शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पूजेसाठी आर्जव करून बोलवावे लागले बैल

By admin | Updated: September 14, 2015 00:47 IST

इतर क्षेत्रासोबतच शेतीमध्येही यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने साहजिकच बैलांची संख्या कमी झाली आहे.

यांत्रिकीकरणाचा परिणाम : बैलांची संख्या झाली कमीनागभीड : इतर क्षेत्रासोबतच शेतीमध्येही यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने साहजिकच बैलांची संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम यावर्षी गावखेड्यातील पोळ्यात जाणवला. नागभीडमध्ये तर अनेक कुटुंबांना बैलाच्या पुजेसाठी तासन्तास प्रतिक्षा करावी लागली. तर अनेकांवर बैलधारकांना आर्जव करून घरी बोलावून पूजा करावी लागली.शनिवारी सर्वत्र पोळा सण साजरा झाला. तसा तो नागभीड मध्येही साजरा करण्यात आला. एकेकाळी नागभीडच्या पोळ्याची पंचक्रोशीत ख्याती होती. संबंध बाजार चौक पोळ्याच्या दिवशी बैलांनी फुलून असायचा. प्रत्येक शेतकरी आपआपल्या कुवतीप्रमाणे बैल सजवून पोळ्यात आणायचा आणि सजवलेले हे बैल बाजार चौकाची वेगळीच शोभा वाढवायचे. बैलांच्या गळ्यातील घुंगर तसेच घोल्लरांच्या आवाजाने तर या शोभेला वेगळीच लय यायची. संध्याकाळच्या वेळेस पोळा फुटल्यानंतर आवाजाच्या या लयीला आणखीच गती यायची. अगदी झुंजु भुंजु होईपर्यंत शेतकरी आपले बैल घरोघरी न्यायचे आणि यथा सामग्र प्रत्येक घरी या बैलांची पुजा व्हायची. एकेका घरी दहा ते बारा जोड्या या हमखास यायच्याच आणि प्रत्येक जोडीची पूजासुद्धा तेवढ्याच उत्साहाने व्हायची.पण आता काळ बदलला आणि या काळाबरोबरोबर काळाच्या व्याख्या सुद्धा बदलल्या. शेतीमध्ये यांत्रिकीरणाचा प्रवेश झाला. जी शेती केवळ बैलांच्या भरवशावर केली जायची त्या शेतीत आता विविध प्रकारची यंत्रे दिसू लागली. परिणामी शेतीतून बैल हद्दपार होऊ लागले. याशिवाय पडीत जमिनी, कुरणे आणि वनकायद्यामुळे चऱ्हाटीची जागा कमी झाल्याने गोधन पाळण्यावरही अनेक मर्यादा आल्या आणि यातून बैलांची निर्मिती थांबली.या सर्वांचा परिणाम आता पोळ्यावर दिसू लागला आहे. आणि म्हणूनच मोठ्या शहर व महानगराचे लोन आता नागभीडसारख्या गावातही पोहोचले. त्याचाच परिणाम म्हणून बैलांच्या पूजेसाठी लोकांना एकतर प्रतिक्षा करावी लागली किंवा बैलधारकांना आर्जव करून घरी बोलावून बैलांची पूजा करावी लागली. (तालुका प्रतिनिधी)