शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

जनतेच्या समस्यांचा भाजप सरकारला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2016 01:24 IST

केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान सरकारने लोककल्याणाचा नारा दिला होता. विकासाचे स्वप्न दाखविले होते.

नरेश पुगलिया यांचा हल्लाबोल : बल्लारपुरात धरणे आंदोलन बल्लारपूर : केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान सरकारने लोककल्याणाचा नारा दिला होता. विकासाचे स्वप्न दाखविले होते. मात्र सत्ता मिळताच देशातील व राज्यातील भाजप सरकारला सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचा विसर पडला आहे, असा हल्लाबोल माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी केला. बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटी, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने स्थानिक नगरपालिका चौकात शहरातील व तालुक्यातील जनतेच्या न्याय मागण्यासाठी सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया, गजानन गावंडे, नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, तारासिंग कलशी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, माजी नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी, व्यंकटेश एम. बाल बैरय्या, अशोक नागापूरे, पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती हरीष गेडाम, नगरसेवक नासीर खान, भास्कर माकोडे, विनोद आत्राम, इस्माईल ढाकवाला, वेणू गौरकार, न.प. गट नेता देवेद्र आर्य, वसंत मांढरे, गजानन दिवसे, चेतन गेडाम यांची उपस्थिती होती.नरेश पुगलिया पुढे म्हणाले, जिल्ह्यातील राज्याच्या मुख्यमंत्र्यासह तीन मंत्री केंद्रात व राज्यात आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे, राज्याचे अर्थ, नियोजन व वनखाते सांभाळणारे मंत्री आहेत. त्यांनी काही काळासाठी आकर्षीत करणाऱ्या घोषणा केल्या. आता मात्र केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. ही जनतेशी दगाबाजी आहे. आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे धोरण सरकार राबवित आहे. परिणामी तुम्ही घोषणाबाजी केलेल्या जनतेच्या न्याय मागण्या सोडवा, यासाठी आम्हाला आंदोलनातून सरकारला जागे करावे लागत आहे, असे सांगून पुगलिया यांनी भविष्यात जन आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी घनश्याम मुलचंदानी, रामभाऊ टोंगे, हरिष गेडाम, वसंत मांढरे, गजानन गावंडे यांची भाषणे झाली. संचालन देवेंद्र आर्य यांनी तर आभार व्यंकटेश एम. बालबैरय्या यांनी मानले. यावेळी शहरातील व तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी राज्य व केंद्र सरकारचा काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात आला. (शहर प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांना २३ मागण्यांचे निवेदनबल्लारपूर शहर व तालुक्यातील तब्बल २३ न्याय मागण्यांचे निवेदन येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. यात बल्लारपूर शहरासाठी जुनोना-कारवा-बामणी-बायपास मार्ग तयार करण्यात यावा, वनजमीनीवर अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, वर्धा नदीवर बंधारा बांधण्यात यावा, विसापूर गावासाठी उड्डान पूल बांधण्यात यावा, बल्लारपूर-विसापूर-नांदगाव- पठानपुरा मार्गाचे रुंदीकरण करुन द्विभाजक करण्यात यावा, वनउद्यानाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे, रमाई घरकुल योजनेच्या धर्तीवर आर्थिक कमकुवत घटकांना घरकुल योजना सुरु करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.