शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

दोन दिवस बंद राहिली बीएसएनएलची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:02 IST

मागील दोन दिवस भारत संचार निगमची सेवा पूर्णपणे बंद आहे. सोमवारच्या रात्री १० वाजेपासून बंद झालेली ही सेवा बुधवारी ३ वाजता सुरू झाली. परिणामी नागरिक त्रस्त झाले. निगमने आपली सेवा त्वरित सुधारावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मागील दोन दिवस भारत संचार निगमची सेवा पूर्णपणे बंद आहे. सोमवारच्या रात्री १० वाजेपासून बंद झालेली ही सेवा बुधवारी ३ वाजता सुरू झाली. परिणामी नागरिक त्रस्त झाले. निगमने आपली सेवा त्वरित सुधारावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.नागभीड येथे इतर मोबाईल कंपण्यांचे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर विस्तारले असले तरी बीएसएनएलचेही ग्राहक मोठया प्रमाणावर आहे.हे ग्राहक पूर्णपणे बीएसएनएलवर अवलंबून असले तरी बीएसएनएलच्या टुकार सेवेने चांगलेच त्रासून गेले आहेत.गेली दोन दिवस या सेवेने तर चांगलाच कहर केला. इंटरनेट आणि भ्रमनध्वनी या दोन्ही सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या. बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराची कल्पना नसलेले अनेक मोबाईलधारक आपलाच मोबाईल खराब झाला असेल, अशी समजूत करून वारंवार मोबाईलमधील सीमकार्ड काढून ते स्वच्छ करून परत मोबाईलमध्ये टाकत होते. काही ग्राहक मोबाईल बंद करून परत सुरू करीत राहिले. ही स्थिती पाहून बीएसएनएल ग्राहकांना सेवा देत आहे की ग्राहकांच्या डोक्याला ताप हेच समजेनासे झाले होते. गेल्या काही वर्षात ग्राहकांना अशीच सेवा मिळत गेल्याने अनेक बीएसएनएलच्या ग्राहकांनी आपला सीमकार्ड दुसऱ्या कंपनीत परावर्तीत केली व करीत आहेत.आज अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच इंटरनेट आणि भ्रमनध्वनी या सेवा लोकांची आवश्यक गरज बनली आहे. बीएसएनएलने आपल्या सेवेत सुधारणा करावी, अशी ग्राहकाची मागणी आहे. दरम्यान यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता या सेवेत मोठा बिघाड निर्माण झाल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यात ही सेवा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.