शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

भाजप सरकार केवळ ‘घोषणाबाज’

By admin | Updated: April 13, 2017 00:38 IST

भाजप सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली जात नाही.

अशोक चव्हाण : पत्रकार परिषदेत डागली तोफचंद्रपूर : भाजप सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी ढोल-ताशाचा गजर करून राज्य सरकारने सांस्कृतिक देखावा केला. भाजप सरकार अनुचित प्रथा सुरू करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, पक्ष निरीक्षक वजाहत मिर्जा, शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, गजानन गावंडे, माजी आमदार सुभाष धोटे, राहुल पुगलिया, आसावरी देवतळे आदी उपस्थित होते.चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीनिमित्त चंद्रपुरात बुधवारी सायंकाळी त्यांची प्रचार सभा झाली. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेचा परिणाम म्हणून राज्य सरकार बँकांना एक लाख रुपये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागविली आहे. दुर्दैव असे की, कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारला उत्तर प्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करावा लागत आहे. राज्याची स्थिती कुठे चाचली, हे कुणालाच ठावुक नाही. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याचा प्रेत ७ ते ८ तास झाडाला टांगून असते. याकडे दुर्लक्ष केले जाते. यापेक्षा दुर्दैव काय, असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. कर्जमाफी न देण्यासाठी राज्य सरकारने लावलेले तर्क हास्यास्पद असून तात्काळ कर्जमाफी देऊन आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास बँकाचा फायदा होणार असेल तर सावकारी कर्ज माफ करून त्यांना लाभ देण्याची काय गरज होती, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)मनपात काँग्रेसला चांगले यश मिळेलईव्हीएम मशिनबाबत नागरिकांना शंका आहे. शंका दूर करणे सरकार व प्रशासनाचे काम असून नागरिकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील सर्व पदाधिकारी नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात एकजुटीने काम करीत आहेत. याचा नक्कीच फायदा होणार असून भाजप सरकार फक्त घोषणा करीत आहे. पंचशताब्दी योजनेचा पैसा देण्याऐवजी योजनाच भाजपाने बंद केली. भूमीहिन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्याऐवजी रामदेव बाबा यांना नि:शुल्क जमीन दिली जात आहे, हा अन्याय असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.