शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

जनतेच्या समस्यांचा भाजप सरकारला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2016 01:24 IST

केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान सरकारने लोककल्याणाचा नारा दिला होता. विकासाचे स्वप्न दाखविले होते.

नरेश पुगलिया यांचा हल्लाबोल : बल्लारपुरात धरणे आंदोलन बल्लारपूर : केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान सरकारने लोककल्याणाचा नारा दिला होता. विकासाचे स्वप्न दाखविले होते. मात्र सत्ता मिळताच देशातील व राज्यातील भाजप सरकारला सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचा विसर पडला आहे, असा हल्लाबोल माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी केला. बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटी, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने स्थानिक नगरपालिका चौकात शहरातील व तालुक्यातील जनतेच्या न्याय मागण्यासाठी सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया, गजानन गावंडे, नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, तारासिंग कलशी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, माजी नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी, व्यंकटेश एम. बाल बैरय्या, अशोक नागापूरे, पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती हरीष गेडाम, नगरसेवक नासीर खान, भास्कर माकोडे, विनोद आत्राम, इस्माईल ढाकवाला, वेणू गौरकार, न.प. गट नेता देवेद्र आर्य, वसंत मांढरे, गजानन दिवसे, चेतन गेडाम यांची उपस्थिती होती.नरेश पुगलिया पुढे म्हणाले, जिल्ह्यातील राज्याच्या मुख्यमंत्र्यासह तीन मंत्री केंद्रात व राज्यात आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे, राज्याचे अर्थ, नियोजन व वनखाते सांभाळणारे मंत्री आहेत. त्यांनी काही काळासाठी आकर्षीत करणाऱ्या घोषणा केल्या. आता मात्र केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. ही जनतेशी दगाबाजी आहे. आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे धोरण सरकार राबवित आहे. परिणामी तुम्ही घोषणाबाजी केलेल्या जनतेच्या न्याय मागण्या सोडवा, यासाठी आम्हाला आंदोलनातून सरकारला जागे करावे लागत आहे, असे सांगून पुगलिया यांनी भविष्यात जन आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी घनश्याम मुलचंदानी, रामभाऊ टोंगे, हरिष गेडाम, वसंत मांढरे, गजानन गावंडे यांची भाषणे झाली. संचालन देवेंद्र आर्य यांनी तर आभार व्यंकटेश एम. बालबैरय्या यांनी मानले. यावेळी शहरातील व तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी राज्य व केंद्र सरकारचा काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात आला. (शहर प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांना २३ मागण्यांचे निवेदनबल्लारपूर शहर व तालुक्यातील तब्बल २३ न्याय मागण्यांचे निवेदन येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. यात बल्लारपूर शहरासाठी जुनोना-कारवा-बामणी-बायपास मार्ग तयार करण्यात यावा, वनजमीनीवर अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, वर्धा नदीवर बंधारा बांधण्यात यावा, विसापूर गावासाठी उड्डान पूल बांधण्यात यावा, बल्लारपूर-विसापूर-नांदगाव- पठानपुरा मार्गाचे रुंदीकरण करुन द्विभाजक करण्यात यावा, वनउद्यानाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे, रमाई घरकुल योजनेच्या धर्तीवर आर्थिक कमकुवत घटकांना घरकुल योजना सुरु करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.