शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मुक्ती संग्रामच्या गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: September 19, 2015 01:18 IST

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर राजुरा तालुका निजामांच्या जुलमी राजवटीमधून मुक्त झाला.

हंसराज अहीर यांची उपस्थिती : विद्यार्थ्यांना २० हजाराची शिष्यवृत्ती वाटपराजुरा : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर राजुरा तालुका निजामांच्या जुलमी राजवटीमधून मुक्त झाला. यासाठी या भागातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. मुक्ती संग्रामच्या गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवा, त्यांना मुक्ती संग्रामच्या गाथा समजवून सांगाल तर मुक्तीसंग्राम नव्या पीढीला समजेल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. राजुरा तालुका प्रेस असोसिएशन राजुरा आणि जेसीआय राजुरा रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने किसान भवन येथे आयोजित मुक्ती संग्राम दिन महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ११ गरीब व्यक्तींना मच्छरदानी आणि विद्यार्थ्यांना १८ हजार रुपये शिष्यवृत्तीचे वाटप ना. अहीर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जेसीआयचे झोन उपाध्यक्ष मेघनाथ जानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अरुण मस्की, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंंडावार, तालुका शिवसेना प्रमुख नितीन पिपरे, जेसीआय रॉयलच्या अध्यक्ष जयश्री शेंडग, सचिव गौरी केवट, भाजपााचे ज्येष्ठ नेते वाघु गेडाम, सतीश धोटे, तालुका पत्रकार संघाचे प्रवीण देशकर, बादल बेले, आनंद चलाख, रंगराव कुळसंगे, एम.के. शेलोटे, अमित जयपूरकर, वामन पुरटकर, जितेंद्र दुबे, मंगेश श्रीराम, महिपाल मडावी, मंगेश बोरकुटे, अविनाश दोरखंडे, जेसेआयचे कुमार केवट, विलास शेंंडे, व्यंकटेश गड्डम, गोपाल सारडा, सचिन डोहे, प्रशांत घरोटे, सुरेश रागीट, जेसीआयचे अध्यक्ष संदीप खोके, प्रा. राजेश खेराणी उपस्थित होते. याप्रसंगी राजुरा तालुका प्रेस असोसिएशनच्या वतीने ना. हंसराज अहीर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन श्वेता जयस्वाल यांनी केले तर आभार प्रा. बोर्डेवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)