शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार केवळ ‘घोषणाबाज’

By admin | Updated: April 13, 2017 00:38 IST

भाजप सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली जात नाही.

अशोक चव्हाण : पत्रकार परिषदेत डागली तोफचंद्रपूर : भाजप सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी ढोल-ताशाचा गजर करून राज्य सरकारने सांस्कृतिक देखावा केला. भाजप सरकार अनुचित प्रथा सुरू करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, पक्ष निरीक्षक वजाहत मिर्जा, शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, गजानन गावंडे, माजी आमदार सुभाष धोटे, राहुल पुगलिया, आसावरी देवतळे आदी उपस्थित होते.चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीनिमित्त चंद्रपुरात बुधवारी सायंकाळी त्यांची प्रचार सभा झाली. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेचा परिणाम म्हणून राज्य सरकार बँकांना एक लाख रुपये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागविली आहे. दुर्दैव असे की, कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारला उत्तर प्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करावा लागत आहे. राज्याची स्थिती कुठे चाचली, हे कुणालाच ठावुक नाही. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याचा प्रेत ७ ते ८ तास झाडाला टांगून असते. याकडे दुर्लक्ष केले जाते. यापेक्षा दुर्दैव काय, असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. कर्जमाफी न देण्यासाठी राज्य सरकारने लावलेले तर्क हास्यास्पद असून तात्काळ कर्जमाफी देऊन आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास बँकाचा फायदा होणार असेल तर सावकारी कर्ज माफ करून त्यांना लाभ देण्याची काय गरज होती, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)मनपात काँग्रेसला चांगले यश मिळेलईव्हीएम मशिनबाबत नागरिकांना शंका आहे. शंका दूर करणे सरकार व प्रशासनाचे काम असून नागरिकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील सर्व पदाधिकारी नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात एकजुटीने काम करीत आहेत. याचा नक्कीच फायदा होणार असून भाजप सरकार फक्त घोषणा करीत आहे. पंचशताब्दी योजनेचा पैसा देण्याऐवजी योजनाच भाजपाने बंद केली. भूमीहिन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्याऐवजी रामदेव बाबा यांना नि:शुल्क जमीन दिली जात आहे, हा अन्याय असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.