शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पूजेसाठी आर्जव करून बोलवावे लागले बैल

By admin | Updated: September 14, 2015 00:47 IST

इतर क्षेत्रासोबतच शेतीमध्येही यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने साहजिकच बैलांची संख्या कमी झाली आहे.

यांत्रिकीकरणाचा परिणाम : बैलांची संख्या झाली कमीनागभीड : इतर क्षेत्रासोबतच शेतीमध्येही यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने साहजिकच बैलांची संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम यावर्षी गावखेड्यातील पोळ्यात जाणवला. नागभीडमध्ये तर अनेक कुटुंबांना बैलाच्या पुजेसाठी तासन्तास प्रतिक्षा करावी लागली. तर अनेकांवर बैलधारकांना आर्जव करून घरी बोलावून पूजा करावी लागली.शनिवारी सर्वत्र पोळा सण साजरा झाला. तसा तो नागभीड मध्येही साजरा करण्यात आला. एकेकाळी नागभीडच्या पोळ्याची पंचक्रोशीत ख्याती होती. संबंध बाजार चौक पोळ्याच्या दिवशी बैलांनी फुलून असायचा. प्रत्येक शेतकरी आपआपल्या कुवतीप्रमाणे बैल सजवून पोळ्यात आणायचा आणि सजवलेले हे बैल बाजार चौकाची वेगळीच शोभा वाढवायचे. बैलांच्या गळ्यातील घुंगर तसेच घोल्लरांच्या आवाजाने तर या शोभेला वेगळीच लय यायची. संध्याकाळच्या वेळेस पोळा फुटल्यानंतर आवाजाच्या या लयीला आणखीच गती यायची. अगदी झुंजु भुंजु होईपर्यंत शेतकरी आपले बैल घरोघरी न्यायचे आणि यथा सामग्र प्रत्येक घरी या बैलांची पुजा व्हायची. एकेका घरी दहा ते बारा जोड्या या हमखास यायच्याच आणि प्रत्येक जोडीची पूजासुद्धा तेवढ्याच उत्साहाने व्हायची.पण आता काळ बदलला आणि या काळाबरोबरोबर काळाच्या व्याख्या सुद्धा बदलल्या. शेतीमध्ये यांत्रिकीरणाचा प्रवेश झाला. जी शेती केवळ बैलांच्या भरवशावर केली जायची त्या शेतीत आता विविध प्रकारची यंत्रे दिसू लागली. परिणामी शेतीतून बैल हद्दपार होऊ लागले. याशिवाय पडीत जमिनी, कुरणे आणि वनकायद्यामुळे चऱ्हाटीची जागा कमी झाल्याने गोधन पाळण्यावरही अनेक मर्यादा आल्या आणि यातून बैलांची निर्मिती थांबली.या सर्वांचा परिणाम आता पोळ्यावर दिसू लागला आहे. आणि म्हणूनच मोठ्या शहर व महानगराचे लोन आता नागभीडसारख्या गावातही पोहोचले. त्याचाच परिणाम म्हणून बैलांच्या पूजेसाठी लोकांना एकतर प्रतिक्षा करावी लागली किंवा बैलधारकांना आर्जव करून घरी बोलावून बैलांची पूजा करावी लागली. (तालुका प्रतिनिधी)