शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मानवनिर्मित धुरामुळे गुदमरतोयं श्वास

By admin | Updated: January 29, 2016 04:17 IST

प्रदूषणात राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या चंद्रपूर शहरात केवळ उद्योगांमुळेच प्रदूषण होते असे नाही. आरोग्याला

चंद्रपूर : प्रदूषणात राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या चंद्रपूर शहरात केवळ उद्योगांमुळेच प्रदूषण होते असे नाही. आरोग्याला हाणीकारक असे धूर ओकणारे शेकडो वाहने रस्त्यावर धावतात, यामुळेही प्रदूषण वाढत आहे. मात्र अनेक वॉर्डात दिवसभर कचरा जळताना दिसून येत असून हा मानवनिर्मीत धूरही चंद्रपूरकरांचा श्वास कोंढत आहे.चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाने काही दिवसांपुर्वीच ‘स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूर’ ही मोहीम हाती घेऊन वॉर्डावॉर्डात घंटागाड्या सुरू केल्या आहेत. या घंटागाड्या दररोज नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन कचरा गोळा करतात. मात्र या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने अनेक वॉर्डात मोकळ्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येतात. या कचऱ्याला आग लावली जात असल्याने हा कचरा दिवसभर जळत राहते. परिणामी वॉर्डात पूर्णत: धूर पसरत आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील जटपूर वॉर्ड क्रमांक १ मध्ये नगीना मज्जीदला लागून असलेल्या महानगर पालिकेच्या खुल्या जागेत कचरा गोळा केला जात आहे. त्यामुळे येथे मोठे कचऱ्याचे ढीग जमा झाले असून येथील कचरा नियमीत उचलला जात नाही व कचऱ्याला आग लावली जाते. त्यामुळे वॉर्डात मोठ्या प्रमाणात धूर पसरत आहे. या कचऱ्याच्या ढिगारामुळे नागरिकही येथेच कचरा टाकतात. तर जवळच असलेले व्यवसायिक नॉयलन टॉयर, भंगार वस्तू येथे टाकत असतात. त्यामुळे हा कचरा बराच वेळ जळत राहते. याबाबत नागरिकांनी महानगर पालिकेला निवेदन दिले, आयुक्तांशी चर्चा केली. मात्र येथील कचरा साफ झाला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड प्रमाणात धूराचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ंंंं कारवाई करावी४स्वच्छ व सुंदर चंद्रपूरसाठी मनपाकडून कार्यवाही सुरू आहे. मात्र व्यवसायिक मोकळ्या जागेवर कचरा गोळा करून अनेकदा आग लावतात. त्यामुळे अशा व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. मनपाने याची दखल घ्यावी.व्यवसायिक लावतात कचऱ्याला आग४कचरा गोळा करण्यासाठी महानगर पालिकेच्या घंटा गाड्या घरोघरी जात आहेत. मात्र व्यवसायिकांच्या दुकानांमधून निघणारा कचरा हा अनेक जण मोकळ्या जागेत टाकत असतात. यात खर्डे, प्लॉस्टीक, नॉयलन दोरी असे अधिक पेट घेणारा कचरा असते. या कचऱ्याचा मोठा ढीग जमा झाल्यानंतर व्यवसायिकच या कचऱ्याला आग लावून देतात. त्यामुळे हा कचरा दिवसभर जळताना दिसून येते.आझाद बगीच्या जवळील राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागे महानगर पालिकेने कचऱ्याचा कंटेनर ठेवला आहे. या कंटेनरमध्ये घंटागाड्यांद्वारे कचरा गोळा करणारे कर्मचारी कचरा आणून टाकत असतात. तर या परिसरातील व्यावसायिकही येथेच कचरा टाकत असतात. मात्र या कंटेनरमधील कचरा नियमीत साफ केला जात नाही. या कचऱ्याला आग लावली जात असल्याने दिवसभर कचरा जळत असते. हा प्रकार दोन ते तीन दिवसाला नेहमीच घडत असून कचरा जळण्याच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात धुराचा सामना करावा लागत आहे.