शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेल मशीन व्यावसायिकांकडून ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:33 IST

‘ही धरणीमाता तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याइतके देते. मात्र, तुमचा हावरटपणा कदापि पूर्ण करू शकत नाही’ असे मत महात्मा गांधीजींनी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मकथनात नोंदवून ठेवले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडे एकही मशीनची नोंद नाही : भूजल अधिनियम कागदावरच

राजेश मडावी ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ‘ही धरणीमाता तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याइतके देते. मात्र, तुमचा हावरटपणा कदापि पूर्ण करू शकत नाही’ असे मत महात्मा गांधीजींनी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मकथनात नोंदवून ठेवले आहे. जलसंपत्तीचा दैनंदिन वापर करताना खबरदारी घ्या, असा अन्वयार्थ या विधानातून प्रभावीपणे सूचित झालाय. मात्र, नैसर्गिक संसाधनांच्या बेसुमार गैरवापराला आळा बसला नाही. तर, दुसरीकडे बोअरवेल मशीन खोदणाºया व्यावसायिकांकडून जिल्ह्यात धुमाकूळ सुरू असूनही भूजल अधिनियम २०१३ लागू असताना जबाबदारीच निश्चित केली नाही. परिणामी, जिल्हा प्रशासनाच्या संबंधित यंत्रणेकडे एकाही बोअरवेल मशीनची नोंद न करता हा व्यवसाय केला जात आहे. निकष डावलून दिवसागणिक जमिनीच्या पोटात बोअरवेल वाढत असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत उग्र रुप धारण करण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यात यंदा अल्प पाऊस बरसल्याने पाण्याची पातळी खालावली. धरणांची एकूण क्षमता आणि उपलब्ध जलसाठा लक्षात घेतल्यास सिंचन तर दूरच राहिले पिण्याच्या पाण्याच्या संकटांची चाहूल आतापासूनच सुरू झाली आहे. उद्योग, वाणिज्यिक, शेती आणि पिण्यासाठी किती टक्के पाणी आरक्षित केले, यासंदर्भात जिल्हा प्रशासनात आनंदीआनंद आहे. चंद्रपूर महानगर पालिकेला पाण्याच्या पाण्यासाठी महाऔष्णिक केंद्राला अर्ज-विनंती करावी लागत आहे. मात्र, स्वत:चे शाश्वत जलस्त्रोत निर्माण करता आले नाही. सार्वजनिक नळयोजनेतून दरदिवशी पाणी मिळण्याची खात्री नसल्याने मागील पाच वर्षांपासून खासगी व्यावसायिकांकडून बोरवेल खोदण्याचे प्रमाण चौपट झाले. भूजल अधिनियमानुसार ७० मीटरपेक्षा अधिक खोदल्यास अतिखोल समजले जाते. भविष्यातील जलसंकटाची धास्ती घेऊन चंद्रपुरातील बारा वॉर्डांमध्ये काही व्यक्तिंनी ३०० ते ३५० पुट खोल बोअरवेल खोदल्याची माहिती सूत्राने दिली. बोरवेल खोदण्याच्या व्यवसायाची नोंद जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही यंत्रणेकडे केली जात नाही. परंतु, शासकीय पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणा नोंदणीधारक व्यावसायिकांकडून करवून घेते. त्यामुळे भूजल अधिनियमातील तरतुदींचे काय, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.परिषदअंतर्गत सुरू असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.कृषी सिंचनाच्या फ लश्रुतीवर शंकाकेंद्रीय पाणीसाठा मंत्रालयाच्या वतीने देशभरात पाचवी लहान व सूक्ष्म सिंचन गणना नुकतीच पूर्ण करण्यात आली. या गणनेचे निष्कर्षही जाहीर झाले. पिण्याच्या पाण्यासोबतच शासनाकडून कृषी सिंचनासाठीही विविध योजनेअंतर्गत बोअरवेल खोदण्यात आले. या दोन्ही गटातील उपयोगीता विशद केली. अशा प्रकारचे देशभरात २६ लाख बोअरवेल असल्याचे अहवालात नमूद केले. यासाठी जिल्हा प्रशासनाचाच अहवाल ग्राह्य धरण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही कृषी सिंचनासाठी बोअरवेल खोदण्यात आले. पण, सिंचन बोअरवेलची कुठेच नोंद नाही. त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र विस्तारले, असा दावा कोणत्या आधारावर करायचा हा प्रश्नच आहे.काय सांगतो भूजल अधिनियम?भूजल अधिनियमातील तरतुदीनुसार उद्योग, वाणिज्यिक, शेती आणि पिण्यासाठी कोणत्याही व्यक्ती अथवा प्राधिकृत संस्थेला विनापरवाना उपसा करता येत नाही. दरम्यान, या अधिनियमात मूलगामी सुधारणा करून २०१३ मध्ये नवा मसूदा तयार करण्यात आला. त्यामध्ये बोअरवेल खोदणाºया मशीन व्यावसायिकांना कायद्याच्या कक्षेत आणले आहे. हा व्यवसाय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच भूजल सर्वेक्षण विभागात नोंदणी करावी लागते. मात्र, जमिनीची अक्षरश: चाळण करणाºया मशीन व्यावसायिकांची मागील पाच वर्षांपासून एकही नोंद झाली नाही. सद्य:स्थितीत या व्यवसायावर परप्रांतियांचा ताबा आहे. संबंधित राज्याच्या परिवहन विभागात केवळ वाहनांचीच नोंद असते. त्या वाहनावर ठेवलेल्या हायपर बोअरवेल मशीनची नोंदणीच केली जात नाही.जि. प. मध्ये उलट प्रकारखासगी व्यक्तींकडून पिण्याच्या पाण्याचे बोअरवेल खोदण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना जि. प. पाणी पुरवठा योजनेतील बोअरवेलची संख्या कमी झाल्याची माहिती उपअभियंता (यांत्रिकी) विभागातून पुढे आली आहे. २०१३ मध्ये जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत ५२७ बोअरवेल खोदण्यात आले. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ मध्ये ही संख्या २२९ वरच थांबली आहे.अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमसुधारित भूजल अधिनियम लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनातील संबंधित यंत्रणेला अंमलबजावणीचे अधिकार देण्यात आले. मात्र, बोअरवेल नोंदणीसंदर्भात स्पष्टता नाही, अशी कारणे अधिकारी पुढे करीत असून, संभ्रम कायम आहे.चंद्रपुरात भूगर्भाची चाळणशहरातील विविध वॉर्डांत कर्नाटक, मध्य प्रदेश व तामिळनाडू राज्यातील बोअरवेल मशीन बोलाविण्यात आल्या. आठवड्यात १५ ते २० बोअरवेल खोदले जात आहेत. हा सर्व व्यवहार रोख रकमेतून सुरू आहे. प्रति बोअर ५० हजार रुपयांपेक्षा अधिक असून त्यासाठी काही एजंट कमिशनवर काम करीत आहेत. हा प्रकार जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद क्षेत्रात सुरू असल्याचे दिसून येत आहे.