शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दोन दिवस बंद राहिली बीएसएनएलची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:02 IST

मागील दोन दिवस भारत संचार निगमची सेवा पूर्णपणे बंद आहे. सोमवारच्या रात्री १० वाजेपासून बंद झालेली ही सेवा बुधवारी ३ वाजता सुरू झाली. परिणामी नागरिक त्रस्त झाले. निगमने आपली सेवा त्वरित सुधारावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मागील दोन दिवस भारत संचार निगमची सेवा पूर्णपणे बंद आहे. सोमवारच्या रात्री १० वाजेपासून बंद झालेली ही सेवा बुधवारी ३ वाजता सुरू झाली. परिणामी नागरिक त्रस्त झाले. निगमने आपली सेवा त्वरित सुधारावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.नागभीड येथे इतर मोबाईल कंपण्यांचे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर विस्तारले असले तरी बीएसएनएलचेही ग्राहक मोठया प्रमाणावर आहे.हे ग्राहक पूर्णपणे बीएसएनएलवर अवलंबून असले तरी बीएसएनएलच्या टुकार सेवेने चांगलेच त्रासून गेले आहेत.गेली दोन दिवस या सेवेने तर चांगलाच कहर केला. इंटरनेट आणि भ्रमनध्वनी या दोन्ही सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या. बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराची कल्पना नसलेले अनेक मोबाईलधारक आपलाच मोबाईल खराब झाला असेल, अशी समजूत करून वारंवार मोबाईलमधील सीमकार्ड काढून ते स्वच्छ करून परत मोबाईलमध्ये टाकत होते. काही ग्राहक मोबाईल बंद करून परत सुरू करीत राहिले. ही स्थिती पाहून बीएसएनएल ग्राहकांना सेवा देत आहे की ग्राहकांच्या डोक्याला ताप हेच समजेनासे झाले होते. गेल्या काही वर्षात ग्राहकांना अशीच सेवा मिळत गेल्याने अनेक बीएसएनएलच्या ग्राहकांनी आपला सीमकार्ड दुसऱ्या कंपनीत परावर्तीत केली व करीत आहेत.आज अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच इंटरनेट आणि भ्रमनध्वनी या सेवा लोकांची आवश्यक गरज बनली आहे. बीएसएनएलने आपल्या सेवेत सुधारणा करावी, अशी ग्राहकाची मागणी आहे. दरम्यान यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता या सेवेत मोठा बिघाड निर्माण झाल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यात ही सेवा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.