शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

मानवनिर्मित धुरामुळे गुदमरतोयं श्वास

By admin | Updated: January 29, 2016 04:17 IST

प्रदूषणात राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या चंद्रपूर शहरात केवळ उद्योगांमुळेच प्रदूषण होते असे नाही. आरोग्याला

चंद्रपूर : प्रदूषणात राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या चंद्रपूर शहरात केवळ उद्योगांमुळेच प्रदूषण होते असे नाही. आरोग्याला हाणीकारक असे धूर ओकणारे शेकडो वाहने रस्त्यावर धावतात, यामुळेही प्रदूषण वाढत आहे. मात्र अनेक वॉर्डात दिवसभर कचरा जळताना दिसून येत असून हा मानवनिर्मीत धूरही चंद्रपूरकरांचा श्वास कोंढत आहे.चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाने काही दिवसांपुर्वीच ‘स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूर’ ही मोहीम हाती घेऊन वॉर्डावॉर्डात घंटागाड्या सुरू केल्या आहेत. या घंटागाड्या दररोज नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन कचरा गोळा करतात. मात्र या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने अनेक वॉर्डात मोकळ्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येतात. या कचऱ्याला आग लावली जात असल्याने हा कचरा दिवसभर जळत राहते. परिणामी वॉर्डात पूर्णत: धूर पसरत आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील जटपूर वॉर्ड क्रमांक १ मध्ये नगीना मज्जीदला लागून असलेल्या महानगर पालिकेच्या खुल्या जागेत कचरा गोळा केला जात आहे. त्यामुळे येथे मोठे कचऱ्याचे ढीग जमा झाले असून येथील कचरा नियमीत उचलला जात नाही व कचऱ्याला आग लावली जाते. त्यामुळे वॉर्डात मोठ्या प्रमाणात धूर पसरत आहे. या कचऱ्याच्या ढिगारामुळे नागरिकही येथेच कचरा टाकतात. तर जवळच असलेले व्यवसायिक नॉयलन टॉयर, भंगार वस्तू येथे टाकत असतात. त्यामुळे हा कचरा बराच वेळ जळत राहते. याबाबत नागरिकांनी महानगर पालिकेला निवेदन दिले, आयुक्तांशी चर्चा केली. मात्र येथील कचरा साफ झाला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड प्रमाणात धूराचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ंंंं कारवाई करावी४स्वच्छ व सुंदर चंद्रपूरसाठी मनपाकडून कार्यवाही सुरू आहे. मात्र व्यवसायिक मोकळ्या जागेवर कचरा गोळा करून अनेकदा आग लावतात. त्यामुळे अशा व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. मनपाने याची दखल घ्यावी.व्यवसायिक लावतात कचऱ्याला आग४कचरा गोळा करण्यासाठी महानगर पालिकेच्या घंटा गाड्या घरोघरी जात आहेत. मात्र व्यवसायिकांच्या दुकानांमधून निघणारा कचरा हा अनेक जण मोकळ्या जागेत टाकत असतात. यात खर्डे, प्लॉस्टीक, नॉयलन दोरी असे अधिक पेट घेणारा कचरा असते. या कचऱ्याचा मोठा ढीग जमा झाल्यानंतर व्यवसायिकच या कचऱ्याला आग लावून देतात. त्यामुळे हा कचरा दिवसभर जळताना दिसून येते.आझाद बगीच्या जवळील राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागे महानगर पालिकेने कचऱ्याचा कंटेनर ठेवला आहे. या कंटेनरमध्ये घंटागाड्यांद्वारे कचरा गोळा करणारे कर्मचारी कचरा आणून टाकत असतात. तर या परिसरातील व्यावसायिकही येथेच कचरा टाकत असतात. मात्र या कंटेनरमधील कचरा नियमीत साफ केला जात नाही. या कचऱ्याला आग लावली जात असल्याने दिवसभर कचरा जळत असते. हा प्रकार दोन ते तीन दिवसाला नेहमीच घडत असून कचरा जळण्याच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात धुराचा सामना करावा लागत आहे.