचा भूर्दंडही सामान्य नागरिकच सोसत आहेत. जर संपुर्ण विचार करून या बसस्थानकाची निर्मिती रेल्वेच्या जागेत किंवा टी पाईंटवर करण्यात आली असती तर ते नागभीडकरांना अतिशय सोयीचे झाले असते आणि आज अडगळीत पडलेले बसस्थानक पकडून चार ठिकाणी बसथांब्याची निर्मिती करावी लागली, ती करावी लागली नसती. आंदोलनातून मिळालेल्या या बसस्थानकाचा आता कोणताही उपयोग नाही. उलट समाज विघातक शक्तींचे ते आश्रयस्थान बनल्याची चर्चा आहे. येथील नेतृत्वाने या बसस्थानकाचा उपयोग अन्य शासकीय कार्यालयासाठी कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची मागणी होत असते.