शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

पूजेसाठी आर्जव करून बोलवावे लागले बैल

By admin | Updated: September 14, 2015 00:47 IST

इतर क्षेत्रासोबतच शेतीमध्येही यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने साहजिकच बैलांची संख्या कमी झाली आहे.

यांत्रिकीकरणाचा परिणाम : बैलांची संख्या झाली कमीनागभीड : इतर क्षेत्रासोबतच शेतीमध्येही यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने साहजिकच बैलांची संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम यावर्षी गावखेड्यातील पोळ्यात जाणवला. नागभीडमध्ये तर अनेक कुटुंबांना बैलाच्या पुजेसाठी तासन्तास प्रतिक्षा करावी लागली. तर अनेकांवर बैलधारकांना आर्जव करून घरी बोलावून पूजा करावी लागली.शनिवारी सर्वत्र पोळा सण साजरा झाला. तसा तो नागभीड मध्येही साजरा करण्यात आला. एकेकाळी नागभीडच्या पोळ्याची पंचक्रोशीत ख्याती होती. संबंध बाजार चौक पोळ्याच्या दिवशी बैलांनी फुलून असायचा. प्रत्येक शेतकरी आपआपल्या कुवतीप्रमाणे बैल सजवून पोळ्यात आणायचा आणि सजवलेले हे बैल बाजार चौकाची वेगळीच शोभा वाढवायचे. बैलांच्या गळ्यातील घुंगर तसेच घोल्लरांच्या आवाजाने तर या शोभेला वेगळीच लय यायची. संध्याकाळच्या वेळेस पोळा फुटल्यानंतर आवाजाच्या या लयीला आणखीच गती यायची. अगदी झुंजु भुंजु होईपर्यंत शेतकरी आपले बैल घरोघरी न्यायचे आणि यथा सामग्र प्रत्येक घरी या बैलांची पुजा व्हायची. एकेका घरी दहा ते बारा जोड्या या हमखास यायच्याच आणि प्रत्येक जोडीची पूजासुद्धा तेवढ्याच उत्साहाने व्हायची.पण आता काळ बदलला आणि या काळाबरोबरोबर काळाच्या व्याख्या सुद्धा बदलल्या. शेतीमध्ये यांत्रिकीरणाचा प्रवेश झाला. जी शेती केवळ बैलांच्या भरवशावर केली जायची त्या शेतीत आता विविध प्रकारची यंत्रे दिसू लागली. परिणामी शेतीतून बैल हद्दपार होऊ लागले. याशिवाय पडीत जमिनी, कुरणे आणि वनकायद्यामुळे चऱ्हाटीची जागा कमी झाल्याने गोधन पाळण्यावरही अनेक मर्यादा आल्या आणि यातून बैलांची निर्मिती थांबली.या सर्वांचा परिणाम आता पोळ्यावर दिसू लागला आहे. आणि म्हणूनच मोठ्या शहर व महानगराचे लोन आता नागभीडसारख्या गावातही पोहोचले. त्याचाच परिणाम म्हणून बैलांच्या पूजेसाठी लोकांना एकतर प्रतिक्षा करावी लागली किंवा बैलधारकांना आर्जव करून घरी बोलावून बैलांची पूजा करावी लागली. (तालुका प्रतिनिधी)