शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

भाजप सरकार केवळ ‘घोषणाबाज’

By admin | Updated: April 13, 2017 00:38 IST

भाजप सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली जात नाही.

अशोक चव्हाण : पत्रकार परिषदेत डागली तोफचंद्रपूर : भाजप सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी ढोल-ताशाचा गजर करून राज्य सरकारने सांस्कृतिक देखावा केला. भाजप सरकार अनुचित प्रथा सुरू करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, पक्ष निरीक्षक वजाहत मिर्जा, शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, गजानन गावंडे, माजी आमदार सुभाष धोटे, राहुल पुगलिया, आसावरी देवतळे आदी उपस्थित होते.चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीनिमित्त चंद्रपुरात बुधवारी सायंकाळी त्यांची प्रचार सभा झाली. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेचा परिणाम म्हणून राज्य सरकार बँकांना एक लाख रुपये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागविली आहे. दुर्दैव असे की, कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारला उत्तर प्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करावा लागत आहे. राज्याची स्थिती कुठे चाचली, हे कुणालाच ठावुक नाही. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याचा प्रेत ७ ते ८ तास झाडाला टांगून असते. याकडे दुर्लक्ष केले जाते. यापेक्षा दुर्दैव काय, असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. कर्जमाफी न देण्यासाठी राज्य सरकारने लावलेले तर्क हास्यास्पद असून तात्काळ कर्जमाफी देऊन आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास बँकाचा फायदा होणार असेल तर सावकारी कर्ज माफ करून त्यांना लाभ देण्याची काय गरज होती, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)मनपात काँग्रेसला चांगले यश मिळेलईव्हीएम मशिनबाबत नागरिकांना शंका आहे. शंका दूर करणे सरकार व प्रशासनाचे काम असून नागरिकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील सर्व पदाधिकारी नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात एकजुटीने काम करीत आहेत. याचा नक्कीच फायदा होणार असून भाजप सरकार फक्त घोषणा करीत आहे. पंचशताब्दी योजनेचा पैसा देण्याऐवजी योजनाच भाजपाने बंद केली. भूमीहिन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्याऐवजी रामदेव बाबा यांना नि:शुल्क जमीन दिली जात आहे, हा अन्याय असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.