शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीअभावी ब्रह्मनगरी हॉट

By admin | Updated: April 24, 2016 01:08 IST

विदर्भात ब्रह्मपुरीचे नाव उन्हाळा आला की, अग्रक्रमाने घेतले जाते. शहरात व तालुक्यात तापमान वाढण्यामागील मुख्य कारण परिसरात वृक्ष लागवडीचा अभाव आहे.

वृक्ष संगोपनाला प्राधान्य नाही : वृक्षारोपण केवळ औपचारिकताब्रह्मपुरी : विदर्भात ब्रह्मपुरीचे नाव उन्हाळा आला की, अग्रक्रमाने घेतले जाते. शहरात व तालुक्यात तापमान वाढण्यामागील मुख्य कारण परिसरात वृक्ष लागवडीचा अभाव आहे. नवीन झाडे वाढवून संगोपन केले जात नाही. त्यामुळे ब्रह्मपुरीकरांना उन्हाचे चटके, गरम वाऱ्याची झळ सोसावी लागत आहे.मागील अनेक वर्षांपासून वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतला जात असून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. परंतु अजूनही नवीन वृक्षांची मालिका बहरली आहे, असे चित्र सध्या कुठेच दिसत नाही. शहर परिसरात दहा कि.मी. भागात वृक्षांची लागवड नसल्याने शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शहरात अनेक सामाजिक संघटना, संस्था, पक्ष यांच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जातो. तो कवेळ फोटोसेशनसाठी असतो. लावलेल्या त्या रोपांचे संगोपन करण्यात येत नाही. शासनाकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन त्याचे संगोपन करण्याची गरज आहे. परंतु तसे होताना दिसून येत नाही. वृक्षारोपणावर झालेला खर्च व्यर्थ जातो. नगरपालिकेने वर्षानुवर्षे वृक्ष कर घेण्यावर भर दिला आहे. पण झाडे जगविण्याची जबाबदारी मात्र झटकली असल्याने नागरिकही बिनधास्त आहेत. रस्त्यांच्या मधोमध डिवायडर ओस पडली आहेत तर अनेक वनविभागाच्या जमिनी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. नगरपालिकेने प्रत्येक नागरिकांना घरासमोर एक झाड लावून वाढविणे सक्तीचे करणे आवश्यक आहे. जेणेकरुन ब्रह्मनगरीचे तापमान कमी होण्यास मदत होईल व सर्वच या भीषण आपत्तीमधून मोकळे होतील. ब्रह्मपुरीचा एकेकाळी वातावरणाविषयी चांगला लौकीक होता. आता मात्र वृक्षांच्या अभावाबरोबरच इतरही समस्या वाढण्याला सुरुवात झाली आहे. आता परिस्थिती बदलली असल्याने ब्रह्मपुरीची ओळख समस्याचे माहेरघर असे होऊन पूर्वीची ओळख पुसली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)